शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

वीजेचा तुटवडा झाल्याने नाशिककरांवर भारनियमनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:14 IST

नाशिक शहराचा देखील समावेश असला तरी मुख्य शहराला याची कोणतीही झळ बसणार नसून जी-१,जी-२,आणि जी-३ या ग्रुपमध्ये असलेल्या ग्राहकांनाच भारनियमानाचा सामना करावा लागण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली.

ठळक मुद्देशहरांना मिळणार दिलासा: ग्रामीण भागातील ग्राहकांना बसणार झळ

नाशिक: वीजेची वाढलेली मागणी आणि कोळशाअभावी औष्णिक वीज केंद्रांमधून वीजनिर्मिती घटल्यामुळे राज्याला सुमारे ५०० पेक्षा अधिक मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील काही शहरांमध्ये तातडीचे भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली आहे. यामध्ये नाशिक शहराचा देखील समावेश असला तरी मुख्य शहराला याची कोणतीही झळ बसणार नसून जी-१,जी-२,आणि जी-३ या ग्रुपमध्ये असलेल्या ग्राहकांनाच भारनियमानाचा सामना करावा लागण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली.राज्यात गेल्या आठवड्यापासून वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे महावितरणने खाजगी उत्पादकांकडून वीज खरेदी करून वीजेची गरज भागविली आहे. असे असले तरी राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधील वीजनिर्मिती कोळशाअभावी घटल्यामुळे राज्यात ५०० ते १५०० मेगावॅट पर्यंत वीजेचा तुटवडा निर्माण झालेला आहे. यामुळे महावितरणवर राज्यात भारनियमन करण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये औरंगाबाद, बीड, नाशिक, आणि मुंब्रा या शहरांचा समावेश करण्यात आला असल्याचे समजते. या शहरातील ग्रामीण भागालाच मात्र भारनियमनाचा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भातील वेळापत्रक अद्याही जाहिर करण्यात आले नसल्यामुळे भारनियमन किती तास असू शकेल या विषयी देखील संभ्रम आहे.-इन्फो--वीजेचा लपंडाव सुरूचभारनिमयमनाची झळ शहरवासियांना बसणार नसल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला तरी गेल्या आठवडाभरापासून शहरात अवेळी वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले अ ाहे. तांत्रिक दोष असल्याचे कारण यामागे असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात दिवसातूून अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतोच कसा याबाबत मात्र अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. तांत्रिक दोष असेल तर तो दुरूस्त झाल्यानंतरही वारंवार वीज गायब होतीच याचे उत्तरही अधिकारी दयायला तयार नाहीत.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज