शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

लाल कांद्याचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:52 IST

जळगाव नेऊर : आठ दिवसापासुन मुसळधार पावसाने पिकांची नासाडी सुरु असुन अगोदरच कांदा लागवडी अखेरच्या घटका मोजत असतांना कांदा पिक व कांदा रोपांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेले असतांना मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या कांदा लागवडी धुऊन नेल्याने लाल कांद्याचे स्वप्न भंगले असुन रांगडा कांद्याची रोपे खराब झाल्याने रांगडा कांद्याच्या लागवडी होतात की नाही अशी शंका निर्माण झाली आहे

ठळक मुद्देमका, सोयाबिनचा आधार : मुसळधार पावसाने कांदा पीक, रोपांची नासाडी

जळगाव नेऊर : आठ दिवसापासुन मुसळधार पावसाने पिकांची नासाडी सुरु असुन अगोदरच कांदा लागवडी अखेरच्या घटका मोजत असतांना कांदा पिक व कांदा रोपांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेले असतांना मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या कांदा लागवडी धुऊन नेल्याने लाल कांद्याचे स्वप्न भंगले असुन रांगडा कांद्याची रोपे खराब झाल्याने रांगडा कांद्याच्या लागवडी होतात की नाही अशी शंका निर्माण झाली आहे ,शेतकरी थोड्या फार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड करण्याच्या बेतात शेतकरी असतांना मुसळधार पावसाने शेतच तयार होत नसल्याने उरलीसुरली रोपेही जमिनीत सडत असुन ब-याच प्रमाणात कांदा रोपांची सड ,कुज होत आहे, लावलेले कांदा रोप पिळ मारत असुन करपाही मोठया प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दहा ते बारा दिवसापासून रोज रोज भाग बदलून मुसळधार पाऊस येत असल्याने कांदा रोपे व लावलेले कांदे पिवळी पडुन आपोआप नष्ट होत असुन मोठ्या प्रमाणात शेतकरी जमिनीतुन पुरक खते व महागड्या बुरशीनाशकांच्या फवारण्या करु नही फरक पडत नसल्याने येवला तालुक्यातील शेतकर्यांचे लाल कांद्याचे स्वप्न भंगण्याचे शक्यता निर्माण झाली आहे.अनेक शेतकर्यांनी पोळ कांद्यासाठी जमिन राखीव ठेवलेल्या आहेत पण वातावरणातील बदलामुळे रोपेच सडुन गेल्याने शेतकरी जमिन पडीक ठेवण्यापेक्षा इतर पिके घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोपे सडुन गेल्याने व लागवड केलेले कांदाही जमिनीत तग धरत नसल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटणार असल्याने पोळ कांदा भाव खाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.खरिपातील मका, सोयाबीनचा आधारअगोदर शेतकर्यांच्या कांदा लागवडी नष्ट होत चालल्याने शेतकर्यांना खिरपातील मका सोयाबीन हे पिके आधार देणारे ठरणार असून शेतकर्यांची अशा मका, सोयाबीन पिकाकडे वळाली आहे. जमिनीतून कांदाच आपोआप नष्ट झाल्याने अनेक शेतकरी कांदा रोपे नसल्याने इतर पिके घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच अनेक शेतकरी दुसर्या जिल्ह्यातून कांदा रोपांची शोधाशोध करत असून महागडी रोपे ही खरेदी करत आहे.कोट2020 हे वर्ष शेतकर्यांसाठी फारच कठीण जात आहे.लॉकडाऊन मुळे आधीच शेतकर्यांचे कंबरडे मोडले असताना आस्मानी संकटाने शेतकरी धास्तावला आहे. अतिशय महागडे कांदा बियाणे टाकून 80 टक्के रोप वाफ्यातच सडले आहे. लावलेले कांदे पण अति पावसाने खराब झाले आहे. सध्या शेतकर्यांची आशा मका आण िसोयाबीन पिकांवरच अवलंबून आहे. परंतु सध्या असलेले पावसाळी वातावरण बघता तेही हातात येईल की नाही शंका आहे.- किशोर शिंदे,जळगाव नेऊर 

टॅग्स :onionकांदाRainपाऊस