शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

नाशकात ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 14:00 IST

द्राक्ष पंढरी आणि वाईन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बांगावार ढगाळ वातावणरामुळे विपरीत परिणाम होत असून ओखी वादळानंतर नाशिक जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

ठळक मुद्देनाशिकमध्ये ढगाळ वातावरणामुळे शेतकरी संकटात काढणीला आलेल्या द्राक्ष बागावंर भुरीचा प्रादुर्भाव विपरीत परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांची खबरदारी

नाशिक : द्राक्ष पंढरी आणि वाईन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बांगावार ढगाळ वातावणरामुळे विपरीत परिणाम होत असून ओखी वादळानंतर नाशिक जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. काढणीला आलेल्या बागांचे नुकसान रोखण्यासाठी शेतकऱ्यांना द्राक्षबागा अंतिम टप्प्यात असताना फवारणीचा खर्च वाढला असून, शेतकरी चिंतित झाले आहेत.हवामान विभागाने कोकणासह मध्य महाराष्ट्र व अन्य भागात पावसाचा अंदाज वर्तवलेला असताना विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात गारपीठ झाली आहे. या वातावरण बदलाचा प्रभाव नाशिकच्या वातावरणातही दिसून येत असून गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. नाशिक शहर व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण असून पावसाच्या भितीने द्राक्ष उत्पादक शेतकºयांच्या चिंतेत भर घातली असून द्राक्षांवरील भुरीचे नियंत्रण करण्यासोबतच अवकाळी पाऊस झाल्यास काढणीला आलेले पीक कसे वाचवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. अंतिम टप्प्यातील बागा वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादक भुरी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारणीची खबरदारी घेत आहेत. भुरी नियंत्रणासाठी सल्फरचा वापर करण्याचे प्रमाण शेतकºयांमध्ये दिसून येत आहेत. परंतु, निर्यातक्षम द्राक्षांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ नये याचीबी खबरदारी शेतकरी घेताना दिसून येत आहेत. चुकीच्या औषधांची फवारणी अथवा औषधाचे अधिक प्रमाण यामुळे निर्यातक्षम द्राक्षांची प्रतवारी घसरण्याचा धोका टाळण्याची कसरत शेतकºयांना करावा लागत आहे.त्यामुळे शेती तज्ज्ञांकडून द्राक्ष बागांच्या अंतीम टप्प्यात योग्य औषध व औषधाचे प्रमाण याविषयी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच फवारणी करताना कमी कार्यक्षमतेपासून मध्यम कार्यक्षमतेचे फवारणी यंत्रे वापरण्यासोबतच फवारणीमुळे मण्यांवर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही. अथवा फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा. जैविक नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबिटलीस आणि अ‍ॅम्पिलोमायसीस यांचा वापर शक्य आहे. तसेच फवारणीद्वारे पोटॅशिअम व कॅल्शियमचा वापर केल्यास बुरशीनियंत्रणाला फायदा होत असल्याचा शेतकºयांमध्ये समज आहे. परंतु, सध्याच्या बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही औषध अथवा उर्वरक वापरतांना शेतकºयांनी कृषितज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक बनले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिकagricultureशेती