शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

अतिवृष्टीतील शेती नुकसानीचे दुबार पंचनामे

By admin | Updated: September 10, 2016 01:38 IST

अतिवृष्टीतील शेती नुकसानीचे दुबार पंचनामे

नाशिक : आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नाशिक तालुक्यातील केवळ पावसाने झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. वस्तुत: अतिवृष्टीमुळे गोदावरी व दारणा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील २४५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यांचे तत्काळ पंचनामे करण्याचा ठराव पंचायत समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आला.सभापती मंदाबाई निकम यांच्यासह उपसभापती अनिल ढिकले, पंचायत समिती सदस्य प्रकाश बदादे, धनाजी पाटील, शोभा लोहकरे, सुजाता रूपवते, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची मासिक बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच कृषी विभागाचा आढावा घेण्यात आला. त्यात आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतीचे २४५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. त्यातील ३३ टक्क्यांच्या आतील गोेदावरी व दारणा नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेलेल्या शेतीचे व शेतपिकांच्या नुकसानीचा त्यात समावेश नसल्याने कालवी, लाखलगाव सह अन्य गावांचे दुबार नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपसभापती अनिल ढिकले यांनी बैठकीत दिले. त्यानुसार या पुरामुळे वाहून गेलेल्या संबंधित गावातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहे. तालुक्यातील १० ते १२ पाणीपुरवठा योजना अपूर्ण असून त्यापैकी काही ग्राम पाणीपुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहणाऱ्या संबंधित दोषींविरोधातही फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत सदस्यांनी केल्या. एकलहरे येथे गोदावरी नदीच्या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे दारणा नदीतून ७ ते ८ किलोमीटर अंतरावरून नव्याने पाण्याचा उद्भव घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा योजना राबविली आहे. त्याच धर्तीवर मांडसांगवी, शिलापूर, ओढा येथेही गोदावरीचे प्रदूषित पाणी असल्याने नवीन पाणी उद्भव घेऊन योजना राबविण्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच रमाई आवास योजनेच्या धर्तीवर आता अनूसूचित जमाती संवर्गातील दारिद्र्य रेषेखाली व रेषेवरील सर्व लाभार्थींना शबरी घरकुल योजनेतून लाभ देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)