शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

ऐन उपवासाच्या काळात भगर तब्बल ३० रुपयांनी वाढली; भाजीपालाही तेजीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 01:24 IST

श्रावण सुरू झाल्यानंतर ऐन उपवासाच्या काळात भगर, शेंगदाणा, साखर यांच्या दरात वाढ झाली असून, भगर किलोमागे ३० ते ३५ रुपयांनी वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या साखरेच्या दरात या सप्ताहात तेजी आली असून, १ ते दीड रुपया किलोमागे वाढला आहे. मागील सप्ताहापासून सुरू असलेली तेलाच्या दरातील तेजी कायम आहे. भाजीपाल्याच्या दरांमध्ये अद्याप तेजी कायम असून, हायब्रीडपेक्षा गावठी कोथिंबिरीला अधिक दर मिळत आहे.

ठळक मुद्देबाजार समितीत आवक घटली : किराणा बाजारात उत्साहाचे वातावरण

नाशिक : श्रावण सुरू झाल्यानंतर ऐन उपवासाच्या काळात भगर, शेंगदाणा, साखर यांच्या दरात वाढ झाली असून, भगर किलोमागे ३० ते ३५ रुपयांनी वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या साखरेच्या दरात या सप्ताहात तेजी आली असून, १ ते दीड रुपया किलोमागे वाढला आहे. मागील सप्ताहापासून सुरू असलेली तेलाच्या दरातील तेजी कायम आहे. भाजीपाल्याच्या दरांमध्ये अद्याप तेजी कायम असून, हायब्रीडपेक्षा गावठी कोथिंबिरीला अधिक दर मिळत आहे. फळबाजारात आवक कमी असल्याने सर्वच फळांचे दर तेजीत आहेत. पावसाने ओढ दिल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. गावठी कोथिंबिरीला २० रुपयांपासून १०४ रुपये जुडीपर्यंतचा दर मिळत आहे. सरासरी ६० रुपये जुडीला मिळत आहेत. इतर फळभाज्यांच्या दरामधील तेजी कायम असल्याने किरकाेळ बाजारात भाजीपाला ६० ते ८० रुपये किलोच्या खाली मिळत नाही. फळांच्या आवकेत घट झाली आहे. मात्र, मागणी कायम असल्यामुळे फळबाजारात तेजी दिसून आली आहे. निर्बंध शिथिल केल्यामुळे किराणा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

चौकट-

कांदापात ३२ रु. जुडी

पालेभाज्यांना मागणी चांगली आहे. त्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे सर्वच पालेभाज्या तेजीत आहेत. मेथी १५ पासून ३० पर्यंत, तर कांदा पात १४ पासून ३२ रुपयांपर्यंत जुडी विकली जात आहे. फळभाज्यांच्या दरातही तेजी कायम आहे. शनिवार, रविवार बाजारपेठेत अमावास्येचा परिणाम दिसून आला.

सफरचंद १५० रु. किलो

फळबाजारात आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात फळांचे दर चांगलेच वाढले आहेत. घाऊक बाजारात सफरचंद ८० ते १५० रुपये किलो, तर मृदुला डाळिंब ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. फळांना सर्वसामान्य ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.

चौकट-

साखरेत दीड रुपयाने वाढ

गेल्या अनेक दिवसांपासून साखरेचे दर स्थिर होते. मात्र, उपवास आणि सणासुदीचे दिवस सुरू होताच साखरेच्या दरात एक ते दीड रुपयाने वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून डाळींचे दर स्थिर असून, बाजारात खरेदीची उत्साह असल्याचे दिसून आले.

कोट-

निर्बंध शिथिल झाल्यामुळे किराणा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. सर्व वस्तू सर्वच ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत खरेदी करावी, विनाकारण कोठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. - अनिल बुब, किराणा व्यापारी

कोट-

श्रावणमासाला प्रारंभ होताच भगरीच्या दरात झालेल्या वाढीने सर्वसामान्यांचा फराळही महागला आहे. भाजीपाला तर गेल्या काही दिवसांपासून महागच घ्यावा लागतो. हे सर्व करताना गृहिणींना मात्र खर्चाची कसरत करावी लागत आहे. - मंदा बर्वे, गृहिणी

कोट-

पिकांच्या ऐन माेसमात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे भाजीपाला पिकविताना शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असल्याने औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे - प्रवीण गायकवाड, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्या