शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

पैठणीला दुष्काळाची किनार

By admin | Updated: May 31, 2016 23:27 IST

विणकरांमध्ये चिंतेचे वातावरण : गेल्या पाच महिन्यांपासून वाढले रेशमाचे भाव

 दत्ता महाले  येवलापाण्याबरोबरच दुष्काळाचे सावट आता पैठणीवर पडले असून, गेल्या पाच महिन्यात रेशमाचे भाव ८०० ते १००० रु पयांनी वाढले असून, सिंगल व डबल पदर रेशमी पैठणीचे भाव ८०० रु पयांनी घसरल्याने विणकरांची चिंता वाढली आहे. कांदाभाव घसरले आणि शेतकरी अडचणीत आले तशीच परिस्थिती येवल्याच्या पैठणीबाबत सध्या झाली आहे. येवला शहराची मुख्य बाजारपेठ ही कांदा व पैठणीवर अवलंबून आहे. कांद्यासह पैठणीला घसरण सुरू झाल्याने आता शहराची बाजारपेठदेखील मंदावली आहे. नवीन वर्ष सुरू झाले तेव्हा जानेवारीमध्ये अडवाण रेशमाचे भाव २३०० रु पये किलो होते, तर उभार रेशीम २८०० रु पये किलो होते. त्यादरम्यान सिंगल पदरी पैठणीला ५००० रुपये भाव मिळत होता तर डबल पदराला ५५०० रु पये भाव मिळत होता. वर्षाची सुरुवात चांगली झाली होती. घरी एक अथवा दोन हातमाग असणाऱ्यांचे बरे चालले होते. परंतु गेल्या पाच महिन्यात येवल्याच्या पैठणीला उतरती कळा लागली असल्याचे विणकरांचे म्हणणे आहे.एप्रिल आणि मे महिन्यात अडवाण रेशमाचे भाव ३४०० रु पये प्रतिकिलो झाले तर उभार रेशीम ३६०० रु पये प्रतिकिलो एवढे वाढले आहे. आणि सध्या पैठणीच्या किमतीत घसरण लागली असून, सिंगल पदरी पैठणीला ४७०० रु पये भाव मिळत असून, डबल पदरी पैठणीला ४२०० रु पये भाव मिळत आहे. पाणी पाऊस नसल्याने पडलेला दुष्काळ हा नैसर्गिक असला तरी त्यासाठी माणूसदेखील तितकाच जबाबदार आहे. परंतु पैठणीच्या बाबत मंदीचे सावट नेमके नैसर्गिक आहे की कृत्रिम याबाबत कारागीर चर्चा करीत आहेत. पैठणी तयार करण्यासाठी किमान ५ ते ६ दिवस लागतात. परंतु सध्या आठवडा भर काम करूनही केवळ ४०० ते ६०० रु पये पदरी पडत असल्याने विणकर मंदीच्या सावटामुळे निराश झाले आहेत. भाव घसरल्याने कामाचा वेगदेखील कमी झाला आहे. विणकर सरासरी दिवसाला ८ ते १० तास काम करतो; मात्र पैठणीच्या भावातील घसरणीमुळे काम करूनही पैसा दिसत नसल्याने दिवसभरात ४ ते ५ तास काम विणकर करत असल्याचे चित्र आहे. सध्या मालाला उठाव नसल्याने पैठणी विणकराकडून खरेदी करणेदेखील व्यापाऱ्यांनी कमी केले आहे. एक अथवा दोन हातमाग असणारे विणकर पन्नास व शंभर पैठणीचे नग सांभाळण्याची क्षमता नसलेल्या विणकरांना या मंदीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे. पुणे, मुंबई शहरात व्यापाऱ्यांना पैठणी विकली तर भाव मिळतो. परंतु दोन चार पैठणीचे नग विक्र ीसाठी घेऊन जाणे सर्वसामान्य विणकराला परवडत नाही त्यामुळे तयार नग हे गावातच कमी भावात विकण्याशिवाय पर्याय नाही. स्थानिक व्यापारी बाजारपेठेतील उठाव पाहूनच भाव ठरवतात. सर्वसामान्य पैठणी उत्पादक विणकर व मजूर यांच्यात एकवाक्यता नसल्याने पैठणीचे व्यापारी कमी-अधिक दराने पैठणी खरेदी करत असतात. शिवाय आठवडाभर पैठणीचा नग तयार करून त्यात जर काही चूक निघाली तर पुन्हा ४०० ते ५०० रु पयाने नगाचा भाव घसरतो. सध्या जेमतेम रोजीरोटी कशीबशी भागविण्याची परिस्थिती सर्वसामान्य विणकर व मजुरावर आलेली आहे.केंद्र सरकारने रास्त भावात रेशीम उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर किमान चार ते पाच केंद्र सुरू करावे, अशी मागणी विणकराकडून होत आहे. महिलांचे राजवस्र म्हणून कागदावर पैठणीला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली असली तरी, सध्या पैठणीची कलाकुसर तयार करणाऱ्या सर्वसामान्य विणकराना सक्रिय कृतियुक्त दिलासा विविध योजना राबवून देण्याची गरज आहे. ४०० वर्षाच्या प्रदीर्घ प्रवास करणारी पैठणी मोठमोठ्या समारंभ व फॅशन शोमधून झळकत असली, तरी या व्यवसायाला घरघर लागली आहे. हवा तसा राजाश्रय मिळत नसल्याने पैठणीचे अर्थकारण सर्वसामान्य विणकराला अधोगतीकडे नेत आहे.