शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
3
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
4
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
5
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
6
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
7
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
8
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
9
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
10
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
11
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
12
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
13
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
14
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
15
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
16
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
17
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
18
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
19
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
20
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

दुष्काळी तालुक्यांना शेतकरी आत्महत्येचे ग्रहण! 

By श्याम बागुल | Updated: November 14, 2018 15:23 IST

नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून सुरू झालेल्या या आत्महत्येच्या सत्रात दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये साधारणत: २२ ते ४५ असा तरूण वयोगटातील शेतक-यांचा समावेश

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा पैकी आठ तालुके शासनाने दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू केल्या असल्या तरी, वाढत्या शेतकरी आत्महत्येचे सत्र थोपविण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे उभे ठाकले आहे. विशेष करून मालेगाव, बागलाण, दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेतक-यांच्या लागोपाठ होणा-या आत्महत्येमुळे सरकारच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, आत्महत्या करू पाहणा-या शेतक-यांसाठी मात्र या दुष्काळी उपाययोजनेत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून सुरू झालेल्या या आत्महत्येच्या सत्रात दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये साधारणत: २२ ते ४५ असा तरूण वयोगटातील शेतकºयांचा समावेश अधिक चिंताजनक आहे. शेतकरी आत्महत्येची वाढती संख्या विचार करायला लावणारी असली तरी, अशा आत्महत्येमागच्या कारण मिमांसा देखील तितक्याच विचार करायला लावणा-या आहेत. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या करणाºया शेतकºयाच्या कुटूंबियाला शासनाकडून एक लाखाची आर्थिक मदत दिली जात असून, अशी मदत देताना शेतक-याच्या नावावर शेती, सावकार अथवा बॅँकांचे कर्ज असल्याची खात्री केली जाते. पोलीस,महसूल व कृषी विभागाकडून सर्वकष चौकशी केली जात असल्याने एकूण ८९ शेतक-यांपैकी फक्त २६ शेतक-यांनीच कर्जबाजारीपण व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, ४९ शेतकºयांनी केलेल्या आत्महत्यांमागे वैैयक्तीक कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात प्रामुख्याने नैराश्य, घरगुती भांडणे, व्यसन अशा कारणांमुळे आत्महत्या झाल्याचे सरकारी अहवालात म्हटलेले आहे. १४ आत्महत्येच्या घटनेची अद्यापही चौकशी केली जात आहे.जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या मालेगाव, दिंडोरी व पाठोपाठ बागलाण तालुक्यात झाल्या आहेत. यातील विशेष म्हणजे शासनाने दुष्काळ जाहीर करतांना पहिल्या टप्प्यातून दिंंडोरी तालुक्याला वगळले होते. नंतर काही मंडळांचा समावेश करण्यात आला तर निफाड तालुक्यात १२ शेतकºयांनी आत्महत्या करूनही या तालुक्याला दुष्काळापासून वंचित ठेवण्यात आले. दुष्काळी म्हणून गणल्या जाणाºया येवला, चांदवड, देवळा या तालुक्यात मात्र शेतकरी आत्महत्येची संख्या अगदीच अल्प आहे तर पेठ व सुरगाणा या दोन तालुक्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केलेली नाही. नोव्हेंबर अखेरच जिल्ह्यात चारा, पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यात आत्महत्येच्या वाढत्या सत्राने भर पडली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक