कनाशी : परिसरात अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह अवकाळीे पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. पावसाच्या शिडकाव्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपासून तपमानाचा पारा वर चढला होता. त्यामुळे उष्मा खूप होता. मात्र शनिवारी झालेल्या पावसाने वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला आहे.अनेक भागात दुपारनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकीकडे नागरिकांना दिलासा मिळाला, तर दुसरीकडे बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने आमराईचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)
अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2016 22:24 IST