शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:45 IST

गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेला पाऊस गुरुवारी (दि.१६) सकाळपासून बरसायला सुरुवात झाली. येवला तालुक्यात अनेक भागात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे.

येवला : गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेला पाऊस गुरुवारी (दि.१६) सकाळपासून बरसायला सुरुवात झाली. येवला तालुक्यात अनेक भागात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे.पावसाअभावी तालुक्यातील सुकण्यास, करपण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे उशिरा का होईना आलेल्या या पावसामुळे पिकांना अशंत: जीवदान मिळाले असून, सुकलेली मका, सोयाबीन पिके या पावसाने हिरवीगार व टवटवीत झाल्याचे चित्र आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी बळीराजाने मोठ्या उत्साहात केली होती. मुसळधार पडलेला पाऊस व हवामान खात्याने वर्तवलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र पावसाने ओढ दिल्याने येवला तालुक्यातील संपूर्ण भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी आपल्या साडेतीन एकर सोयाबीन पिकात पावसाअभावी नांगर फिरवला होता. मागील दहा-बारा दिवसांपूर्वी कोटमगाव परिसरात साठ ते सत्तर टक्के शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. येथील मका, सोयाबीनसारखी पिके उन्हाच्या झळा सोसून सुकली होती, तर काही पिके करपण्यास सुरुवात झाली होती. मानोरी येथील एक-दोन शेतकºयांनी मका पिकावर नांगर फिरवला होता. परंतु १६ आॅगस्टला झालेल्या पावसाने येवला तालुक्यावरील दुबार पेरणीचे संकट पुढचे काही दिवस टळले असल्याने शेतकरी या पावसामुळे सुखावल्याचे बघायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून शेतकरी पुन्हा मशागतीची कामे करताना दिसत आहे. मका व सोयाबीनला युरिया टाकताना दिसत आहे. या पावसामुळे जमिनीत काही प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील सुकलेली पिके हिरवीगार दिसत आहे. या पावसाने काही दिवसापुरते पिकांना जीवदान दिले असून, काही भागातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.शेतातील विहिरी अजूनही कोरड्याठाक आहेत.येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील कार्यान्वित असलेली ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र वाड्या-वस्त्यांवर विदारक चित्र निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात बºयापैकी पडलेल्या पावसाने पालखेड डाव्या कालव्यातून येवला तालुक्यात आवर्तन सुरू आहे. या आवर्तनातून पश्चिम भागातील गोई नदीला पाणी सोडण्यात यावे तसेच वितरिका नंबर २१,२५ आणि २८ ला या आवर्तनातून चाºयांना पाणी सोडावे. या वितरिका आणि बंधारे भरल्याने विहिरींना पाणी उतरण्यास मदत होऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याने या वितरिका आणि बंधारे पालखेडच्या आवर्तनातून भरून मिळावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.पिके झाली हिरवीगारदीड महिन्यापासून शेतात जावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुरु वातीच्या पावसाने उतरलेली खरीप पिके दीड महिन्यापासून पाण्याविना सुकल्याने करपू लागली होती. परंतु या थोड्या प्रमाणात पडलेल्या पावसाने खरीप पिके हिरवीगार झाल्याने दुबार पेरणीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक