शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सुकलेले झाडं अन् चुकलेले नाना !

By श्याम बागुल | Updated: December 19, 2020 14:42 IST

ज्या सैनिकांच्या बळावर तीस वर्षे गड भक्कम ठेवला, त्या सैनिकांचे बळ गेल्या निवडणुकीत अचानक कमी होणे तसे म्हटले तर शक्यच नाही.

ठळक मुद्दे कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही ‘सुकलेल्या झाडांचाही’ हात होता हे नाकारता येणार नाही.

श्याम बागुल /नाशिक‘सुकलेल्या झाडांना पाणी घालून काय उपयोग’ असा व्यावहारिक व वास्तवादी सवाल उपस्थीत करून सेनेच्या नाना घोलप यांनी आपल्या पुर्वाश्रमीच्या फुलमाळा विक्रीच्या व्यवसायाचे अनुभवाचे बोल शिवसेनेच्या नवनिर्वाचित महानगर प्रमुखांसह जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना सुनावले. त्यांचे हे अनुभवाचे बोल अर्थातच आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने होऊ पहात असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीशी संभाव्य युतीच्या चर्चेने होता हे एरव्ही सर्वांच्या लक्षात आले असेल.

गेली तीस वर्षे आमदारकी व त्यापेक्षाही अधिक वर्षे समाजकारण-राजकारणात घातलेल्या नाना घोलप यांचा हा सल्ला देण्यामागचा हेतू देखील तितकाच शुद्ध होता. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद नसतानाही या दोन्ही पक्षांना आगामी महापालिका निवडणुकीत सेनेबरोबर घेतल्यास सेनेच्या मदतीने या दोन्ही पक्षांना उर्जितावस्था मिळेल, परिणामी या निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या सेनेच्या सैनिकांवर अन्याय होईल अशी भावना नाना घोलप यांची त्यामागे होती व असावी असे मानल्यास ती योग्यच आहे असे म्हणावे लागेल. परंतु हाच न्याय अन्य बाबतीत लावायचा म्हटल्यास नाना घोलप यांना आपला स्वपक्ष याच राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या मदतीने सत्तेवर आला हे विसरून कसे चालेल ? एक मात्र खरे लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपा व सेनेने कॉँग्रेस व राष्ट्रवादीला आपल्याच पातळीवर निष्प्रभ ठरविले होते. स्वत: नाना घोलप यांचा पुत्र देखील देवळाली मतदार संघाच्या मैदानात उतरलेला असताना नाना घोलपांनी पूत्र योगेश व राष्ट्रवादीच्या प्रतिस्पर्धी सरोज अहिरे या दोघांच्या मस्तिष्काच्या रेषा पाहून भविष्य वर्तविले होते व निवडणुकीपूर्वी सेनेचा व पर्यायाने योगेशचा विजय झाल्याचे भाकीत केले होते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर नाना घोलपांनी वर्तविलेले भविष्य खोटे ठरले व शिवसेनेचा सलग तीस वर्षे बालेकिल्ला असलेला देवळालीचा गड कोसळला. बहुधा हाच पराभव नानांच्या अधिक जिव्हारी लागलेला असावा. सलग तीस वर्षे मतदार संघाच्या विकासाचा ध्यास घेवून प्रत्येकाच्या सुख-दुखात सहभागी होवूनही मतदारांनी नाना घोलप यांना दिलेल्या धोक्याचा धक्का ते अजुनही पचवू शकलेले नाहीत. नाना घोलपांनी तीस वर्षे मतदार संघ ताब्यात ठेवतांना केलेल्या ‘नाना क्लृप्त्या’ पाहता, त्यांच्या आजवरच्या विजयात कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही ‘सुकलेल्या झाडांचाही’ हात होता हे नाकारता येणार नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी निष्प्रभ ठर(वि)लेल्या राष्ट्रवादीच्या नवख्या उमेदवाराने नाना घोलपांचा पराभव करणे म्हणजेच सुकलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. राहिला प्रश्न नाना घोलप यांना शिवसैनिकांच्या पडलेल्या काळजीचा तर तो देखील रास्तच म्हणावा लागेल. ज्या सैनिकांच्या बळावर तीस वर्षे गड भक्कम ठेवला, त्या सैनिकांचे बळ गेल्या निवडणुकीत अचानक कमी होणे तसे म्हटले तर शक्यच नाही. मात्र कळत न कळत सलग तीस वर्षे या सैनिकांकडे नाना घोलपांचे दुर्लक्ष होणे व त्यांनीही निवडणुकीत धडा शिकविण्याची बाब उशीराने का होईना नाना घोलपांच्या लक्षात आले असेल हे काय कमी?

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBabanrao Gholapबबनराव घोलपNashikनाशिकdevlali-acदेवळाली