शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

देवळा तालुक्यात दुष्काळी स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:27 IST

देवळा : अत्यल्प पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागात खरीप पिके पूर्णपणे वाया गेल्यानंतर रब्बीचा हंगाम देखील आता घेता येणार नाही, यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ठ ओढवले असून आगामी दुष्काळातील भयावह परिस्थितीचे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे.

देवळा : अत्यल्प पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागात खरीप पिके पूर्णपणे वाया गेल्यानंतर रब्बीचा हंगाम देखील आता घेता येणार नाही, यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ठ ओढवले असून आगामी दुष्काळातील भयावह परिस्थितीचे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. विहीरींनी तळ गाठण्यास सुरूवात केली आहे. शेतात असलेली पीके देखील हाती येण्याची आता शाश्वती राहीलेली नाही. शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच तालुक्यातील धरण, बंधारे, पाझर तलाव आदीतील पाणी साठे आरक्षित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात रामेश्वर येथील किशोर सागर धरण,वाजगाव येथील के.टी. वेअर, कनकापूर, वार्शी धरणात पाणी असल्यामुळे परिस्थिती थोडीफार बरी आहे. उमराणे येथील परसुल, दहिवड येथील चिंचलवण धरणात अत्यल्प पाण्याचा साठा असून तो पिण्यासाठी आरक्षित होणे आवश्यक आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. मेंढपाळ व गुराख्यांना आपल्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु अवैध पाणी उपशामुळे लवकरच पाण्याचे हे स्त्रोत कोरडे होउन नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. पाण्याच्या टंचाईमुळे उन्हाळी कांदा लागवडीवर गंभीर परिणाम होणार आहे. परतीच्या पावसाच्या भरवशावर शेतकºयांनी उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतात टाकले आहे. परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे उन्हाळी कांदा लागवड आता अशक्यप्राय झाली आहे. सुरूवातीला लागवड केलेल्या पोळ कांद्यावर पडलेला करपा, चाळीत साठवणुक केलेला उन्हाळी कांदा सडल्यामुळे झालेले नुकसान आदी कारणांमुळे कांद्याचे बाजारभाव चांगलेच वधारले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग कमी दिवसात येणाºया रांगडा कांदा लागवडीकडे वळला असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात लागवड सुरू आहे. परंतु कांद्याच्या रोपांची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकºयांना रोपे मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. कांद्याच्या रोपांना सोन्याचे मोल प्राप्त झाले आहे. रांगडा कांदा लागवड केल्यापासून तो काढणीला यईपर्यंत पाणी पुरेल का?याबाबत कोणतीही शाश्वती नसतांना थंडी पडल्यानंतर कमी पाण्यात कांदा निघून येईल ह्या आशेवर शेतकरी नशिबाचा खेळ खेळत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक