शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

नाशकात ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 14:00 IST

द्राक्ष पंढरी आणि वाईन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बांगावार ढगाळ वातावणरामुळे विपरीत परिणाम होत असून ओखी वादळानंतर नाशिक जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

ठळक मुद्देनाशिकमध्ये ढगाळ वातावरणामुळे शेतकरी संकटात काढणीला आलेल्या द्राक्ष बागावंर भुरीचा प्रादुर्भाव विपरीत परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांची खबरदारी

नाशिक : द्राक्ष पंढरी आणि वाईन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बांगावार ढगाळ वातावणरामुळे विपरीत परिणाम होत असून ओखी वादळानंतर नाशिक जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. काढणीला आलेल्या बागांचे नुकसान रोखण्यासाठी शेतकऱ्यांना द्राक्षबागा अंतिम टप्प्यात असताना फवारणीचा खर्च वाढला असून, शेतकरी चिंतित झाले आहेत.हवामान विभागाने कोकणासह मध्य महाराष्ट्र व अन्य भागात पावसाचा अंदाज वर्तवलेला असताना विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात गारपीठ झाली आहे. या वातावरण बदलाचा प्रभाव नाशिकच्या वातावरणातही दिसून येत असून गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. नाशिक शहर व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण असून पावसाच्या भितीने द्राक्ष उत्पादक शेतकºयांच्या चिंतेत भर घातली असून द्राक्षांवरील भुरीचे नियंत्रण करण्यासोबतच अवकाळी पाऊस झाल्यास काढणीला आलेले पीक कसे वाचवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. अंतिम टप्प्यातील बागा वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादक भुरी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारणीची खबरदारी घेत आहेत. भुरी नियंत्रणासाठी सल्फरचा वापर करण्याचे प्रमाण शेतकºयांमध्ये दिसून येत आहेत. परंतु, निर्यातक्षम द्राक्षांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ नये याचीबी खबरदारी शेतकरी घेताना दिसून येत आहेत. चुकीच्या औषधांची फवारणी अथवा औषधाचे अधिक प्रमाण यामुळे निर्यातक्षम द्राक्षांची प्रतवारी घसरण्याचा धोका टाळण्याची कसरत शेतकºयांना करावा लागत आहे.त्यामुळे शेती तज्ज्ञांकडून द्राक्ष बागांच्या अंतीम टप्प्यात योग्य औषध व औषधाचे प्रमाण याविषयी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच फवारणी करताना कमी कार्यक्षमतेपासून मध्यम कार्यक्षमतेचे फवारणी यंत्रे वापरण्यासोबतच फवारणीमुळे मण्यांवर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही. अथवा फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा. जैविक नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबिटलीस आणि अ‍ॅम्पिलोमायसीस यांचा वापर शक्य आहे. तसेच फवारणीद्वारे पोटॅशिअम व कॅल्शियमचा वापर केल्यास बुरशीनियंत्रणाला फायदा होत असल्याचा शेतकºयांमध्ये समज आहे. परंतु, सध्याच्या बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही औषध अथवा उर्वरक वापरतांना शेतकºयांनी कृषितज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक बनले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिकagricultureशेती