शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पेठ तालुक्यात जमिनीला पडलेल्या ‘त्या’ भेगा अतिवृष्टीमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 14:33 IST

पेठ तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान घोटविहीर, लिंगवणे व त्यानंतर मोहदाड या गावातील डोंगरांना मोठमोठया भेगा गेल्याने घाबरलेल्या नागरिकांना भूगर्भशास्त्र विभागाने दिलासा दिला आहे. सदरच्या भेगा भूकंपामुळे नाही तर अतिवृष्टीमुळे पडल्याचा निष्कर्ष या विभागातर्फे काढण्यात आला आहे.

ठळक मुद्दे भूवैज्ञानिक विभाग : नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन

पेठ : तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान घोटविहीर, लिंगवणे व त्यानंतर मोहदाड या गावातील डोंगरांना मोठमोठया भेगा गेल्याने घाबरलेल्या नागरिकांना भूगर्भशास्त्र विभागाने दिलासा दिला आहे. सदरच्या भेगा भूकंपामुळे नाही तर अतिवृष्टीमुळे पडल्याचा निष्कर्ष या विभागातर्फे काढण्यात आला आहे.डोंगर उतारावर असलेल्या घोटविहीर पैकी उंबरमाळ गावाच्या डोंगराला आडव्या भेगा पडल्यामुळे माळीण सारखी आपत्ती ओढविण्याच्या भीतीने नागरिकांसह प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार हरिष भामरे व पोलीस निरीक्षक शिवाजी बढे यांनी रात्रीतून उंबरमाळच्या ग्रामस्थांना नजीकच्या करंजपाडा गावात सुरक्षित ठिकाणी हलविले. त्या पाठोपाठ लिंगवणे, रानविहिर, शिवशेत या भागातही अशाच भेगा पडल्याने हा भूकंपसदृष प्रकार असल्याच्या भीतीने पेठ तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले होते.विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार हरिष भामरे यांनी भूवैज्ञानिक विभागाच्या अधिकाऱ्यांसह भेगा पडलेल्या भागाची पाहणी करून अहवाल सादर केला. त्यामध्ये सदरच्या भेगा अतिवृष्टीने खडकात मुरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पडल्याचा अहवाल दिला आहे. दोन बेसाल्ट जातीच्या खडकात पाणी मुरल्याने जमिनीला अशा प्रकारच्या भेगा पडत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे भूकंप झाल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन तहसीलदार हरीष भामरे यांनी केले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार