शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:15 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे शेतकरी पुरता त्रस्त असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागतीमध्ये गहू सोंगणी, कांदे, हरबरा काढणीची कामे जोरात सुरू आहेत.

मानोरी : गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे शेतकरी पुरता त्रस्त असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागतीमध्ये गहू सोंगणी, कांदे, हरबरा काढणीची कामे जोरात सुरू आहेत. कांदा, गहू पिकाला गेल्या दहा - बारा दिवसांपूर्वी पाण्याची गरज भासत होती. कांदा पीक पाण्याविना करपू लागले होते. त्यामुळे आवर्तनाच्या माध्यमातून पाणी मिळविण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने करत शेतकºयांनी पाणी मिळवून पिकांना जीवदान दिले. परंतु मागील तीन ते चार दिवसात हवामानात बदल होत असून, ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडू लागल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. कांदे काढून विकावे की साठवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आकाशातील काळ्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस कधी बरसेल याचा अंदाज नाही. आधीच कमी दरात कांद्याला भाव मिळत असल्याने अशा वातावरणात अजून तोटा सहन करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा पिकावर झालेला खर्च भरून निघण्याचीसुद्धा नामुष्की शेतकºयांवर ओढवली आहे. महागडी कीटकनाशके, रासायनिक खते, कांदे काढणीला सात हजार रुपये प्रतिएकर भाव, मजुरी आदी खर्च करून योग्य भाव मिळत नसल्याने तर शेतकºयांची तेल गेले अन् तूपही गेले अशी अवस्था झाली आहे. गव्हाची स्थिती कांद्याच्या पिकासारखी झाली आहे. गहू सोंगणीला मजूर मिळत नसल्याने अशा ढगाळ वातावरणामुळे हार्वेस्टिंग मशीनला प्राधान्य दिले जात आहे. मागील दोन दिवसांत शेतकरी त्यांच्या मागावर आहेत. एक हजार ते बाराशे रुपये प्रतिएकर मजुरी देऊनही मशीन मिळत नाही. अशात जर पावसाने धुमाकूळ घातला तर वाळलेले गव्हाचे पीक भुईसपाट होण्याच्या भीतीने शेतकरी संकटात सापडला आहे.

टॅग्स :Natureनिसर्गFarmerशेतकरी