शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
4
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
5
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
6
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
7
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
8
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
9
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
10
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
11
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
12
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
13
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
14
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
15
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
16
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
17
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
18
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
19
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
20
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

दुष्काळी सत्यमापन चाचणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 17:55 IST

सिन्नर : तालुक्यात अत्यल्प पावसाचे प्रमाण व गंभीर दुष्काळी परिस्थिती या दोन्ही निकषात तालुक्याचा समावेश झाल्यानंतर आता पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी दुष्काळी सत्यमापन चाचणीस प्रारंभ झाला आहे.

सिन्नर : तालुक्यात अत्यल्प पावसाचे प्रमाण व गंभीर दुष्काळी परिस्थिती या दोन्ही निकषात तालुक्याचा समावेश झाल्यानंतर आता पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी दुष्काळी सत्यमापन चाचणीस प्रारंभ झाला आहे. त्यानुसार तालुक्यातील १३ गावांची निवड करण्यात आली असून तेथे पीक नुकसानीची खातरजमा करण्यात येत आहे.७ आॅक्टोबर २०१७ च्या शासननिर्णयानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी घालून दिलेल्या निकषांची चाचपणी करण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली गतिमान झाल्या आहेत. अल्प पर्जन्यमान व त्यामुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती आणि ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान या तीन निकषांच्या आधारे शासन दुष्काळ जाहीर करते. त्यात पहिल्या दोन निकषात तालुका बसला असून, तिसऱ्या निकषातही खरिप पिकांचे नुकसान ३३ टक्कयांपेक्षा अधिक आहे. मात्र त्याची खातरजमा करण्याचे काम कृषी आयुक्त व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले आहे. महसूल विभागातील मंडळ अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या पथकात कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.पथकातील सदस्य प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी करत आहे. शेतातील पावसाअभावी खरोखरच किती टक्के पीक हे बाधित झालेले आहे याची निश्चिती केली जाणार आहे.तालुक्यातील विंचूरदळवी येथे पीक नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या अधिकाºयांनी सोयाबीनच्या शेतात पीक कापणी प्रयोग केले. त्यात एकरी सरासरी दीड क्विंटल एवढे अल्प उत्पादन निघाले. प्रत्यक्षात एकरी सात ते आठ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळणे अपेक्षीत असते. त्यामुळे तालुक्यात खरीप उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र आहे. विंचुरदळवी येथे सोयाबिन, मका, भात यांची पाहणी ग्रामविकास अधिकारी संजय गिरी, कृषी सहायक महेशकुमार गरुड, तलाठी कविता गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम दळवी, भास्कर चंद्रे,बी. के. दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब भोर, नंदू भोर यांनी केली. शेतात जाऊन नुकसानीची मोजमाप करण्यात आले. 

टॅग्स :droughtदुष्काळ