शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

नाशिकच्या ममदापूर काळविट राखीव संवर्धन क्षेत्रातील ‘त्या’ हरणाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:45 IST

खरवंडी-कोळम खूर्द चौफूलीजवळ मृतावस्थेत आढळून आले होते. गावकर्‍याच्या म्हणण्यानुसार या हरणाची गोळ्या घालून शिकार करण्यात आली होती; मात्र या हरणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहामध्ये कुठल्याही प्रकारची गोळी आढळून आली नसल्याचा अहवाल पशु वैद्यकिय अधिका-यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे शवविच्छेदनामध्ये दातांच्या खूणा आढळून आल्या ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्र काळविटांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते. पुरेसे मुबलक साहित्य व सामुग्री आणि मनुष्यबळ ममदापूरसाठी स्वतंत्ररित्या देण्याची गरज

नाशिक : येथील येवला तालुक्यातील ममदापूर राखीव संवर्धन राखीव जंगलाचे क्षेत्र काळविटांसाठी प्रसिध्द आहे. काळविट अभयारण्य असलेल्या या संवर्धन क्षेत्रातील एका हरीण शनिवारी (दि.४) खरवंडी-कोळम खूर्द चौफूलीजवळ मृतावस्थेत आढळून आले होते. गावकर्‍याच्या म्हणण्यानुसार या हरणाची गोळ्या घालून शिकार करण्यात आली होती; मात्र या हरणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहामध्ये कुठल्याही प्रकारची गोळी आढळून आली नसल्याचा अहवाल पशु वैद्यकिय अधिका-यांनी दिला आहे. यामुळे हरणाची शिकार झाली नसल्याचा दावा वनविभागाच्या अधिका-यांकडून करण्यात आला आहे. हरीण संवर्धन राखील क्षेत्रातून बाहेर भरकटल्यावर मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केलेला असावा, असे वनविभागाचे म्हणणे आहे. कारण शवविच्छेदनामध्ये दातांच्या खूणा आढळून आल्या. पहाटेपासून मृतदेह पडून असल्याने निम्म्याहून अधिक मृतदेह नष्ट झालेला होता. याबाबत पुढील तपास सुरू असून शिका-यांची पाळेमुळे शोधून काढत त्यांच्यावर वनविभागाचे गस्त पथक लक्ष ठेवून असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक राजेंद्र कापसे यांनी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्र काळविटांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते. सुमारे पाच हजार हेक्टरवर पसरलेल्या या राखीव क्षेत्रात मोठ्या संख्येने हरणांचे संवर्धन होत आहे. नाशिक पुर्व वनविभागाच्या अखत्यारितीत हा परिसर आहे. स्थानिक गावांमधील गावक-यांच्या मदतीने या भागाची सुरक्षितता वनविभागाकडून अधिकाधिक वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुरेसे मुबलक साहित्य व सामुग्री आणि मनुष्यबळ ममदापूरसाठी स्वतंत्ररित्या देण्याची गरज आहे.मृतावस्थेत आढळून आलेल्या हरणाच्या मृतदेहामध्ये बंदूकीची गोळी आढळून आली नसली तरी बंदूकीतून गोळ्या झाडल्या गेल्या त्या आवाजाने गावकरी जागे झाले असा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. खरवंडी कोळम गावाचा परिसर निर्जन असल्यामुळे शिकारीचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता वनविभागाने नाकारली नसून त्या दिशेनेही तपास सुरू असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. यापुर्वी देखील हरणाची शिकार करताना एका आरोपीला गावक-यांच्या मदतीने पकडण्यात वनविभागाला यश आले होते.

टॅग्स :forestजंगलNashikनाशिक