शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

भुसे यांच्याकडून दुष्काळ आढावा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:29 IST

मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला.

मालेगाव : मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला.तालुक्यात दोन महिन्यात फक्त १०० मि.मी. पाऊस झाला असून पेरणी झालेले क्षेत्र होरपळून गेले आहे. तालुक्यातील विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. गुरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमजुरांना काम नाही. मालेगाव तालुक्यात सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस झाला आहे. आता पाऊस आला तरी पिकांच्या उत्पन्नात ५० टक्के घट होणार आहे. शेतकºयांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. या सर्व बाबींचा विचार करुन मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा बैठक भुसे यांनी ३ आॅगस्ट रोजी घेतली असून अधिकाºयांना टंचाई परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. भुसे यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा गेल्या शुक्रवारी सौंदाणे, नांदगाव, चिंचावड, आघार खु., पाटणे, वाके, मुंगसे, टेहरे येथे तर रविवारी सायने खु., दहिकुटे, माणके, चिखलओहोळ, नाळे, शेंदुर्णी, साजवहाळ, भिलकोट, देवारपाडे, गुगुळवाड, पळासदरे, झोडगे, कंधाणे, दहिदी, करंजगव्हाण, लेंडाणे, वडगाव या गावांचाल दौरा केला. सदर गावातील नागरिकांशी दुष्काळी परिस्थितीबाबत संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. सदर दौºयाप्रसंगी भुसे यांचे समवेत तालुका प्रमुख संजय दुसाने, शहर प्रमुख श्रीराम मिस्तरी, जि. प. सदस्य दादाजी शेजवळ, प्रमोद पाटील, तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, पाणीपुरवठा अधिकारी पगार, पशुवैद्यकीय अधिकारी चव्हाण, वीज वितरणचे वडगे, सांगोडे, इवद उपअभियंता सूर्यवंशी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते.त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देशतालुक्यात झालेल्या अल्प पावसामुळे चाराटंचाई, पाणीटंचाई, गुरांसाठी छावणी, दुबार पेरणीचे संकट या भविष्यात उद्भवणाºया समस्यांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी दक्ष रहावे, असे आवाहन राज्यमंत्री भुसे यांनी दौºयाप्रसंगी ग्रामस्थांना केले. आपल्या गावात टंचाईबाबत कोणकोणत्या उपाययोजना करता येतील. प्रत्येक गावातील समस्यांची अधिकाºयांनी तातडीने नोंद घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :droughtदुष्काळMalegaonमालेगांव