शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

जमिनी घेऊन रान पेटविण्याची वेळ आणू नका

By admin | Updated: July 2, 2016 00:28 IST

जितेंद्र आव्हाड : गोंदेच्या शेतकरी मेळाव्यात मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेला कडाडून विरोध

सिन्नर : शासन एक्स्प्रेस वे कशासाठी करत आहे तेच कळत नाही. तो इंडस्ट्रीयल बेल्टचा भाग नाही. मग मार्ग करण्याचा अट्टहास का, असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी मंत्री व आमदार जितेेंद्र आव्हाड यांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचे पाप करू नका, अशा शब्दात शासनाला सुनावले. उगाच शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करून रान पेटवण्याची वेळ आणू नका, असा सज्जड दमच आमदार आव्हाड यांनी सरकारला भरला.सिन्नर तालुक्यातल्या गोंदे येथे मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार आव्हाड बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री तुकाराम दिघोळे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड, तानाजी जायभावे, विष्णुपंत म्हैसधुणे, पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र घुमरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, डॉ. विष्णू अत्रे, शांताराम ढोकणे, हरिभाऊ तांबे, दिग्विजय गर्जे, रामदास जायभावे, सरपंच उषा सोनवणे, भरत तांबे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांना विश्वास घेऊन त्यांच्याशी संपर्क साधणे गरजेचे होते. मात्र कोणतेही माहिती न दिल्याने शेतकरी घाबरले असल्याचे आव्हाड म्हणाले. जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय लढा सुरुच ठेवणार असल्याचे आव्हाड म्हणाले. जोपर्यंत या आंदोलनाचा मार्ग दिसत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना गावबंदी करा असे आव्हाड यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या लढ्यात विशेषत: महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. डी. एल कराड यांनी शेतकऱ्यांना गुळवंच व मुसळगावच्या शेतकऱ्यांचा अनुभव समोर ठेवा असे सांगितले. शेतकऱ्यांची दीड लाखाने घेतलेली जमिन एक ते दोन कोटी रुपयांना विकली जात असल्याचे ते म्हणाले. या महामार्गासंबंधात आपली जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरुन दलालांची सोय करण्याचा विचार असल्याचे आपल्याला जाणवल्याचे ते म्हणाले. जमिनीपेक्षा किंमतीवान दुसरे काही नाही. त्यामउळे एकत्रीत लढा दिल्यास सरकारला निर्णय बदलायला भाग पडेल असे ते म्हणाले. हातपाय गाळू नका. एक इंचही जमिन लबाडांच्या घशात जाता कामा नये असे आवाहन डॉ. कराड यांनी केले. यावेळी तुकाराम दिघोळे यांनी शेतकरी हाच पक्ष मानून सर्व पक्षीयांनी लढ्यात एकत्र यावे असे आवाहन केले. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी मनोगतातून जमिनी देण्यास कडाकडून विरोध केला. (वार्ताहर)