शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वळण बंधाऱ्यामुळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:29 IST

पेठ- या वर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी दडी मारलेल्या पावसाने ऑगष्ट अखेर हजेरी लावल्याने पेठ तालुक्यातील 9 पैकी 6 प्रकल्प शंभर टक्के भरले असून दिंडोरी व पेठ तालुक्याच्या सीमारेषेवरील वळण बंधारा योजनेमूळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत आटला आहे.

ठळक मुद्दे- पेठ तालुका -9 पैकी 6 धरणे शंभर टक्के भरले

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ- या वर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी दडी मारलेल्या पावसाने ऑगष्ट अखेर हजेरी लावल्याने पेठ तालुक्यातील 9 पैकी 6 प्रकल्प शंभर टक्के भरले असून दिंडोरी व पेठ तालुक्याच्या सीमारेषेवरील वळण बंधारा योजनेमूळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत आटला आहे.पेठ तालुक्यातील जवळपास सर्वच नद्या पाश्चिम वाहीणी आहेत. लघू पाटबंधारे बांधकाम विभाग अंतर्गत 9 लहान मोठे प्रकल्प असून त्यामध्ये लिंगवणे, आड बु., हरणगाव, शिंदे, चोळमूख, श्रीमंत(गावंधपाडा) पाहूचीबारी, इनामबारी, शिराळे आदींचा समावेश आहे.पैकी ऑगष्ट अखेर लिंगवणे, शिंदे, चोळमूख, पाहूचीबारी, इनामबारी व शिराळे हे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले आहेत.वळण योजनेचा झाला परिणाम ...गुजरात राज्याकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ते पूर्ववाहिनी नद्याद्वारे दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरणात वळवण्यासाठी पेठ व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर घाटाच्या वर वळण योजना राबवण्यात आली. यामूळे घाटमाथ्यावरून खाली वाहणारे पाणी अडवले गेले. याच पाण्यावर दरवर्षी वाघाड धरणाचा जलसाठा वाढत असतो. मात्र या वळण योजनेमुळे आड बु., हरणगाव, श्रीमंत, या धरणाच्या जलसाठयात घट निर्माण झाली आहे. या वर्षी पर्जन्यमानातही मोठया प्रमाणावर घट झाली असून सप्टेबर महिना सुरु झाला तरी सरासरी गाठली नसल्याने संभाव्य पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. ऑगष्ट अखेर 1464 मिमी पाऊस पडला आहे.पेठ तालुक्यातील धरणांचा एकूण जलसाठा ( कंसात सद्याचा जलसाठा)आकडे द.ल.घ. फू. मध्ये1) लिंगवणे -65.62(65.62)2) आड-58.21(33.52)3)हरणगाव -181.40(144.37)4) शिंदे -43.04(43.04)5) चोळमूख -140.27(140.27)6) श्रीमंत(गावंधपाडा) -399.12(256.84)7) पाहूचीबारी -55.39(55.39)8) इनामबारी -87.14(87.14)9) शिराळे -67.03(67.03) 

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण