शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सोयगावसह कॉलन्यांना घाण-कचऱ्याचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:24 IST

सोयगाव व परिसराचा मोठ्या झपाट्याने विस्तार होत आहे. सोयगाव परिसराचा हद्दवाढीत समावेश होऊन आता दहा वर्षांचा काळ उलटत आला, मात्र अजूनही गटारी व मोकळ्या भूखंडावरील कचºयाची समस्या जैसे थे आहे. विशेष म्हणजे घंटागाडीची सुविधा असूनही नागरिक मोकळ्या भूखंडावर कचरा टाकत आहेत. यामुळे नागरिकांची उदासीनता दिसून येत आहे.

ठळक मुद्देमालेगाव : हद्दवाढीतील नागरिक अद्यापही नागरी सुविधांच्या प्रतीक्षेत

मालेगाव : सोयगाव व परिसराचा मोठ्या झपाट्याने विस्तार होत आहे. सोयगाव परिसराचा हद्दवाढीत समावेश होऊन आता दहा वर्षांचा काळ उलटत आला, मात्र अजूनही गटारी व मोकळ्या भूखंडावरील कचºयाची समस्या जैसे थे आहे. विशेष म्हणजे घंटागाडीची सुविधा असूनही नागरिक मोकळ्या भूखंडावर कचरा टाकत आहेत. यामुळे नागरिकांची उदासीनता दिसून येत आहे.सोयगाव परिसरात प्रभाग क्रमांक १५ चा समावेश होतो. इतर प्रभागांच्या तुलनेत या प्रभागाचा विस्तार मोठा आहे. यात सोयगाव नववसाहत, पार्श्वनाथनगर, तुळजाई कॉलनी, पवननगर, गोविंदनगर, दौलतनगर, सिद्धिविनायक कॉलनी, स्वप्नपूर्तीनगर, आनंदनगर आदी भागांचा समावेश होतो. या प्रभागातील थोड्या फार प्रमाणात रस्ते सोडले तर बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत; मात्र प्रभागातील कचºयाची समस्या कायम आहे.प्रभाग क्रमांक १५ मध्ये पवननगर भागात तर जयरामनगर येथे महिलांसाठी उद्यान साकारले आहे, मात्र अजून काही भागातील नागरिक सुसज्ज उद्यानाच्या प्रतीक्षेत आहेत. येथील इंदिरानगर भागात शौचालयांचा प्रश्न गंभीर आहे. या भागात सार्वजनिक शौचालयांची गरज आहे. या प्रभागातील बंद पडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.या परिसरात मोकळे पटांगण असल्यामुळे नागरिक या ठिकाणीच कचरा टाकून दुर्गंधी पसरवित आहेत. त्यामुळे बंद पडलेले प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. काही भागात अजूनही कच्चे रस्ते असल्याने पावसाळ्यात नागरिकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.काही ठिकाणी गटारी आहेत मात्र येथील रहिवाशांनीच या गटारींमध्ये आपल्या घरातील सांडपाणी तसेच शोषखड्डा पाणी सोडल्यामुळे गटारी तुडुंब भरलेल्या आहेत. मनपाचे कर्मचारी सदर गटारी स्वच्छ करूनही या एक दिवसानंतर पुन्हा जैसे थे होत आहेत. त्यामुळे परिसरात डास, मच्छर, चिलटे आदींचे साम्राज्य निर्माण झाले आहे.जुन्या सोयगाव भागात दर रविवारी बाजार भरतो, मात्र बाजार उठून गेल्यावर विक्र ेते याठिकाणी भाजीपाल्याचा कचरा येथेच टाकून निघून जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. प्रभागात बºयाच ठिकाणी गटारीदेखील तुंबलेल्या आहेत. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.सोयगावसह परिसरातील बहुतांश कॉलन्यांमध्ये मोकळ्या भूखंडावर नागरिक कचरा टाकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. डास, मच्छर, चिलटे आदींचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका प्रशासनाने नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी.- संदीप पाटील, नागरिकघंटागाडी येते, मात्र मोकळ्या भूखंडावरील कचºयाच्या ढिगाऱ्यांची समस्या कायम आहे. त्यामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यात फवारणी होत नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- महेश पवार, नागरिक

टॅग्स :pollutionप्रदूषण