शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
3
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
4
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
5
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
6
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
7
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
8
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
9
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
10
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
11
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
12
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
13
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
14
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
15
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
16
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
17
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
18
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
19
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
20
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?

दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:45 IST

गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेला पाऊस गुरुवारी (दि.१६) सकाळपासून बरसायला सुरुवात झाली. येवला तालुक्यात अनेक भागात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे.

येवला : गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेला पाऊस गुरुवारी (दि.१६) सकाळपासून बरसायला सुरुवात झाली. येवला तालुक्यात अनेक भागात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे.पावसाअभावी तालुक्यातील सुकण्यास, करपण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे उशिरा का होईना आलेल्या या पावसामुळे पिकांना अशंत: जीवदान मिळाले असून, सुकलेली मका, सोयाबीन पिके या पावसाने हिरवीगार व टवटवीत झाल्याचे चित्र आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी बळीराजाने मोठ्या उत्साहात केली होती. मुसळधार पडलेला पाऊस व हवामान खात्याने वर्तवलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र पावसाने ओढ दिल्याने येवला तालुक्यातील संपूर्ण भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी आपल्या साडेतीन एकर सोयाबीन पिकात पावसाअभावी नांगर फिरवला होता. मागील दहा-बारा दिवसांपूर्वी कोटमगाव परिसरात साठ ते सत्तर टक्के शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. येथील मका, सोयाबीनसारखी पिके उन्हाच्या झळा सोसून सुकली होती, तर काही पिके करपण्यास सुरुवात झाली होती. मानोरी येथील एक-दोन शेतकºयांनी मका पिकावर नांगर फिरवला होता. परंतु १६ आॅगस्टला झालेल्या पावसाने येवला तालुक्यावरील दुबार पेरणीचे संकट पुढचे काही दिवस टळले असल्याने शेतकरी या पावसामुळे सुखावल्याचे बघायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून शेतकरी पुन्हा मशागतीची कामे करताना दिसत आहे. मका व सोयाबीनला युरिया टाकताना दिसत आहे. या पावसामुळे जमिनीत काही प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील सुकलेली पिके हिरवीगार दिसत आहे. या पावसाने काही दिवसापुरते पिकांना जीवदान दिले असून, काही भागातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.शेतातील विहिरी अजूनही कोरड्याठाक आहेत.येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील कार्यान्वित असलेली ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र वाड्या-वस्त्यांवर विदारक चित्र निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात बºयापैकी पडलेल्या पावसाने पालखेड डाव्या कालव्यातून येवला तालुक्यात आवर्तन सुरू आहे. या आवर्तनातून पश्चिम भागातील गोई नदीला पाणी सोडण्यात यावे तसेच वितरिका नंबर २१,२५ आणि २८ ला या आवर्तनातून चाºयांना पाणी सोडावे. या वितरिका आणि बंधारे भरल्याने विहिरींना पाणी उतरण्यास मदत होऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याने या वितरिका आणि बंधारे पालखेडच्या आवर्तनातून भरून मिळावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.पिके झाली हिरवीगारदीड महिन्यापासून शेतात जावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुरु वातीच्या पावसाने उतरलेली खरीप पिके दीड महिन्यापासून पाण्याविना सुकल्याने करपू लागली होती. परंतु या थोड्या प्रमाणात पडलेल्या पावसाने खरीप पिके हिरवीगार झाल्याने दुबार पेरणीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक