शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

कोरोनामुळे लगीनसराई लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:11 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात दि. १५, १६, २६ व २७ या चार लग्न तिथी असूनही कोरोनामुळे लग्न सोहळे मात्र रद्द झाले आहेत. राजापूर व परिसरातील मंडळींनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत.

ठळक मुद्देयेवला परिसर : वधू-वर पक्षाने सोहळे केले स्थगित

राजापूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात दि. १५, १६, २६ व २७ या चार लग्न तिथी असूनही कोरोनामुळे लग्न सोहळे मात्र रद्द झाले आहेत. राजापूर व परिसरातील मंडळींनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत.जमलेले लग्न व जमणार असलेल्या लग्नाच्या निमित्ताने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नवरदेव-नवरींचा मात्र कोरोनामुळे लग्न लांबल्याने हिरमोड झाला आहे. वधू-वर पक्षाकडून लग्न कसे करणार यावर फोनवरून सध्या चर्चा होताना दिसत आहे. संचारबंदीने नवरीच्या गावाला जाता येईना अन् नवरदेवाच्या गावाला जाता येईना अशी स्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउन, संचारबंदी १४ एप्रिलपर्यंत जाहीर झालेली असली तरी ती पुन्हा वाढण्याचीच चिन्हे असल्याने कोरोनाच्या भीतीपोटी कुणीही एप्रिल महिन्यातील लग्नतारखा धरण्यासाठी तयार नाही. कोरोनाने लग्नसराई लांबणीवर पडली असून याचा परिणाम लॉन्सचालक, मंडपवाले, वाजंत्रीवाले, आचारी, किराणा व्यापारी, फोटोग्राफर, गोंधळी आदी सर्वच घटकांवर जाणवू लागला आहे. कोरोनाने अनेकांचे रोजगारच ठप्प झाले आहे. तर हातावर पोट असणाऱ्या कारागिरांचे मात्र मोठे हाल होत आहेत.लग्न म्हणजे एक मोठा सोहळा असतो. दोन्हीकडच्या कुटुंबांमध्ये या निमित्ताने आनंदाला उधाण असते तर सामाजिक प्रतिष्ठेसाठी मोठा खर्चही केला जातो. एप्रिल बरोबरच येत्या मे महिन्यात लग्न तिथी असूनही वधू व वर पक्षाकडून दिवाळीनंतरच लग्नसोहळ्याचा विचार करू असे आश्वासन दिले जात असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.साखरपुडा झालेल्या नवदांपत्याला आता फोनवर बोलून दिवस मोजावे लागत आहेत तर नवीन लग्न जुळवाजुळवीही थांबली आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात कुलदैवतांचा जागर करण्याची प्रथा आहे. जागरण गोंधळ घालण्याचा सध्या सीझन असताना कोरोनाने मात्र जागरण गोंधळ घालणाºया कलाकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न