शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे बेघरांनी घेतला भाजीमंडईचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 19:22 IST

पावसाची सततधार सुरू असल्याने अनेक बेघर नागरिकांना दिवसभर पावसापासून बचावासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणा-या बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथे चूल मांडल्याने पावसाळा सुरू

ठळक मुद्दे शनिवारी दुपारी गोदावरीला पाणी सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा गोदावरीला शनिवारी पूर आल्याने नदीकाठ परिसरात झोपड्या व राहुट्या उभारून राहणाऱ्या नागरिकांच्या झोपड्या पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी काही दिवसांपासून ओस पडलेल्या मनपाच्या गणेशवाडी भाजीमंडईचा ताबा घेत तेथेच संसार थाटले.

पावसाची सततधार सुरू असल्याने अनेक बेघर नागरिकांना दिवसभर पावसापासून बचावासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणा-या बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथे चूल मांडल्याने पावसाळा सुरू झाल्यापासून भाजीमंडई बेघरांचे आश्रयस्थान बनली आहे. शनिवारी दुपारी गोदावरीला पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे पूर येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत होते. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर नदीकाठच्या परिसरात झोपड्या, पाल उभारून राहणा-या बेघरांनी आपल्याजवळील कपड्यांची गाठोडी करत लहान मुलांना खांद्यावर उचलून घेत थेट मनपाच्या भाजीमंडईचा रस्ता धरला. पालिकेने मंडईत भाजीविक्रेत्यांसाठी उभारलेल्या ओट्यांवर बेघरांनी सहारा घेतला व भाजीमंडईला आपले घर म्हणून तेथे चूल पेटवून दाटीवाटीने संसार थाटले आहे. भाजीमंडई गेल्या काही वर्षांपासून भाजीविक्रेत्यांविना ओस पडलेली असल्याने गंगाघाटावरील अनेक बेघर नागरिक व कुटुंबीयांनी पावसाच्या निमित्ताने का होईना पुन्हा भाजीमंडईचा ताबा घेतल्याचे चित्र काही दिवसांपासून गोदावरी नदीला आलेल्या पुरानंतर दिसून येत आहे.

 

 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक