शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

दुष्काळी सत्यमापन चाचणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 17:55 IST

सिन्नर : तालुक्यात अत्यल्प पावसाचे प्रमाण व गंभीर दुष्काळी परिस्थिती या दोन्ही निकषात तालुक्याचा समावेश झाल्यानंतर आता पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी दुष्काळी सत्यमापन चाचणीस प्रारंभ झाला आहे.

सिन्नर : तालुक्यात अत्यल्प पावसाचे प्रमाण व गंभीर दुष्काळी परिस्थिती या दोन्ही निकषात तालुक्याचा समावेश झाल्यानंतर आता पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी दुष्काळी सत्यमापन चाचणीस प्रारंभ झाला आहे. त्यानुसार तालुक्यातील १३ गावांची निवड करण्यात आली असून तेथे पीक नुकसानीची खातरजमा करण्यात येत आहे.७ आॅक्टोबर २०१७ च्या शासननिर्णयानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी घालून दिलेल्या निकषांची चाचपणी करण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली गतिमान झाल्या आहेत. अल्प पर्जन्यमान व त्यामुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती आणि ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान या तीन निकषांच्या आधारे शासन दुष्काळ जाहीर करते. त्यात पहिल्या दोन निकषात तालुका बसला असून, तिसऱ्या निकषातही खरिप पिकांचे नुकसान ३३ टक्कयांपेक्षा अधिक आहे. मात्र त्याची खातरजमा करण्याचे काम कृषी आयुक्त व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले आहे. महसूल विभागातील मंडळ अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या पथकात कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.पथकातील सदस्य प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी करत आहे. शेतातील पावसाअभावी खरोखरच किती टक्के पीक हे बाधित झालेले आहे याची निश्चिती केली जाणार आहे.तालुक्यातील विंचूरदळवी येथे पीक नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या अधिकाºयांनी सोयाबीनच्या शेतात पीक कापणी प्रयोग केले. त्यात एकरी सरासरी दीड क्विंटल एवढे अल्प उत्पादन निघाले. प्रत्यक्षात एकरी सात ते आठ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळणे अपेक्षीत असते. त्यामुळे तालुक्यात खरीप उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र आहे. विंचुरदळवी येथे सोयाबिन, मका, भात यांची पाहणी ग्रामविकास अधिकारी संजय गिरी, कृषी सहायक महेशकुमार गरुड, तलाठी कविता गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम दळवी, भास्कर चंद्रे,बी. के. दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब भोर, नंदू भोर यांनी केली. शेतात जाऊन नुकसानीची मोजमाप करण्यात आले. 

टॅग्स :droughtदुष्काळ