शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

निर्यातबंदीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक दरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 18:49 IST

लखमापूर : कांदा निर्यातबंदी करून शेतकरीवर्ग आर्थिक दरीत लोटला गेला असून जगाचा पोशिंदा बळीराजा आधाराविना रस्त्यावर उतरला असून, शेतकरीवर्गाचे अश्रू कोण पुसणार? असा सवाल निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबुकिंग करूनही बियाणे व रोपे मिळत नसल्याने चिंता

लखमापूर : कांदा निर्यातबंदी करून शेतकरीवर्ग आर्थिक दरीत लोटला गेला असून जगाचा पोशिंदा बळीराजा आधाराविना रस्त्यावर उतरला असून, शेतकरीवर्गाचे अश्रू कोण पुसणार? असा सवाल निर्माण झाला आहे.रब्बी व खरीप हंगामात आर्थिक फटका बसलेल्या बळीराजाला आता तरी सुगीचे दिवस येतील असे वातावरण जवळ जवळ तयार झाले असताना एका घोषणेने त्यावर पाणी फिरले. बदलत्या हवामानातील पिकांवर होणार परिणाम, पिके वाचिवण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ, भांडवलाची कमतरता, भांडवल जास्त व उत्पन्नाची आवक कमी हे समीकरण आदी संकटातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असताना सरकारने कांद्यावर निर्यातबंदी करून बळीराजाला चारी मुंड्या चित केले आहे. अगोदरचं कोरोनाचे वातावरण त्यात जवळ पुरेसे भांडवल नाही. याही परिस्थिती मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करण्यावर भर दिला. परंतु लॉक डाऊनची स्थिती असल्यामुळे बियाने व रोपे मिळवण्यासाठी शेतकरीवर्गाला तारे वरची कसरत करावी लागली. बुकिंग करून ही बियाने व रोपे मिळत नसल्याने शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या गेल्या असतांना सरकारने हा निर्णय घेऊन खरीप हंगामातील आशेवर अवकृपाच केली आहे.जवळचे सर्व भांडवल खर्च करून कसे तरी खरिपातील पिकं घेतली. परंतु पावसाचा लहरीपणा तसेच वातावरणातील बदलावाचा पिकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या रोगाचा सामना करावा लागला व त्यात बरीच पिकाच्या उत्पन्न वाढीवर मोठ्या प्रमाणात फटका बसला. रब्बी हंगामात व कोरोना काळात वाया गेलेले भांडवल भरून काढण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी कांदा साठवून ठेवला. परंतु अति पावसाने साठवून ठेवलेला कांदा पिकाला मोड व मोठ्या प्रमाणात सडण्याचे प्रमाण वाढल्याने कांदा पिकावरील सर्व आशेवर पाणी फिरले. तसेच पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाल्याने कांदा पिकाला बाजारपेठेत चांगली मागणी आली व आता कांदा अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळत असताना कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला आहे.कांदावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावीआम्ही मोठ्या मेहनतीने कष्ट करून तसेच अनेक समस्यांचा सामना करून थोडा फार कांदा जतन करून ठेवला होता व रब्बी, तसेच कोरोना काळातील वाया गेलेले भांडवल भरून निघेल, अशी आशा निर्माण झाली होती. कारणं बाजारपेठेत आवक कमी व मागणी जास्त हे समीकरण झाल्याने सध्या चांगला भाव मिळत असताना सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी घोषित केल्याने आमचे पूर्णपणे जीवन उधळून गेले आहे. तरी कांदावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी ही मागणी जोर धरीत आहे. 

टॅग्स :onionकांदाagricultureशेती