शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

मलवाहिकांसाठी  ४१६ कोटींचा डीपीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:20 IST

शहरात नववसाहतीत मलवाहिकांचे जाळे वाढविण्यासाठी आणि चार मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ४१६ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केला असून, तो राज्य शासनाला सादर केला आहे. तांत्रिक छाननीनंतर केंद्र सरकारच्या नदी संवर्धन योजनेत या कामांचा समावेश व्हावा यासाठी तो पाठविला जाणार आहे.

नाशिक : शहरात नववसाहतीत मलवाहिकांचे जाळे वाढविण्यासाठी आणि चार मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ४१६ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केला असून, तो राज्य शासनाला सादर केला आहे. तांत्रिक छाननीनंतर केंद्र सरकारच्या नदी संवर्धन योजनेत या कामांचा समावेश व्हावा यासाठी तो पाठविला जाणार आहे.  शहरातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाणीपुरवठा आणि मलवाहिकांचे जाळे सुधारण्यावर भर दिला आहे. शहरात नववसाहतीत मलवाहिकांचे नेटवर्क टाकणे आणि अन्य कामांसाठी महापालिकेने यापूर्वी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून तो शासनाला पाठविला होता. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत हा निधी पाठविण्यात आला असला तरी नाशिक शहरासाठी मंजूर असलेला सर्व निधी वितरित झाला असल्याने शासनाने निधी देण्यास नकार दिला होता.  दरम्यान, ५ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिकेच्या विकासकामांच्या आढाव्यादरम्यान या कामांसाठी केंद्र शासनाच्या राष्टय निधी संवर्धन योजनेअंतर्गत निधी देता येईल असे सांगतानाच महापालिकेला विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने आराखडा तयार करून तो राज्य शासनाकडे सादर केला आहे. राज्य शासनाचा पर्यावरण विभाग त्याची तपासणी करून तो महिना अखेरीस केंद्र शासनाकडे पाठविणार आहे.  या योजनेअंतर्गत शहरात २१० किलोमीटर लांबीच्या मलवाहिका टाकण्यात येणार आहे. तसेच तपोवन, आगरटाकळी, दसक-पंचक आणि चेहेडी अशा चार मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदापात्रातील प्रदूषण कमी होण्यासदेखील मदत होणार आहे.महापालिकेला आर्थिक दिलासा शक्ययापूर्वी अमृत योजनेअंतर्गत महापालिकेला निधी न मिळाल्याने महापालिकेने स्वनिधीतून मलवाहिकांची कामे करण्याचे ठरविले होते. त्यासाठी ११० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा मागविल्या होत्या. यावर्षी मलवाहिकांसाठी ५० कोटी तर पुढील वर्षी ५० कोटी अशी कामे करण्यात येणार होती; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने महापालिकेला मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.आता दहा बीओडीमनपाच्या वतीने चार मलनिस्सारण केंद्रातील कालबाह्य तंत्रज्ञान बाजूला सारून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे सध्या ३० बीओडी इतके प्रक्रियायुक्त मलजल नदीपात्रात सोडले जाते ते आता १० बीओडी इतक्या मर्यादेत करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नदीपात्रात होणारे प्रदूषण टाळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका