शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नेत्यांचे राजकारण नको, नागरीकांना दिलासा हवाय!

By संजय पाठक | Updated: May 6, 2021 15:11 IST

नाशिक- राजकारण कुठे आणि किती करावे याला ही मर्यादा आहेत. परंतु सध्या नाशिक महापालिकेच्या निवडणूकांच्या तोंडावर सर्वांनीच तीलांजली दिल्याचे दिसत आहे. डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील ऑक्सीजन गळतीनंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आता प्रकरण गंभीर होत चालले आहे. रूग्णांना दिलासा देण्याऐवजी राजकारणाचे सुरू झालेले खेळ थांबत नसल्याने आता सर्वसामान्य नागरीकांना उबग येत आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे सर्वसामान्य बेहाल राजकारणी मात्र आराेप प्रत्यारोपात व्यस्त

नाशिक-राजकारण कुठे आणि किती करावे याला ही मर्यादा आहेत. परंतु सध्या नाशिक महापालिकेच्या निवडणूकांच्या तोंडावर सर्वांनीच तीलांजली दिल्याचे दिसत आहे. डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील ऑक्सीजन गळतीनंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आता प्रकरण गंभीर होत चालले आहे. रूग्णांना दिलासा देण्याऐवजी राजकारणाचे सुरू झालेले खेळ थांबत नसल्याने आता सर्वसामान्य नागरीकांना उबग येत आहे.

अर्थात, असे राजकारण केवळ स्थानिक पातळीवर सुरू आहे अशातला भाग नाही. राज्य आणि केंद्रातील भिन्न सरकारांमुळे सध्या जे मदत आणि अत्यावश्यक उपचार सुविधा आणि वाढणारे रूग्ण यावरून जे राजकारण सुरू आहे. तेच आता स्थानिक पातळीवर देखील दिसत आहे.

गेल्या महिन्यात २१ एप्रिल रोजी महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सीजन गळती झाली. त्यात २२ जणांचे मृत्यू झाले. त्यामुळे थेट महापालिकेतील सत्ता म्हणून भाजपावर दोषारोप करण्यापासून महापौरांचा राजीनामा मागण्यापर्यंत विरोधकांनी राजकारण केले. वास्तविक, महापालिकेतील ठेके हे केवळ सत्तारूढ पक्षाचे नेते देतात असे नाही तर ज्या स्थायी समितीत ठेक्यांना अंतिम रूप दिले जाते. तेथे सर्वपक्षीय सदस्य असतात. स्थायी समितीत कोणताचा पक्ष नसतो, सर्व एक दिलाने काम करीत असतात. अशावेळी ठेकेदारीवरून सत्तारूढ भाजपाला धारेवर धरणारे नेते मग स्थायी समितीत सदस्य असणाऱ्या आपल्या सदस्यांना जाब का विचारत नाहीत हा खरे तर प्रश्न आहे.

ऑक्सीजन गळती प्रकरणावरील राजकारण थांबत नाही तोच देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दाैऱ्यावरून राजकारण सुरू झाले. बिटको रूग्णालयात त्यांनी भेट घेऊन आढावा देण्याचा प्रयत्न केला. त्यावर सेना आणि राष्ट्रवादीने प्रश्न उपस्थित केले. त्यावरूनही मग सेना भाजपा आणि राष्ट्रवादीत जुंपली. आधीच नागरीक कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अत्यंत त्रस्त आहे. खासगी रूग्णालयात बेड मिळत नाही, ऑक्सीजन मिळत नाही आणि रेमडेसिवरचा ताबा प्रशासनाने घेऊन सुध्दा काळ्याबाजारात खरेदी करावी लागत आहे. अशावेळी नागरीकांना अशा प्रकारचे राजकारण अपेक्षीत नाही. किंबहूना त्यांना त्याकडे लक्ष देण्यास देखील वेळ नाही. त्यांना नगरसेवक, राजकीय पक्षांकडून सध्या कोरोना बाबत उपचारात मदत हवी आहे, आणि त्यासाठी ते झगडत आहे. अत्यंत संकट काळात जो मदत देईल तो आपला अशी त्यांची भूमिका आहे. आणि तेच भविष्यातील राजकारण आणि निवडणूकीत उपयुक्त ठरणार आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप नव्हे!

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण