शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वादळामुळे जिल्ह्यात ६५० विजेचे पोल जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 19:07 IST

नाशिक शहर व मालेगाव मंडळात वादळी वारा मुसळधार पावसामुळे लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीजच ेपोल कोलमडल्याने ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला

ठळक मुद्देदुपारपर्यंत पुरवठा सुरू : महावितरणचे काम सुरूचजिल्ह्यातील ७५३ वाहिन्यांचा पूरवठा प्रभावित झाला

नाशिक : निसर्ग चक्रीवादळामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात बुधवारी झालेल्या वादळवारा व मुसळधार पावसामुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे ६५० विजेचे पोल जमीनदोस्त झाले. शहरातील तुटलेल्या विद्युत वाहिन्या व वाकलेले पोल दुरुस्त करण्याचे काम गुरुवारी पहाटे सहा वाजता सुरू करण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील २६ विद्युत उपकेंद्राचा पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे.

नाशिक शहर व मालेगाव मंडळात वादळी वारा मुसळधार पावसामुळे लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीजच ेपोल कोलमडल्याने ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तर काही भागात सुरक्षेसाठी वीजपुरवठाबंद करावा लागला. तसेच उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला होता. याशिवाय वृक्ष, झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. यामध्ये जिल्ह्यातील ७५३ वाहिन्यांचा पूरवठा प्रभावित झाला होता. कोरोना विषाणूचे संकट असताना सुरक्षितपणे काळजी घेत चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले.आणि बंद पडलेली बहुतांश विद्युत उपकेंद्र सुरु करीत शहरातील वीज पुरवठा गुरुवारी सहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आला. तर जिल्ह्यातील बहुतांश भाग गुरुवारी दुपारपर्यंत पूर्ववत केला. महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर,अधीक्षक अभियंते रमेश सानप आणि प्रविण दरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते, जनमित्र सातत्याने कार्य करीत वीज पुरवठा पूर्ववत केला असुन उर्वरीत सुद्धा सुरू करत आहेत. निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला असल्यास, वीज वाहिनी तुटल्यास किंवा रोहित्र जळाल्यास संबंधित महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक