शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
3
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
6
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
7
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
8
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
9
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
10
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
11
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
12
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
13
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
14
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
15
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
16
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
17
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
18
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
19
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
20
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

टंचाईबरोबरच नियोजनाचा दुष्काळ

By admin | Updated: May 15, 2016 00:36 IST

कळवण : एकही टँकर सुरू नसलेला एकमेव तालुका

 मनोज देवरे  कळवणशासनाच्या कागदावर कळवण तालुका सुजलाम्, सुफलाम् आणि पाण्याने विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे, परंतु वास्तव वेगळेच आहे. ज्या आदिवासी बांधवांनी तालुक्यात जलाशयाचे प्रकल्प व्हावेत यासाठी प्रयत्न केले. त्याच आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे. शासकीय यंत्रणेचे उंबरठे झजविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन - चार किलोमीटरच्या परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी आहे; मात्र गावाच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या पडल्याने पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे. दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण हा तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे; पुनंद आणि ओतूर खोऱ्यातील डोंगर-कपारीतील आदिवासी वस्ती-पाडे या गाव-वस्तींना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत; परंतु विहीर तसेच विंधन विहिरींना पाणी नाही. कारण या भागातील नैसर्गिक जलस्रोत नदी-नाले, बंधारे, तलाव, पाणी अडवून जिरवण्याचे छोटे बंधारे, विहिरी कोरडेठाक पडले आहेत, ही तालुक्याची आजची वस्तुस्थिती आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने त्याचा परिणाम शेती क्षेत्राला आणि त्यावर अवलंबून असलेल्या मनुष्यबळ, शेतीपूरक व्यवसायांना भोगावे लागत आहे. हाताला काम नसलेले हजारो शेतमजूर बेकार झालेले आहेत. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत पिण्यासाठी ग्लासभर तरी पाणी मिळवावे तर त्यासाठी वणवण करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. टंचाईच्या मोठ्या झळा कळवण तालुक्यामध्येही बसत आहेत. पाण्याची झळ बसणारे नागरिक टँकरची मागणी करत आहेत, तर शासन विहीर अधिग्रहणावर भर देत आहे. जवळील शेतात पाणी सुरू झाले की, घरात असेल-नसेल तेवढी रिकामी भांडी भरून घेण्यासाठी सर्वांची धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. पाणी आपल्याला मुबलक मिळाले पाहिजे, अशी मानसिकता झाली आहे. पण विखुरलेल्या लोकवस्त्यांवर आळी-पाळीने दररोज पाणी पुरवताना ग्रामपंचायतींनादेखील कसरत करावी लागत असून, या परिस्थितीला तोंड देताना यंत्रणेच्या नाकीनव आले आहेत. ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेद्वारे दर दिवशी अर्धातास पाणी दिले जाते. काही भागात मिळते तर काही भागात तेही मिळत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना आपल्यावर पाणी पुरवताना अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागत आहे. तर अनेकदा नळाच्या पाण्यावरून नागरिकांमध्ये भांडणे होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गावातील पाण्याचे स्रोत दुरूस्ती कामात घोळ झाल्याने पावसाळ्यात यात जमा होणारे पाणी हिवाळ्याच्या मध्यात झिरपून वाया जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील विहिरी, आड यांच्या भूजल पातळीत भर पडली नाही. परिणामी भोवताली पाणी असूनही पिण्यास पाणी नाही, अशी एकंदरीत तालुक्याची स्थिती झाली आहे.