शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे बेघरांनी घेतला भाजीमंडईचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 19:22 IST

पावसाची सततधार सुरू असल्याने अनेक बेघर नागरिकांना दिवसभर पावसापासून बचावासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणा-या बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथे चूल मांडल्याने पावसाळा सुरू

ठळक मुद्दे शनिवारी दुपारी गोदावरीला पाणी सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा गोदावरीला शनिवारी पूर आल्याने नदीकाठ परिसरात झोपड्या व राहुट्या उभारून राहणाऱ्या नागरिकांच्या झोपड्या पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी काही दिवसांपासून ओस पडलेल्या मनपाच्या गणेशवाडी भाजीमंडईचा ताबा घेत तेथेच संसार थाटले.

पावसाची सततधार सुरू असल्याने अनेक बेघर नागरिकांना दिवसभर पावसापासून बचावासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणा-या बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथे चूल मांडल्याने पावसाळा सुरू झाल्यापासून भाजीमंडई बेघरांचे आश्रयस्थान बनली आहे. शनिवारी दुपारी गोदावरीला पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे पूर येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत होते. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर नदीकाठच्या परिसरात झोपड्या, पाल उभारून राहणा-या बेघरांनी आपल्याजवळील कपड्यांची गाठोडी करत लहान मुलांना खांद्यावर उचलून घेत थेट मनपाच्या भाजीमंडईचा रस्ता धरला. पालिकेने मंडईत भाजीविक्रेत्यांसाठी उभारलेल्या ओट्यांवर बेघरांनी सहारा घेतला व भाजीमंडईला आपले घर म्हणून तेथे चूल पेटवून दाटीवाटीने संसार थाटले आहे. भाजीमंडई गेल्या काही वर्षांपासून भाजीविक्रेत्यांविना ओस पडलेली असल्याने गंगाघाटावरील अनेक बेघर नागरिक व कुटुंबीयांनी पावसाच्या निमित्ताने का होईना पुन्हा भाजीमंडईचा ताबा घेतल्याचे चित्र काही दिवसांपासून गोदावरी नदीला आलेल्या पुरानंतर दिसून येत आहे.

 

 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक