शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पुलाअभावी मृतदेहालाही सोसाव्या लागताहेत यातना; नदीपात्रातून अंत्ययात्रा, ग्रामस्थांची दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 11:47 IST

पूल मंजूर असूनही कामाला दिरंगाई!

तुकाराम रोकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, देवगांव (ता. त्र्यंबकेश्वर, जि नाशिक): दिवसागणिक रस्ते विकासाचे जाळे विस्तारत 'समृध्दी'सह विविध महामार्ग प्रगतीपथावर नेणाऱ्या, आधुनिकतेकडे वाटचाल करीत मोनो - मेट्रो, बुलेट ट्रेन चालविणाऱ्या महाराष्ट्रात आजची आदिवासी बांधवांची नदीवरील पुलाअभावी चांगलीच फरफट होत असून मृत्यूनंतरही मृत्यूदेहाची अवहेलना होत आहे.

आजही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाड्या-पाड्यांना पुरेशा सुविधा दिल्या जात नसून स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही वंचित राहावे लागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खडकओहळमधील नागरिकांच्या मृत्यूने नदीपात्र ओलांडताना कसरत करावी लागत असून मृत्यूनंतरही मृत्यूदेहाची हेळसांड होत आहे.

एकीकडे देशातील शहरे प्रचंड प्रमाणात विकास करत असताना खेडी मात्र दुर्लक्षित राहत आहेत. वाडी - पाड्यांवर अद्याप सुविधा न पोहचल्याचे गंभीर वास्तव खडकओहळमध्ये निदर्शनास आले आहे. डिजिटल भारताचे स्वप्न आपण सारेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचे सांगत आहे. परंतु, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी पाड्यांचा विकास या संकल्पनेत अद्याप आलेला दिसत नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना विविध सोयी सुविधा यांची प्रतिक्षाच असून त्यामुळेच केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया डिजिटल इंडिया या योजना त्यांच्यापासून कोसो दूर आहेत. खडकओहळमधील एका ग्रामस्थाचे नुकतेच निधन झाले. त्याच्या अंत्यविधीसाठी नदीपत्राच्या पल्ल्याड स्मशानभूमीत जाण्यासाठी पूलच नसल्याने अन् पावसामुळे पाणीपातळी वाढलेल्या नदीपात्रातून हातांची साखळी करत चार जणांच्या खांद्यावरून अंत्ययात्रा नेताना पंचवीस-तीस नातेवाईकांना मोठे कष्ट सहन करावे लागले.

यावर्षी पावसाचा कहर कमी झाल्याने स्मशानभूमीपर्यंत पोहोचता आले. मात्र, नदीला पूर आल्यास पुलाअभावी मृतदेह अंत्यविधी न करता पूराचे पाणी ओसरण्याची वाट बघावी लागली असती. असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. या घटनेचा व्हायरल व्हिडीओ पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख नवनाथ कोठुळे आणि त्यांचे सहकारी आदिवासीदिनाच्या दिवशीच खडकओहळ येथे पोहोचले. त्यांच्यासमोर ग्रामस्थांनी गाऱ्हाणी कथन केल्या. मृताच्या नातेवाईकांना हा भयंकर प्रकार कथन करताना अश्रुंचे बांध फुटले. पावसाचा जोर असता, तर दोन दिवस मृतदेह घरातच ठेवावा लागला असता, असे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा उपस्थितांच्या अंगावर काटे निर्माण झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी खडकओहळसह परिसरातील पाड्यांना भेट देत येथील समस्या न सुटल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

पूल मंजूर असूनही कामाला दिरंगाई!

खडकओहळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या १२०० च्या आसपास आहे. त्यात खडकओहळ, जांभुळपाडा, विराचा पाडा असे तीन पाडे आहेत. येथील ग्रामस्थांना दुसऱ्या पाड्यावर जाण्यासाठी ओहोळ-नदी ओलांडून जावे लागते. स्मशानभूमी ओलांडताना पूलच नसलेल्या नदीच्या पलीकडे असल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते. अंत्यविधीसाठी जाताना, गर्भवतीस दवाखान्यात नेताना, आजारपणात दवाखान्यात जाताना, सर्पदंशासारखी घटना घडल्यावर जिवाशी खेळ होतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना, अंगणवाडीत पोषण आहार पोहोचविताना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागते. येथील समस्यांबाबत सरपंच वसंत खुताडे यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना पत्र दिले. मात्र, अद्यापही येथील समस्यांकडे यंत्रणांचे लक्ष गेलेले नाही. येथील पुलाचे काम मंजूर आहे. मात्र, पूल झालेलाच नाही. रस्ते व अन्य मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. गैरसोयीने बेजार ग्रामस्थांनी आमच्या ग्रामपंचायतीचा जवळच्याच गुजरात राज्यात समावेश करावा, अशी मागणी केली आहे.

सरकारने स्वातंत्र्य दिनापूर्वी खडकओहळ येथील नदीवरील पुलाचे काम सुरू करून अन्य मूलभूत सुविधा त्वरित पुरवाव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. -नवनाथ कोठुळे, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष, मनसे

ग्रामपंचायतीने येथे रस्ता, पूल या सुविधा करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, आमच्या अर्ज-विनंत्यांना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. -वसंत खुताडे, सरपंच, खडकओहळ

टॅग्स :Nashikनाशिक