शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

गंभीरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 7:26 PM

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गंभीरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर समृद्धी महामार्गामध्ये गेली असून सदर विहिरीच्या लगत असलेला आजूबाजूचा भूखंड खोदकाम केल्याने विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचले असल्यामुळे जवळपास अंदाजे चौदाशे ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या गंभीरवाडी ग्रामस्थांना मॅहनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात संघर्ष करावा लागत आहे.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गंभीरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर समृद्धी महामार्गामध्ये गेली असून सदर विहिरीच्या लगत असलेला आजूबाजूचा भूखंड खोदकाम केल्याने विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचले असल्यामुळे जवळपास अंदाजे चौदाशे ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या गंभीरवाडी ग्रामस्थांना मॅहनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात संघर्ष करावा लागत आहे.केवळ समृद्धी महामार्गाच्या खोदकाम कामकाजामूळे येथील सार्वजनिक विहिरीवरचा ग्रामस्थांसाठी असलेला रस्ता बंद झाला व सदर खोदलेल्या भागामुळे खड्ड्यातील विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी या ग्रामस्थांना मिळत नाही.तसेच ग्रामपंचायत ने केलेल्या पर्यायी मार्गाने जवळपास चार किलोमीटर दूर अंतरावरून सुविधा केलेले पाणी तीन चार दिवसानंतर येथील वाडीतील पाण्याच्या टाकीत येते परंतु सदर पाण्याची देखील दुरवस्था झालेली असल्याने येथील ग्रामस्थांना ते पाणी सुद्धा गढूळ स्थितीत मिळत आहे.परिणामी येथील ग्रामस्थ याच पाण्यावर अवलंबून आहेत.स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी यांनी देखील या प्रश्नाकडे कानाडोळा केला आहे.तरी ही पिण्याच्या पाण्याची सुविधा व हा मूलभूत प्रश्न स्थानिक प्रशासनाने व लोप्रतिनिधी यांनी लवकरात सोडवावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.प्रतिक्रि या :चालू वर्षी सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असतांना भर उन्हाळ्यात आमच्या ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष केलीच परंतु ऐन पावसाळ्यात देखील आम्हांला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर याच्या सारखं दुसरं दुर्दैव कुठलं समजावं.आता तरी हा तीव्र ज्वलंत प्रश्न सोडवावा अशी आमची प्रमुख मागणी आहे.- जगदीश डगळे (ग्रामस्थ गंभीरवाडी)फोटो : समृद्धी महामार्गाच्या खोदकामामुळे गंभीरवाडीतील सार्वजनिक विहिरीत साचलेले पावसाचे गढूळ पाणी तर दुसर्या छायाचित्रात समृध्दी महामार्गाचे झालेले खोदकाम.(फोटो स्वतंत्र पाठवतो.)