शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

संसार बहरण्यापूर्वीच भंगले स्वप्न

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

मालेगाव : सूर्यनारायणाचा प्रकोप आणि व्यवस्थेने त्याचा बळी घेतला.

मालेगाव : नुकतेच त्याचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेले, नवीन संसार अधिक बहारदार कसा करता येईल, आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या स्वत:च्या घराला कसे सावरता येईल या विचाराने दिवसरात्र तो काबाडकष्ट करून पोलीस भरतीची तयारी करत होता. त्यानुसार पोलीस भरतीसाठी तो मुंबईत गेलाही. पण... दुर्दैव पोलीस खात्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिलेच. सूर्यनारायणाचा प्रकोप आणि व्यवस्थेने त्याचा बळी घेतला. येथील द्याने भागातील गणेशनगर भागात राहणाऱ्या अंबादास बबन सोनवणे या २३ वर्षीय तरुणाची ही कहानी. दोनच दिवसांपूर्वी अंबादास हा शहर परिसरातील आपल्या जवळपास २० मित्रांसह मुंबईत पोलिस भरतीसाठी गेला. तेथे गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भरतीसाठी सर्व मित्र पांगले. अंबादास स्वत: विक्रोळी येथे गेला. दिवसभर तेथे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असताना भरतीदरम्यान अतिथकवा, अतिउष्मा व सोबत पोलीस प्रशासनातर्फे पोलीस भरतीसाठी राबविण्यात येत असलेली ढिसाळ प्रक्रिया याचा अंबादास बळी ठरला. अंबादासच्या घरी ही बातमी कळताच प्रथमत: त्यांचा विश्वास बसेना. सदर बातमी सांगणाऱ्यास त्यांनी नावात काही चूक असेल असे म्हणत समोरच्याची व आपल्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने ही बातमी खरी होती. पतीनिधनानंतर प्लास्टीक गिट्टी कारखान्यात काम करून अंबादासच्या आईने मोठ्या धिराने कुटुंबाचा गाडा हाकलला होता. तीन मुलींच्या लग्नापाठोपाठ तिघा मुलांचीही लग्ने केली. अंबादास हा सर्वात लहान. पोलीस होऊन कुटुंबाला सावरण्याचे, मोठा आधार देण्याचे अंबादासचे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले. सकाळी मुंबईहून त्याचे पार्थिव मालेगावी आणल्यानंतर द्याने स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)