शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

माझ्या अंत्यविधीला कोणालाही बोलावू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:41 IST

देवळा : विवाह, अंत्यविधी व दशक्रिया विधीला होणारी गर्दी कोरोना संक्रमण वाढण्याचे प्रमुख कारण ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शासनाने अशा कार्यक्रमांवर निर्बंध घालूनही गर्दी कमी होताना दिसत नाही. मात्र, मृत्यूच्या दारात असलेली एखादी व्यक्ती आपल्या मुलांजवळ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझ्या अंत्यविधीला कोणालाही बोलावू नका, अशी अंतिम इच्छा व्यक्त करत सामाजिक हित जपते आणि मुलेही नातेवाईक व भाऊबंदांना तशी कल्पना देऊन अंत्यविधीला न येण्याची विनंती करतात. कापशी येथील भदाणे कुटुंबीयात ही घटना घडली आहे.

ठळक मुद्देअंतिम समयी इच्छा : कोरोना रोखण्यासाठी जपले सामाजिक हित

देवळा : विवाह, अंत्यविधी व दशक्रिया विधीला होणारी गर्दी कोरोना संक्रमण वाढण्याचे प्रमुख कारण ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शासनाने अशा कार्यक्रमांवर निर्बंध घालूनही गर्दी कमी होताना दिसत नाही. मात्र, मृत्यूच्या दारात असलेली एखादी व्यक्ती आपल्या मुलांजवळ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझ्या अंत्यविधीला कोणालाही बोलावू नका, अशी अंतिम इच्छा व्यक्त करत सामाजिक हित जपते आणि मुलेही नातेवाईक व भाऊबंदांना तशी कल्पना देऊन अंत्यविधीला न येण्याची विनंती करतात. कापशी येथील भदाणे कुटुंबीयात ही घटना घडली आहे.कापशी येथील रहिवासी व जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक दिनकर चिंधू भदाणे ( ८१) यांना दि. २२ एप्रिल रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी यांच्याजवळ त्यांचे ज्येष्ठ पुत्र चंद्रशेखर हे होते. वडिलांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी चंद्रशेखर यांची धावपळ सुरू झाली. यावेळी दिनकररावांनी सर्व कुटुंबीयांना जवळ बोलावून सांगितले की, आता माझे काही खरे नाही, देशभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. आपले नातेवाईक व मित्र परिवार मोठा आहे. अशा परिस्थितीत कुणालाही माझ्या अंत्यविधीला बोलावून धोका पत्करू नका, सर्वांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा, अशी इच्छा व्यक्त करून त्यांनी जगाचा निरोप घेतला.त्यांच्या इच्छेचा मान राखून त्यांची मुले चंद्रशेखर, सुनील आणि रमेश यांनी सर्व नातेवाईक व स्नेहींना दूरध्वनीद्वारे माहिती देऊन कोरोनाची भीषण परिस्थिती लक्षात घेता, अंत्यसंस्कार, तसेच मृत्यूपश्चात सांत्वनासाठी दारावर येणे व पुढील होणाऱ्या धार्मिक विधींसाठी कुणीही येऊ नये, अशी विनंती केली. आपल्या अंतिम समयी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एखादी व्यक्ती आपली शेवटची इच्छाही समाजाचे हित पाहत असल्याची ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.अंत्यविधीला होणारी गर्दी हा प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. आजच्या परिस्थितीत ही मनोवृत्ती बदलली पाहिजे. सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. खोट्या प्रतिष्ठेपायी कुणाचाही जीव धोक्यात घालू नका, ही वडिलांची अंतिम इच्छा होती.- चंद्रशेखर भदाणे, कापशी.

टॅग्स :Deathमृत्यूSocialसामाजिक