शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

लिलाव बंद ठेवुन बळीराजावर अन्याय नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 00:59 IST

देवळा : कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात लॉकडाउन लावून बाजार समितीमध्ये लिलाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये विकेंद्रीकरण पद्धत सुरू झाली असून ती खरच शेतकऱ्यांना फायद्याची आहे का? हा प्रश्न निर्माण झाला असून लॉक डाऊन काळात एक दिवसाआड शेतीमालाचे लिलाव सुरू ठेवावेत अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देव्यापारी ठरवेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागणार

देवळा : कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात लॉकडाउन लावून बाजार समितीमध्ये लिलाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये विकेंद्रीकरण पद्धत सुरू झाली असून ती खरच शेतकऱ्यांना फायद्याची आहे का? हा प्रश्न निर्माण झाला असून लॉक डाऊन काळात एक दिवसाआड शेतीमालाचे लिलाव सुरू ठेवावेत अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.चालूवर्षी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट, व कांदा बियाण्यात झालेल्या फसवणुकीमुळे उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटले आहे. मजुरांची टंचाई, नैसर्गिक आपत्ती आदी अनेक संकटांचा सामना करत मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक घेतले. हा कांदा शेतकऱ्यांनी चाळीत साठवणुक करून ठेवला आहे.अनेक अल्पभूधारक शेतकरी खरीप हंगामा करता भांडवल उभे करण्यासाठी चाळीतील कांदा बाजारात विक्री साठी आणतात. परंतु चालूवर्षी शेतकऱ्यांनी चाळीत नुकताच साठवणूक करून ठेवलेला कांदा सडण्यास सुरूवात झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.परंतु लॉक डाऊन मुळे बाजार समितीमध्ये लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या वाढल्या आहेत. विकेंद्रीकरण पद्धत शेतकऱ्यांना पसंत नाही. परंतु खरीप हंगामाच्या तोंडावर त्यांना आर्थिक भांडवल उभारण्यासाठी नाईलाजास्तव कांदा विकावा लागणार आहे.किमान दिवसाआड का होईना बाजार समितीमध्ये सर्व शेतीमालाचे लिलाव सुरू ठेवावेत अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने, प्रदेश संघटक कृष्णा जाधव, अभिमन पगार, भगवान जाधव आदींनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांना निवेदनाद्धारे केली आहे.एकदा चाळीमधून काढलेला कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीत भरायला साधारण पणे पाच मजूर लागतात. प्रत्येक मजुराला प्रत्येकी २५० रु प्रमाणे एकूण १००० रु खर्च येतो. ट्रॅक्टर मार्केटला म्हणजे व्यापारी खळ्यावर घेऊन जाणे यासाठी ट्रॅक्टर भाडे १००० रु ते २००० रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागते. व्यापाऱ्यांच्या खळ्यावर व्यापारी ठरवेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागणार आहे. शेतकऱ्यांपुढे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.- कुबेर जाधव, संपर्क प्रमुख, राज्य कांदा उत्पादक संघटना.कोरोना नियमांचे पालन करून शेतकऱ्यांच्या फायद्याची असलेली लिलाव पद्धत सुरू व्हावी, हीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. लॉकडाउन वाढविण्यात आला तर कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसेल, पुढे पेरणीचे दिवस येतील तेंव्हा स्वताचे भांडव‌ल असणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी आज काही प्रमाणात कांदा विक्रीस आणतो आहे.- जयदिप भदाणे, जिल्हाध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक संघटना. (१३ देवळा कांदा, १)

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड