शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

पावसामुळे बेघरांनी घेतला भाजीमंडईचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 19:22 IST

पावसाची सततधार सुरू असल्याने अनेक बेघर नागरिकांना दिवसभर पावसापासून बचावासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणा-या बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथे चूल मांडल्याने पावसाळा सुरू

ठळक मुद्दे शनिवारी दुपारी गोदावरीला पाणी सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा गोदावरीला शनिवारी पूर आल्याने नदीकाठ परिसरात झोपड्या व राहुट्या उभारून राहणाऱ्या नागरिकांच्या झोपड्या पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी काही दिवसांपासून ओस पडलेल्या मनपाच्या गणेशवाडी भाजीमंडईचा ताबा घेत तेथेच संसार थाटले.

पावसाची सततधार सुरू असल्याने अनेक बेघर नागरिकांना दिवसभर पावसापासून बचावासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणा-या बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथे चूल मांडल्याने पावसाळा सुरू झाल्यापासून भाजीमंडई बेघरांचे आश्रयस्थान बनली आहे. शनिवारी दुपारी गोदावरीला पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे पूर येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत होते. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर नदीकाठच्या परिसरात झोपड्या, पाल उभारून राहणा-या बेघरांनी आपल्याजवळील कपड्यांची गाठोडी करत लहान मुलांना खांद्यावर उचलून घेत थेट मनपाच्या भाजीमंडईचा रस्ता धरला. पालिकेने मंडईत भाजीविक्रेत्यांसाठी उभारलेल्या ओट्यांवर बेघरांनी सहारा घेतला व भाजीमंडईला आपले घर म्हणून तेथे चूल पेटवून दाटीवाटीने संसार थाटले आहे. भाजीमंडई गेल्या काही वर्षांपासून भाजीविक्रेत्यांविना ओस पडलेली असल्याने गंगाघाटावरील अनेक बेघर नागरिक व कुटुंबीयांनी पावसाच्या निमित्ताने का होईना पुन्हा भाजीमंडईचा ताबा घेतल्याचे चित्र काही दिवसांपासून गोदावरी नदीला आलेल्या पुरानंतर दिसून येत आहे.

 

 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक