शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

कर्जाची सवलत नको; संपूर्ण कर्जमाफी तरच चर्चा! शेतकरी संघर्ष समितीने भूमिका केली स्पष्ट

By संदीप भालेराव | Updated: August 14, 2023 18:05 IST

जिल्हा बँकेने सुरू केलेल्या कर्जवसुलीच्या विरोधात गेल्या ७७ दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी उपोषणाला बसले असून शासन दरबारी अजूनही याबाबत तोडगा निघालेला नाही.

नाशिक : व्याजात सवलत नको तर आम्हाला संपूर्ण कर्जमाफी हवी आहे. याविषयावरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, अन्यथा शेतकऱ्यांचे गेल्या ७७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका शेतकरी संघर्ष समितीने घेतली आहे.

जिल्हा बँकेने सुरू केलेल्या कर्जवसुलीच्या विरोधात गेल्या ७७ दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी उपोषणाला बसले असून शासन दरबारी अजूनही याबाबत तोडगा निघालेला नाही. मध्यंतरी मुंबईत सहकार मंत्र्यांबरोबर बैठक झाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनातही बैठक झाली. मात्र, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही.

याप्रकरणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी रविवारी (दि.१३) पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबरच बैठक घेण्याचेही सुचिवले. मात्र, शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी याच मुद्यावर चर्चा होऊ शकते असे सांगून आम्हाला व्याजात सवलत नको, तर संपूर्ण कर्जमाफी हवी, अशी आग्रही मागणी आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे यांनी केली.

आंदोलनाची शासनाने दखल घेतली नसल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. जिल्हा बँकेची सक्तीची कर्ज वसुली व जिल्हा बँकेच्या जमीन जप्तीची कारवाई आणि शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उताऱ्यावरील नाव शेतकऱ्यांच्या नावाऐवजी जिल्हा बँकेचे व विकास संस्थेचे नाव लावण्याची कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी, अशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. याबाबत जिल्हा बँकेची लवकरच सहकार मंत्री व अर्थमंत्री यांच्यासमवेत बैठक घेण्याचे व तसे पत्र आजच देत असल्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.

आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे यांनी जोपर्यंत शासन योग्य तो निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, असे सांगितले. भुसे यांनीदेखील आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत जिल्हा बँकेसंदर्भात सन्माननीय तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला. यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे व काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, दगाजी आहेर, रमेश बापू अहिरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक