शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
6
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
7
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
8
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
9
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
10
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
11
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
12
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
13
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
14
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
15
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
16
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
17
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
18
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
19
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
20
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!

माझ्या अंत्यविधीला कोणालाही बोलावू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:41 IST

देवळा : विवाह, अंत्यविधी व दशक्रिया विधीला होणारी गर्दी कोरोना संक्रमण वाढण्याचे प्रमुख कारण ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शासनाने अशा कार्यक्रमांवर निर्बंध घालूनही गर्दी कमी होताना दिसत नाही. मात्र, मृत्यूच्या दारात असलेली एखादी व्यक्ती आपल्या मुलांजवळ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझ्या अंत्यविधीला कोणालाही बोलावू नका, अशी अंतिम इच्छा व्यक्त करत सामाजिक हित जपते आणि मुलेही नातेवाईक व भाऊबंदांना तशी कल्पना देऊन अंत्यविधीला न येण्याची विनंती करतात. कापशी येथील भदाणे कुटुंबीयात ही घटना घडली आहे.

ठळक मुद्देअंतिम समयी इच्छा : कोरोना रोखण्यासाठी जपले सामाजिक हित

देवळा : विवाह, अंत्यविधी व दशक्रिया विधीला होणारी गर्दी कोरोना संक्रमण वाढण्याचे प्रमुख कारण ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शासनाने अशा कार्यक्रमांवर निर्बंध घालूनही गर्दी कमी होताना दिसत नाही. मात्र, मृत्यूच्या दारात असलेली एखादी व्यक्ती आपल्या मुलांजवळ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझ्या अंत्यविधीला कोणालाही बोलावू नका, अशी अंतिम इच्छा व्यक्त करत सामाजिक हित जपते आणि मुलेही नातेवाईक व भाऊबंदांना तशी कल्पना देऊन अंत्यविधीला न येण्याची विनंती करतात. कापशी येथील भदाणे कुटुंबीयात ही घटना घडली आहे.कापशी येथील रहिवासी व जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक दिनकर चिंधू भदाणे ( ८१) यांना दि. २२ एप्रिल रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी यांच्याजवळ त्यांचे ज्येष्ठ पुत्र चंद्रशेखर हे होते. वडिलांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी चंद्रशेखर यांची धावपळ सुरू झाली. यावेळी दिनकररावांनी सर्व कुटुंबीयांना जवळ बोलावून सांगितले की, आता माझे काही खरे नाही, देशभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. आपले नातेवाईक व मित्र परिवार मोठा आहे. अशा परिस्थितीत कुणालाही माझ्या अंत्यविधीला बोलावून धोका पत्करू नका, सर्वांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा, अशी इच्छा व्यक्त करून त्यांनी जगाचा निरोप घेतला.त्यांच्या इच्छेचा मान राखून त्यांची मुले चंद्रशेखर, सुनील आणि रमेश यांनी सर्व नातेवाईक व स्नेहींना दूरध्वनीद्वारे माहिती देऊन कोरोनाची भीषण परिस्थिती लक्षात घेता, अंत्यसंस्कार, तसेच मृत्यूपश्चात सांत्वनासाठी दारावर येणे व पुढील होणाऱ्या धार्मिक विधींसाठी कुणीही येऊ नये, अशी विनंती केली. आपल्या अंतिम समयी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एखादी व्यक्ती आपली शेवटची इच्छाही समाजाचे हित पाहत असल्याची ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.अंत्यविधीला होणारी गर्दी हा प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. आजच्या परिस्थितीत ही मनोवृत्ती बदलली पाहिजे. सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. खोट्या प्रतिष्ठेपायी कुणाचाही जीव धोक्यात घालू नका, ही वडिलांची अंतिम इच्छा होती.- चंद्रशेखर भदाणे, कापशी.

टॅग्स :Deathमृत्यूSocialसामाजिक