शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:53 IST

ब्राह्मणगांव : बागलाणच्या पूर्व भागात या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने आत्ताच दुष्काळी परिस्थिती जाणवू लागली आहे.

ठळक मुद्देब्राह्मणगांव : जनावरांसाठी चाऱ्याची शोधाशोध सुरु ; मका पिकाचे क्षेत्र घटले पन्नास टक्के

ब्राह्मणगांव : बागलाणच्या पूर्व भागात या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने आत्ताच दुष्काळी परिस्थिती जाणवू लागली आहे.पावसाच्या भरवशावर शेतकºयांनी खरीपची पिके घेतलीखरी पण पाऊसच न आल्याने खरीप पिकांची वाढ न झाल्याने जनावरांसाठी चाºयाचा बिकट प्रश्न निर्माण झाला असून पुढील काळात पशुधन कसे जगवावे या विवचनेत शेतकरी आहेत. आधीच मका पिकाचे क्षेत्र पन्नास टक्के घटले असल्यामुळे चाºयाचा प्रश्न जास्त गंभीर झाला आहे . परिसरात पाऊस न आल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी आत्ताच कमी झाली असून शेती ऐवजी पिण्याच्या पाण्याच्या संकटाची भिती वाडू लागली आहे. पिकांना आत्ताच पाणी नसल्याने लाल कांदा व उन्हाळ कांद्याची लागवड ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील उन्हाळ कांद्याला अद्या थोडाफार भाव वाढला असला तरी वातावरणात उष्मा वाढल्याने तो कांदा किती काळ टिकेल यांची खात्री देता येत नाही. मात्र पाण्याचे संकट सर्वात जास्त असून खरीपाचे उत्पन्न हातात आले नाही व रब्बीची पाण्यामुळे उत्पन्न न येण्याचे स्पष्टचित्र असल्याने येत्या दिवाळी सणावर ही त्याचा परिणाम होणार आहे. पशुधन जगवण्यासाठी शेतकºयांनी आत्ताच चाºयाची शोधाशोध सुरु केली आहे. त्यामुळे इकडून तिकडून चारा संग्रही करत असल्यामुळे चाºयाचे भावही वाढले आहेत. पुढील काळात दुष्काळी चित्र पाहता शासनाने योग्य ती दखल घेऊन योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.