शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

मलवाहिकांसाठी  ४१६ कोटींचा डीपीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:20 IST

शहरात नववसाहतीत मलवाहिकांचे जाळे वाढविण्यासाठी आणि चार मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ४१६ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केला असून, तो राज्य शासनाला सादर केला आहे. तांत्रिक छाननीनंतर केंद्र सरकारच्या नदी संवर्धन योजनेत या कामांचा समावेश व्हावा यासाठी तो पाठविला जाणार आहे.

नाशिक : शहरात नववसाहतीत मलवाहिकांचे जाळे वाढविण्यासाठी आणि चार मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ४१६ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केला असून, तो राज्य शासनाला सादर केला आहे. तांत्रिक छाननीनंतर केंद्र सरकारच्या नदी संवर्धन योजनेत या कामांचा समावेश व्हावा यासाठी तो पाठविला जाणार आहे.  शहरातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाणीपुरवठा आणि मलवाहिकांचे जाळे सुधारण्यावर भर दिला आहे. शहरात नववसाहतीत मलवाहिकांचे नेटवर्क टाकणे आणि अन्य कामांसाठी महापालिकेने यापूर्वी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून तो शासनाला पाठविला होता. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत हा निधी पाठविण्यात आला असला तरी नाशिक शहरासाठी मंजूर असलेला सर्व निधी वितरित झाला असल्याने शासनाने निधी देण्यास नकार दिला होता.  दरम्यान, ५ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिकेच्या विकासकामांच्या आढाव्यादरम्यान या कामांसाठी केंद्र शासनाच्या राष्टय निधी संवर्धन योजनेअंतर्गत निधी देता येईल असे सांगतानाच महापालिकेला विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने आराखडा तयार करून तो राज्य शासनाकडे सादर केला आहे. राज्य शासनाचा पर्यावरण विभाग त्याची तपासणी करून तो महिना अखेरीस केंद्र शासनाकडे पाठविणार आहे.  या योजनेअंतर्गत शहरात २१० किलोमीटर लांबीच्या मलवाहिका टाकण्यात येणार आहे. तसेच तपोवन, आगरटाकळी, दसक-पंचक आणि चेहेडी अशा चार मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदापात्रातील प्रदूषण कमी होण्यासदेखील मदत होणार आहे.महापालिकेला आर्थिक दिलासा शक्ययापूर्वी अमृत योजनेअंतर्गत महापालिकेला निधी न मिळाल्याने महापालिकेने स्वनिधीतून मलवाहिकांची कामे करण्याचे ठरविले होते. त्यासाठी ११० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा मागविल्या होत्या. यावर्षी मलवाहिकांसाठी ५० कोटी तर पुढील वर्षी ५० कोटी अशी कामे करण्यात येणार होती; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने महापालिकेला मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.आता दहा बीओडीमनपाच्या वतीने चार मलनिस्सारण केंद्रातील कालबाह्य तंत्रज्ञान बाजूला सारून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे सध्या ३० बीओडी इतके प्रक्रियायुक्त मलजल नदीपात्रात सोडले जाते ते आता १० बीओडी इतक्या मर्यादेत करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नदीपात्रात होणारे प्रदूषण टाळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका