शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

विल्होळीला पाणीपुरवठा करणारा बंधारा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 18:01 IST

विल्होळी व परिसराला पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी पाणीपुरवठा करणा-या विल्होळी बंधा-याची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली असून, उष्णतेचे वाढलेले तापमान व त्यातच या बंधा-यातून वारेमाप होणारा उपसा पाहता, आगामी पंधरा दिवसांपुरताच पाणी साठा पुरण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देमोटारी काढण्याचे आवाहन : चारा छावणीची मागणी

विल्होळी : वाढत्या उन्हामुळे व पाण्याच्या अतिवापरामुळे यंदा प्रथमच गावाला पाणीपुरवठा करणारा विल्होळी बंधारा आटला असून, पंधरा दिवसांत पाऊस न आल्यास विल्होळीकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. विल्होळी व परिसरात पाणीपुरवठा करणारे विल्होळी बंधाऱ्यातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागल्याने ग्रामपंचायतीस आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीची वेळ आली असून, बंधाºयावर बसविण्यात आलेले कृषिपंप तत्काळ काढून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

विल्होळी व परिसराला पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी पाणीपुरवठा करणा-या विल्होळी बंधा-याची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली असून, उष्णतेचे वाढलेले तापमान व त्यातच या बंधा-यातून वारेमाप होणारा उपसा पाहता, आगामी पंधरा दिवसांपुरताच पाणी साठा पुरण्याची चिन्हे आहेत. या बंधा-यातून शेतीसाठीदेखील मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जातो. त्यामुळे हा उपसा असाच सुरू राहिल्यास बंधारा कोरडाठाक पडेल. त्याला पर्याय म्हणून पाणीपुरवठ्याची कोणतीही सोय वा व्यवस्था नसून तसे झाल्यास विल्होळीकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे या बंधा-यातून पाणी घेणा-या शेतकऱ्यांनी आपले कृषिपंप ताबडतोब काढून घ्यावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. त्याला काही शेतक-यांनी तत्काळ प्रतिसादही दिला असून, अनेकांनी ते काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सध्याच्या वाढत्या उन्हामुळे जनावरांना मुबलक चारा, पाणी मिळत नसल्याने दररोज १२ ते १५ लिटर दूध देणारी जनावरे पाच ते सहा लिटरवर आल्याने दुधाच्या भावामध्ये वाढ झाली आहे. काही जनावरे धरणांमध्ये पाणी मिळत नसल्याने धोका पत्करून दलदलीसारख्या भागात उतरून पाण्याचा शोध घेत असल्याचे चित्र आहे. विल्होळी व परिसर हा नाशिक शहराच्या लगत असल्याने या ठिकाणी दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. उन्हाच्या दाहकतेने परिसरात चाºयाची कमतरता भासत असल्यामुळे शेतकºयांनी चारा छावणीची मागणी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक