शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उपवासाच्या काळात भगर तब्बल ३० रुपयांनी वाढली; भाजीपालाही तेजीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 01:24 IST

श्रावण सुरू झाल्यानंतर ऐन उपवासाच्या काळात भगर, शेंगदाणा, साखर यांच्या दरात वाढ झाली असून, भगर किलोमागे ३० ते ३५ रुपयांनी वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या साखरेच्या दरात या सप्ताहात तेजी आली असून, १ ते दीड रुपया किलोमागे वाढला आहे. मागील सप्ताहापासून सुरू असलेली तेलाच्या दरातील तेजी कायम आहे. भाजीपाल्याच्या दरांमध्ये अद्याप तेजी कायम असून, हायब्रीडपेक्षा गावठी कोथिंबिरीला अधिक दर मिळत आहे.

ठळक मुद्देबाजार समितीत आवक घटली : किराणा बाजारात उत्साहाचे वातावरण

नाशिक : श्रावण सुरू झाल्यानंतर ऐन उपवासाच्या काळात भगर, शेंगदाणा, साखर यांच्या दरात वाढ झाली असून, भगर किलोमागे ३० ते ३५ रुपयांनी वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या साखरेच्या दरात या सप्ताहात तेजी आली असून, १ ते दीड रुपया किलोमागे वाढला आहे. मागील सप्ताहापासून सुरू असलेली तेलाच्या दरातील तेजी कायम आहे. भाजीपाल्याच्या दरांमध्ये अद्याप तेजी कायम असून, हायब्रीडपेक्षा गावठी कोथिंबिरीला अधिक दर मिळत आहे. फळबाजारात आवक कमी असल्याने सर्वच फळांचे दर तेजीत आहेत. पावसाने ओढ दिल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. गावठी कोथिंबिरीला २० रुपयांपासून १०४ रुपये जुडीपर्यंतचा दर मिळत आहे. सरासरी ६० रुपये जुडीला मिळत आहेत. इतर फळभाज्यांच्या दरामधील तेजी कायम असल्याने किरकाेळ बाजारात भाजीपाला ६० ते ८० रुपये किलोच्या खाली मिळत नाही. फळांच्या आवकेत घट झाली आहे. मात्र, मागणी कायम असल्यामुळे फळबाजारात तेजी दिसून आली आहे. निर्बंध शिथिल केल्यामुळे किराणा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

चौकट-

कांदापात ३२ रु. जुडी

पालेभाज्यांना मागणी चांगली आहे. त्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे सर्वच पालेभाज्या तेजीत आहेत. मेथी १५ पासून ३० पर्यंत, तर कांदा पात १४ पासून ३२ रुपयांपर्यंत जुडी विकली जात आहे. फळभाज्यांच्या दरातही तेजी कायम आहे. शनिवार, रविवार बाजारपेठेत अमावास्येचा परिणाम दिसून आला.

सफरचंद १५० रु. किलो

फळबाजारात आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात फळांचे दर चांगलेच वाढले आहेत. घाऊक बाजारात सफरचंद ८० ते १५० रुपये किलो, तर मृदुला डाळिंब ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. फळांना सर्वसामान्य ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.

चौकट-

साखरेत दीड रुपयाने वाढ

गेल्या अनेक दिवसांपासून साखरेचे दर स्थिर होते. मात्र, उपवास आणि सणासुदीचे दिवस सुरू होताच साखरेच्या दरात एक ते दीड रुपयाने वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून डाळींचे दर स्थिर असून, बाजारात खरेदीची उत्साह असल्याचे दिसून आले.

कोट-

निर्बंध शिथिल झाल्यामुळे किराणा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. सर्व वस्तू सर्वच ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत खरेदी करावी, विनाकारण कोठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. - अनिल बुब, किराणा व्यापारी

कोट-

श्रावणमासाला प्रारंभ होताच भगरीच्या दरात झालेल्या वाढीने सर्वसामान्यांचा फराळही महागला आहे. भाजीपाला तर गेल्या काही दिवसांपासून महागच घ्यावा लागतो. हे सर्व करताना गृहिणींना मात्र खर्चाची कसरत करावी लागत आहे. - मंदा बर्वे, गृहिणी

कोट-

पिकांच्या ऐन माेसमात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे भाजीपाला पिकविताना शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असल्याने औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे - प्रवीण गायकवाड, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्या