शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

देवपूर परिसरातील मोरांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:53 IST

देवपूर : एकेकाळच्या निसर्गरम्य व सिन्नर तालुक्यातील देवपूर परिसरात जागोजागी दिसणाऱ्या मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने  चिंता व्यक्त होत आहे.

निसर्गाचे वरदान लाभलेले गाव म्हणून पूर्वी देवपूरची ओळख होती. गावात प्रवेश करताच दृष्टीने पडणारी खळखळ वाहणारी देवनदी, काठावर असलेल्या पेरू, सिताफळ, बोरांच्या बागा मनाला उल्हसित करत असत. निसर्गाच्या सानिध्यात मोरांचे थवे निर्भयपणे बागडताना आढळून यायचे. येथील ग्रामस्थांना ही बाब नित्याची झाली असली तरी हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी पाहुणेमंडळी आवर्जुन देवपूरला यायची व हरवून जायची. तथापि आता मात्र, येथील चित्र बदलले आहे. एरव्ही उन्हाळ्यातही तुडंूब असलेले देवनदीचे पात्र आता कोरडेठाक पडले आहे. पावसाळ्यात पुरेशा पावासाअभावी देवनदीला पाणी नसल्याने काठावरील बागाही नाहीशा झाल्या. बागा तोडल्यामुळे सहज उपलब्ध होणारा रानमेवा आता खुपच कमी दिसू लागला आहे. आजही फळझाडे तुरळकच पहायला मिळतात. या फळझाडांच्या आश्रयाने असलेले मोरही पहायला मिळतात. तथापि त्यांना अन्नपाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. नदीला पाणी नाही. फळबागा नाही त्यामुळे मोरांची संख्याही कमी होत आहे. नदीच्या कडेला मोरांसाठी पाणवठे बांधण्याची गरज आहे. पाणवठे झाल्यास मोरांची पाण्याच्या शोधार्थ होणारी भटकंती थांबेल. मोरांचे गाव असलेल्या गावातून मोर हद्दपार होण्याची भीती निर्माण होत आहे. वनखात्याने या संदर्भात अन्न व पाण्याची उपलब्धता क रुप द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ