शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

निर्यातबंदीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक दरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 18:49 IST

लखमापूर : कांदा निर्यातबंदी करून शेतकरीवर्ग आर्थिक दरीत लोटला गेला असून जगाचा पोशिंदा बळीराजा आधाराविना रस्त्यावर उतरला असून, शेतकरीवर्गाचे अश्रू कोण पुसणार? असा सवाल निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबुकिंग करूनही बियाणे व रोपे मिळत नसल्याने चिंता

लखमापूर : कांदा निर्यातबंदी करून शेतकरीवर्ग आर्थिक दरीत लोटला गेला असून जगाचा पोशिंदा बळीराजा आधाराविना रस्त्यावर उतरला असून, शेतकरीवर्गाचे अश्रू कोण पुसणार? असा सवाल निर्माण झाला आहे.रब्बी व खरीप हंगामात आर्थिक फटका बसलेल्या बळीराजाला आता तरी सुगीचे दिवस येतील असे वातावरण जवळ जवळ तयार झाले असताना एका घोषणेने त्यावर पाणी फिरले. बदलत्या हवामानातील पिकांवर होणार परिणाम, पिके वाचिवण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ, भांडवलाची कमतरता, भांडवल जास्त व उत्पन्नाची आवक कमी हे समीकरण आदी संकटातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असताना सरकारने कांद्यावर निर्यातबंदी करून बळीराजाला चारी मुंड्या चित केले आहे. अगोदरचं कोरोनाचे वातावरण त्यात जवळ पुरेसे भांडवल नाही. याही परिस्थिती मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करण्यावर भर दिला. परंतु लॉक डाऊनची स्थिती असल्यामुळे बियाने व रोपे मिळवण्यासाठी शेतकरीवर्गाला तारे वरची कसरत करावी लागली. बुकिंग करून ही बियाने व रोपे मिळत नसल्याने शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या गेल्या असतांना सरकारने हा निर्णय घेऊन खरीप हंगामातील आशेवर अवकृपाच केली आहे.जवळचे सर्व भांडवल खर्च करून कसे तरी खरिपातील पिकं घेतली. परंतु पावसाचा लहरीपणा तसेच वातावरणातील बदलावाचा पिकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या रोगाचा सामना करावा लागला व त्यात बरीच पिकाच्या उत्पन्न वाढीवर मोठ्या प्रमाणात फटका बसला. रब्बी हंगामात व कोरोना काळात वाया गेलेले भांडवल भरून काढण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी कांदा साठवून ठेवला. परंतु अति पावसाने साठवून ठेवलेला कांदा पिकाला मोड व मोठ्या प्रमाणात सडण्याचे प्रमाण वाढल्याने कांदा पिकावरील सर्व आशेवर पाणी फिरले. तसेच पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाल्याने कांदा पिकाला बाजारपेठेत चांगली मागणी आली व आता कांदा अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळत असताना कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला आहे.कांदावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावीआम्ही मोठ्या मेहनतीने कष्ट करून तसेच अनेक समस्यांचा सामना करून थोडा फार कांदा जतन करून ठेवला होता व रब्बी, तसेच कोरोना काळातील वाया गेलेले भांडवल भरून निघेल, अशी आशा निर्माण झाली होती. कारणं बाजारपेठेत आवक कमी व मागणी जास्त हे समीकरण झाल्याने सध्या चांगला भाव मिळत असताना सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी घोषित केल्याने आमचे पूर्णपणे जीवन उधळून गेले आहे. तरी कांदावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी ही मागणी जोर धरीत आहे. 

टॅग्स :onionकांदाagricultureशेती