शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

पावसाने दडी मारल्याने पेरणीबाबद बळीराजांची व्दिधा अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 18:48 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहºयावर समाधश्न होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला. परंतु आता मात्र पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देलखमापूर : चिंतागस्त शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहºयावर समाधश्न होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला. परंतु आता मात्र पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.रब्बी हंगामातील आलेला कटु अनुभव बाजुला सावरून बळीराजांने यंदाच्या खरीप हंगामासाठी आपली कंबर कसली आहे. यंदा पावसाळा सुरू होताच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लखमापूर, म्हेळुसके, परमोरी, अवनखेड, करजंवण, ओझे, ओझरखेड, दहेगाव वागळुद इ. भागातील शेतकरी वर्ग खरीप हंगामासाठी सज्ज झाला. मध्यंतरी थोडा पाऊस उघडल्याने बळीराजांच्या पेरण्या मध्यावर आल्या असतांना पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या कल्पनाना फाटा निर्माण झाला आहे. पेरणी करून जर पाऊस उशीरा पडला तर या काळजीत तालुक्यातील शेतकरी वर्ग पडला आहे.कोरोना, अस्मानी, सुलतानी संकटानी अगोदरच ग्रामीण भागातील जनता त्रासुन गेलेली आहे. त्यात मोठ्या कष्टाने खरीप हंगामाची तयारी करून शेतामधुन जास्त कसे उत्पन्न घेता येईल यांचे नियोजन करून बळीराजा शेती कामाला लागला. यंदा सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने आता पाण्याची काळजी मिटली. या आशेवर बळीराजांने सोयाबीन, भुईमूग, मका, भात, ज्वारी आदी बियाणे खरेदी करून पेरणी मध्यावर आणली, परंतु आतामात्र काही गावामध्ये खुप गरज असतांना पाऊस लंपडाव खेळत आहे. त्यामुळे आपल्या खरीप हंगामाचे भांडवल वाया जाते की काय याची भिती बळीराजाला वाटु लागली आहे.कादवा काठच्या गावांना नदीला पाणी हा थोडा दिलासा दिला आहे. त्यामुळे कादवा काठच्या बºयाच गावांनी भाजीपाला पिक घेण्याकडे कल दिला आहे. नगदी पीकाला जर आपण घेतले तर आपल्या हातात उत्पन्नाचे भांडवल खेळते राहिल अशी धारणा धरून बळीराजा तयारीला लागला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस