शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

लिलाव बंद ठेवुन बळीराजावर अन्याय नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 00:59 IST

देवळा : कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात लॉकडाउन लावून बाजार समितीमध्ये लिलाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये विकेंद्रीकरण पद्धत सुरू झाली असून ती खरच शेतकऱ्यांना फायद्याची आहे का? हा प्रश्न निर्माण झाला असून लॉक डाऊन काळात एक दिवसाआड शेतीमालाचे लिलाव सुरू ठेवावेत अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देव्यापारी ठरवेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागणार

देवळा : कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात लॉकडाउन लावून बाजार समितीमध्ये लिलाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये विकेंद्रीकरण पद्धत सुरू झाली असून ती खरच शेतकऱ्यांना फायद्याची आहे का? हा प्रश्न निर्माण झाला असून लॉक डाऊन काळात एक दिवसाआड शेतीमालाचे लिलाव सुरू ठेवावेत अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.चालूवर्षी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट, व कांदा बियाण्यात झालेल्या फसवणुकीमुळे उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटले आहे. मजुरांची टंचाई, नैसर्गिक आपत्ती आदी अनेक संकटांचा सामना करत मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक घेतले. हा कांदा शेतकऱ्यांनी चाळीत साठवणुक करून ठेवला आहे.अनेक अल्पभूधारक शेतकरी खरीप हंगामा करता भांडवल उभे करण्यासाठी चाळीतील कांदा बाजारात विक्री साठी आणतात. परंतु चालूवर्षी शेतकऱ्यांनी चाळीत नुकताच साठवणूक करून ठेवलेला कांदा सडण्यास सुरूवात झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.परंतु लॉक डाऊन मुळे बाजार समितीमध्ये लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या वाढल्या आहेत. विकेंद्रीकरण पद्धत शेतकऱ्यांना पसंत नाही. परंतु खरीप हंगामाच्या तोंडावर त्यांना आर्थिक भांडवल उभारण्यासाठी नाईलाजास्तव कांदा विकावा लागणार आहे.किमान दिवसाआड का होईना बाजार समितीमध्ये सर्व शेतीमालाचे लिलाव सुरू ठेवावेत अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने, प्रदेश संघटक कृष्णा जाधव, अभिमन पगार, भगवान जाधव आदींनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांना निवेदनाद्धारे केली आहे.एकदा चाळीमधून काढलेला कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीत भरायला साधारण पणे पाच मजूर लागतात. प्रत्येक मजुराला प्रत्येकी २५० रु प्रमाणे एकूण १००० रु खर्च येतो. ट्रॅक्टर मार्केटला म्हणजे व्यापारी खळ्यावर घेऊन जाणे यासाठी ट्रॅक्टर भाडे १००० रु ते २००० रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागते. व्यापाऱ्यांच्या खळ्यावर व्यापारी ठरवेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागणार आहे. शेतकऱ्यांपुढे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.- कुबेर जाधव, संपर्क प्रमुख, राज्य कांदा उत्पादक संघटना.कोरोना नियमांचे पालन करून शेतकऱ्यांच्या फायद्याची असलेली लिलाव पद्धत सुरू व्हावी, हीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. लॉकडाउन वाढविण्यात आला तर कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसेल, पुढे पेरणीचे दिवस येतील तेंव्हा स्वताचे भांडव‌ल असणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी आज काही प्रमाणात कांदा विक्रीस आणतो आहे.- जयदिप भदाणे, जिल्हाध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक संघटना. (१३ देवळा कांदा, १)

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड