शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

दंड वसुलीसाठी वाहनधारक वेठीस वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष वसुली मात्र जोरात नाकाबंदी कसली, ही तर ‘वसुली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:37 IST

वेळ : रात्री १२.२० वाजेची. स्थळ : शालिमार चौक. बॅरिकेड्स टाकून नाकाबंदी सुरू असते. दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली जाते

ठळक मुद्दे नाकाबंदी नेमकी सुरक्षिततेसाठी की आर्थिक कोंडीसाठी मध्यरात्री पावती फाडण्याचे निमित्त मद्यपी चालकाला सोडूल देण्यात आले

नाशिक : वेळ : रात्री १२.२० वाजेची. स्थळ : शालिमार चौक. बॅरिकेड्स टाकून नाकाबंदी सुरू असते. दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली जाते आणि कागदपत्रे असतील तर हेल्मेटची विचारणा होते. दोन्ही असेल तर पीयूसी, इन्शुरन्सचीही मागणी केली जाते. थोडक्यात काय तर पावती फाडण्यासाठी कोणतेही कारण पुढे करून दंडवसुली हेच एकमेव उद्दिष्ट. असे असेल तर मग नाकाबंदी नेमकी सुरक्षिततेसाठी की आर्थिक कोंडीसाठी असा प्रश्न अनुत्तरीत राहतो.रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान पोलिसांच्या ताफ्याकडून वाहनांची तपासणी केली जात होती. एका मद्यधुंद चारचाकी वाहनधारकाला अडविण्यात आल्यानंतर त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आला. अन्य काही दुचाकीस्वारांनी दंडाची आकारणी करण्यात आली. कुणी पोलिसांना जाब विचारला की कलमांची धमकी देऊन कोणतेही कलम लावता येऊ शकते, असे सांगून अनेकांना भीतीही घातली जात होती. वास्तविक नाकाबंदी असेल तर फक्त वाहनांची झडती घेऊन त्याबाबतची माहिती ठेवली जाणे अपेक्षित असताना केवळ मध्यरात्री पावती फाडण्याचे निमित्त शोधले जात होते.प्रसंग-१ वेळ रात्री १२.१५रस्त्याने जाणाºया एका दुचाकीस्वाराला अडवून नाकाबंदीतील एका अतिउत्साही पोलीस कर्मचाºयाने दुचाकीस्वाराकडे लायसन्सची मागणी केली. लायसन्स मिळाल्यानंतर मोठी कामगिरी फत्ते केल्याचा आविर्भाव चेहºयावर आणून ते लायसन्स त्याने आपल्या साहेबांकडे सुपूर्द केले. त्यानंतर या पोलिसाने दुचाकीचेही छायाचित्र काढले. त्याने नंतर कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे नाही म्हटल्यावर हेल्मेटची विचारणा केली. कागदपत्रे नसल्याचे २०० आणि हेल्मेट नसल्याचे ५०० रुपयांची पावती फाडण्यास चालकास भाग पाडले. नाकाबंदीत संशयास्पद वाहनांची, व्यक्तींची चौकशी केली जाते. प्रसंगी वाहन जप्तही केले जाते. परंतु येथे या साºया प्रकाराला फाटा देत दंड भरल्यास दारू पिऊन गाडी चालविणाºयालाही अभय मिळते. भले पुढे जाऊन त्याने अपघात केला तरी चालणारे असते. नाकाबंदी नेमकी का आणि कशासाठी केली जाते, याचे कोणतेही भान न राखता येथील अधिकारी, कर्मचारी दुचाकीस्वार चोरच आहेत, अशा आविभार्वात पोलीस बोलत होते. विशेष म्हणजे डोक्यावर मंकी कॅप आणि मफलर गुंडाळलेल्या या पोलिसांकडे मात्र हेल्मेट नव्हते.प्रसंग- २ वेळ रात्री १२.२५एका मद्यधुंद कारचालकाला अडवून त्याच्याकडून पोलीसांनी पावती फाडली. त्यानंतर या मद्यपी चालकाला सोडूल देण्यात आले. खरेतर अशा परिस्थितीत अपघातास कारणीभूत ठरू शकणाºया आणि त्याच्यामुळे इतरांचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता गृहीत धरून कारचालकाचे वाहन जप्त करणे अपेक्षित होते. परंतु पोलिसांना फक्त दंडाची रक्कमच महत्त्वाची वाटल्याने त्याच्याकडून केवळ दंड वसूल करण्यात आला. वास्तविक मद्यपी वाहनचालकाला अशा अवस्थेत सोडणे उचित अजिबात नव्हते. तरीही पोलिसांनी सोपस्कार पूर्ण करीत कारचालकाला सोडून दिले. पुढे याच कारचालकाने अपघात केला असता तर? परंतु पैसे दिल्यानंतर मद्यपीदेखील पोलिसांना सज्जन वाटू लागतात. असाच काहीसा प्रकार शालिमार चौकात कारचालकाच्या बाबतीत घडला.प्रसंग- ३ वेळ रात्री १२.३५शालिमार चौकात नाशिकरोडच्या एका रिक्षाचालकाला अडविल्यानंतर येथील अधिकाºयाने त्याच्याकडे लायसन्स आणि नंतर कागदपत्रांची मागणी केली. परंतु त्याने कागदपत्रे गाडीत असल्याचे सांगताच, तुझ्या चेहºयाकडे पाहून तू खरे बोलत आहेस असे वाटते म्हणून त्यास सत्यतेचे सर्टिफिकेट देऊन टाकले. वरून तुम्ही नाशिकरोडचे रिक्षाचालक खूप माजलेले आहेत, नाशिकरोडला एकाच नंबरच्या अनेक रिक्षा चालतात, असे त्यास सुनावले. असा प्रकार सुरू असल्याचे माहिती असेल तर मग महाशयांनी कारवाई करावी ना. त्या रिक्षाचालकाला सुनावण्याचे काय कारण हे उपस्थिताना कळले नाही. मात्र त्या अधिकाºयाने बºयाच बढाया मारून घेतल्या.