शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भुसे यांच्याकडून दुष्काळ आढावा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:29 IST

मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला.

मालेगाव : मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला.तालुक्यात दोन महिन्यात फक्त १०० मि.मी. पाऊस झाला असून पेरणी झालेले क्षेत्र होरपळून गेले आहे. तालुक्यातील विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. गुरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमजुरांना काम नाही. मालेगाव तालुक्यात सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस झाला आहे. आता पाऊस आला तरी पिकांच्या उत्पन्नात ५० टक्के घट होणार आहे. शेतकºयांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. या सर्व बाबींचा विचार करुन मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा बैठक भुसे यांनी ३ आॅगस्ट रोजी घेतली असून अधिकाºयांना टंचाई परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. भुसे यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा गेल्या शुक्रवारी सौंदाणे, नांदगाव, चिंचावड, आघार खु., पाटणे, वाके, मुंगसे, टेहरे येथे तर रविवारी सायने खु., दहिकुटे, माणके, चिखलओहोळ, नाळे, शेंदुर्णी, साजवहाळ, भिलकोट, देवारपाडे, गुगुळवाड, पळासदरे, झोडगे, कंधाणे, दहिदी, करंजगव्हाण, लेंडाणे, वडगाव या गावांचाल दौरा केला. सदर गावातील नागरिकांशी दुष्काळी परिस्थितीबाबत संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. सदर दौºयाप्रसंगी भुसे यांचे समवेत तालुका प्रमुख संजय दुसाने, शहर प्रमुख श्रीराम मिस्तरी, जि. प. सदस्य दादाजी शेजवळ, प्रमोद पाटील, तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, पाणीपुरवठा अधिकारी पगार, पशुवैद्यकीय अधिकारी चव्हाण, वीज वितरणचे वडगे, सांगोडे, इवद उपअभियंता सूर्यवंशी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते.त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देशतालुक्यात झालेल्या अल्प पावसामुळे चाराटंचाई, पाणीटंचाई, गुरांसाठी छावणी, दुबार पेरणीचे संकट या भविष्यात उद्भवणाºया समस्यांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी दक्ष रहावे, असे आवाहन राज्यमंत्री भुसे यांनी दौºयाप्रसंगी ग्रामस्थांना केले. आपल्या गावात टंचाईबाबत कोणकोणत्या उपाययोजना करता येतील. प्रत्येक गावातील समस्यांची अधिकाºयांनी तातडीने नोंद घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :droughtदुष्काळMalegaonमालेगांव