शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:15 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे शेतकरी पुरता त्रस्त असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागतीमध्ये गहू सोंगणी, कांदे, हरबरा काढणीची कामे जोरात सुरू आहेत.

मानोरी : गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे शेतकरी पुरता त्रस्त असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागतीमध्ये गहू सोंगणी, कांदे, हरबरा काढणीची कामे जोरात सुरू आहेत. कांदा, गहू पिकाला गेल्या दहा - बारा दिवसांपूर्वी पाण्याची गरज भासत होती. कांदा पीक पाण्याविना करपू लागले होते. त्यामुळे आवर्तनाच्या माध्यमातून पाणी मिळविण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने करत शेतकºयांनी पाणी मिळवून पिकांना जीवदान दिले. परंतु मागील तीन ते चार दिवसात हवामानात बदल होत असून, ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडू लागल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. कांदे काढून विकावे की साठवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आकाशातील काळ्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस कधी बरसेल याचा अंदाज नाही. आधीच कमी दरात कांद्याला भाव मिळत असल्याने अशा वातावरणात अजून तोटा सहन करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा पिकावर झालेला खर्च भरून निघण्याचीसुद्धा नामुष्की शेतकºयांवर ओढवली आहे. महागडी कीटकनाशके, रासायनिक खते, कांदे काढणीला सात हजार रुपये प्रतिएकर भाव, मजुरी आदी खर्च करून योग्य भाव मिळत नसल्याने तर शेतकºयांची तेल गेले अन् तूपही गेले अशी अवस्था झाली आहे. गव्हाची स्थिती कांद्याच्या पिकासारखी झाली आहे. गहू सोंगणीला मजूर मिळत नसल्याने अशा ढगाळ वातावरणामुळे हार्वेस्टिंग मशीनला प्राधान्य दिले जात आहे. मागील दोन दिवसांत शेतकरी त्यांच्या मागावर आहेत. एक हजार ते बाराशे रुपये प्रतिएकर मजुरी देऊनही मशीन मिळत नाही. अशात जर पावसाने धुमाकूळ घातला तर वाळलेले गव्हाचे पीक भुईसपाट होण्याच्या भीतीने शेतकरी संकटात सापडला आहे.

टॅग्स :Natureनिसर्गFarmerशेतकरी