शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

नाशिकला महापुराचे संकेत; नारोशंकर मंदिराचे छत बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 10:16 IST

नारोशंकर मंदिरावरील घंटेपर्यंत पाणी पोहचले आहे. मंदिरचे संपूर्ण छत पुराच्या पाण्यात बुडाले आहे. नदीच्या पुराचे मापक असलेला दुतोंडया मारुती शुक्रवारी रात्रीच पाण्याखाली बुडाला.

नाशिक - मागील दोन दिवसांपासून नाशिक शहरात जोर धरलेल्या पावसाची संततधार रात्रीपासून अधिकच वाढली आहे. शहारात सकाळी 8 वाजेपर्यंत 80मिमी पाऊस पडला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून खबरदारीचा उपाय म्हणून दर तासाला 3 हजार क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग केला जात आहे. आज सकाळच्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणातून सकाळी साडे 9 वाजता 23 हजार 445 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू गेला. तसेच होळकर पुलाखालून पाण्याचा विसर्ग ३० हजार क्युसेकपेक्षा अधिक असून धोक्याची पातळीच्या अधिक वर गोदावरी वाहू लागली आहे.  

नारोशंकर मंदिरावरील घंटेपर्यंत पाणी पोहचले आहे. मंदिरचे संपूर्ण छत पुराच्या पाण्यात बुडाले आहे. नदीच्या पुराचे मापक असलेला दुतोंडया मारुती शुक्रवारी रात्रीच पाण्याखाली बुडाला. महापुराचे संकेत देणाऱ्या नारोशंकर मंदिराच्या घंटेला पाणी लागण्याची शक्यता आहे. कारण या मंदिराचे छत पाण्याखाली गेले असून केवळ घंटा आणि कळस नजरेस पडत आहे. विसर्गात वाढ झाल्यास आणि शहारत पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास घंटेपर्यंत पुर पातळी पोहचू शकते. तसे झाल्यास गोदावरीला महापूर येईल. गाडगे महाराज पुलाच्या खाली पाणी लागल्याची माहिती आहे. याठिकाणी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ठिकठिकाणी गर्दी करणाऱ्या नाशिककरांना सावधानतेचा इशारा देत आहेत.

आज सकाळी ९वाजेनंतर गोदाकाठालगत सर्व मंदिरे पाण्याखाली गेली. पिंपळ चौक नेहरु चौकाच्या दिशेने पुराचे पाणी जाण्याची शक्यता वाढली आहे. बालाजी कोट,  कापड बाजार, सराफ बाजार, भांडी बाजार जलमय झाला आहे. टाळकुटेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून येथील अमरधाम स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन प्रशासन करत आहे. नदीकाठी ठिक ठिकाणी  अग्निशमन दलाचे जवान, पोलिस तैनात असून मनपा तसेच जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन सद्य  परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गोदावरीचा बापू पुल पाण्याखाली गेला आहे. तसेच घारपुरे घाट पुलावर वाहतूक बंद करण्यात येत आहे. या पुलावरून देखील पाणी थोड्या वेळात वाहणार आहे. पोलिसांनी बँरेकेटिंग करायाला  सुरवात केली आहे.

नाशिककरांनी गरज असेल तरच बाहेर पडावे; 'संडे' पावसाळी पर्यटन टाळा

गरज असल्यास बाहेर पडावे, पावसाळी पर्यटन टाळावे शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसामुळे धबधबे, नद्या, नाले, ओहळ ओसंडून वाहत आहे. धोक्याची पातळी गाठल्याची दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कुठल्याही पर्यटन स्थळे जाणे धोक्याचे ठरणारे आहे, असे  प्रशासनाने म्हटले आहे.

गोदावरीला आलेला पूर बघण्यासाठी नाशिककर जनतेने बाहेर पडू नये प्रसारमाध्यमद्वारे पूरस्थिती जाणून घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर रंजना भानसी यांनी केले आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर