शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

दुष्काळी तालुक्यांना शेतकरी आत्महत्येचे ग्रहण! 

By श्याम बागुल | Updated: November 14, 2018 15:23 IST

नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून सुरू झालेल्या या आत्महत्येच्या सत्रात दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये साधारणत: २२ ते ४५ असा तरूण वयोगटातील शेतक-यांचा समावेश

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा पैकी आठ तालुके शासनाने दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू केल्या असल्या तरी, वाढत्या शेतकरी आत्महत्येचे सत्र थोपविण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे उभे ठाकले आहे. विशेष करून मालेगाव, बागलाण, दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेतक-यांच्या लागोपाठ होणा-या आत्महत्येमुळे सरकारच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, आत्महत्या करू पाहणा-या शेतक-यांसाठी मात्र या दुष्काळी उपाययोजनेत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून सुरू झालेल्या या आत्महत्येच्या सत्रात दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये साधारणत: २२ ते ४५ असा तरूण वयोगटातील शेतकºयांचा समावेश अधिक चिंताजनक आहे. शेतकरी आत्महत्येची वाढती संख्या विचार करायला लावणारी असली तरी, अशा आत्महत्येमागच्या कारण मिमांसा देखील तितक्याच विचार करायला लावणा-या आहेत. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या करणाºया शेतकºयाच्या कुटूंबियाला शासनाकडून एक लाखाची आर्थिक मदत दिली जात असून, अशी मदत देताना शेतक-याच्या नावावर शेती, सावकार अथवा बॅँकांचे कर्ज असल्याची खात्री केली जाते. पोलीस,महसूल व कृषी विभागाकडून सर्वकष चौकशी केली जात असल्याने एकूण ८९ शेतक-यांपैकी फक्त २६ शेतक-यांनीच कर्जबाजारीपण व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, ४९ शेतकºयांनी केलेल्या आत्महत्यांमागे वैैयक्तीक कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात प्रामुख्याने नैराश्य, घरगुती भांडणे, व्यसन अशा कारणांमुळे आत्महत्या झाल्याचे सरकारी अहवालात म्हटलेले आहे. १४ आत्महत्येच्या घटनेची अद्यापही चौकशी केली जात आहे.जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या मालेगाव, दिंडोरी व पाठोपाठ बागलाण तालुक्यात झाल्या आहेत. यातील विशेष म्हणजे शासनाने दुष्काळ जाहीर करतांना पहिल्या टप्प्यातून दिंंडोरी तालुक्याला वगळले होते. नंतर काही मंडळांचा समावेश करण्यात आला तर निफाड तालुक्यात १२ शेतकºयांनी आत्महत्या करूनही या तालुक्याला दुष्काळापासून वंचित ठेवण्यात आले. दुष्काळी म्हणून गणल्या जाणाºया येवला, चांदवड, देवळा या तालुक्यात मात्र शेतकरी आत्महत्येची संख्या अगदीच अल्प आहे तर पेठ व सुरगाणा या दोन तालुक्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केलेली नाही. नोव्हेंबर अखेरच जिल्ह्यात चारा, पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यात आत्महत्येच्या वाढत्या सत्राने भर पडली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक