शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

कर्जाची सवलत नको; संपूर्ण कर्जमाफी तरच चर्चा! शेतकरी संघर्ष समितीने भूमिका केली स्पष्ट

By संदीप भालेराव | Updated: August 14, 2023 18:05 IST

जिल्हा बँकेने सुरू केलेल्या कर्जवसुलीच्या विरोधात गेल्या ७७ दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी उपोषणाला बसले असून शासन दरबारी अजूनही याबाबत तोडगा निघालेला नाही.

नाशिक : व्याजात सवलत नको तर आम्हाला संपूर्ण कर्जमाफी हवी आहे. याविषयावरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, अन्यथा शेतकऱ्यांचे गेल्या ७७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका शेतकरी संघर्ष समितीने घेतली आहे.

जिल्हा बँकेने सुरू केलेल्या कर्जवसुलीच्या विरोधात गेल्या ७७ दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी उपोषणाला बसले असून शासन दरबारी अजूनही याबाबत तोडगा निघालेला नाही. मध्यंतरी मुंबईत सहकार मंत्र्यांबरोबर बैठक झाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनातही बैठक झाली. मात्र, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही.

याप्रकरणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी रविवारी (दि.१३) पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबरच बैठक घेण्याचेही सुचिवले. मात्र, शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी याच मुद्यावर चर्चा होऊ शकते असे सांगून आम्हाला व्याजात सवलत नको, तर संपूर्ण कर्जमाफी हवी, अशी आग्रही मागणी आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे यांनी केली.

आंदोलनाची शासनाने दखल घेतली नसल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. जिल्हा बँकेची सक्तीची कर्ज वसुली व जिल्हा बँकेच्या जमीन जप्तीची कारवाई आणि शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उताऱ्यावरील नाव शेतकऱ्यांच्या नावाऐवजी जिल्हा बँकेचे व विकास संस्थेचे नाव लावण्याची कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी, अशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. याबाबत जिल्हा बँकेची लवकरच सहकार मंत्री व अर्थमंत्री यांच्यासमवेत बैठक घेण्याचे व तसे पत्र आजच देत असल्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.

आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे यांनी जोपर्यंत शासन योग्य तो निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, असे सांगितले. भुसे यांनीदेखील आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत जिल्हा बँकेसंदर्भात सन्माननीय तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला. यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे व काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, दगाजी आहेर, रमेश बापू अहिरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक