शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात तेरावा : सर्वसामान्यांच्या खिशाला झळ; व्यापाऱ्यांची खरेदीसाठी बाहेरच्या बाजारपेठेत धाव

By admin | Updated: March 24, 2016 22:41 IST

उन्हाच्या तडाख्याने पालेभाज्या कडाडल्या

सिन्नर : सलग पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शेतीसाठी पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. उन्हाळाचा तडाखा वाढताच शेतकऱ्यांकडील भाजीपाला संपुष्टात आला आहे. लग्नसराई व पाणीटंचाईमुळे भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडे भाजीपाला नसल्याने व्यापाऱ्यांनाही माल खरेदीसाठी घोटी व नाशिकच्या बाजारपेठेत धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्यास प्रारंभ झाला आहे. फाल्गुन महिन्यातच वैशाख वणव्याची अनुभूती येऊ लागली आहे. ऊन तापल्याने विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे लागवड केलेला भाजीपाला येईलच याची शाश्वती नाही. कांद्याचे भावही काही प्रमाणात कमी झाल्याने व पाण्याची शाश्वती नसल्याने अनेकांनी कांद्याची पात बाजारात विक्रीसाठी आणल्याचेही चित्र आहे. उन्हाच्या तडाख्याचा परिणाम भाजीपाल्याच्या किमतीवर झाला आहे. गेल्या महिन्यात असलेले भाजीपाल्याचे भाव दुपटीने वाढल्याने सर्वसामान्यांना भाजीबाजारात जाताना खिसा गरम ठेवून जावे लागत आहे. अनेकदा फ्लॉवर व कोबीचे गड्डे बळजबरीने विक्री केले जातात. मात्र त्यांनाही उन्हाच्या तडाख्यामुळे चांगला भाव आला आहे. भेंडी ४० रुपये तर हिरवी मिरची ७० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. उन्हाळ्यामुळे काकडी व लिंबालाही चांगला भाव आला आहे. काकडी ४० रुपये तर लिंब ७० रुपये किलोदराने विकले जात आहेत. ढोबळी मिरची ४० रुपये, तर गवार ८० रुपये किलो झाली आहे. गाजर ३० ते ४० रुपये किलो असून, शेवग्याच्या शेंगाचेही भाव कडाकडले आहेत. वाढत्या उन्हासोबतच पालेभाज्यांचे भावही वाढत जातील यात शंका नाही.