शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी घेऊन रान पेटविण्याची वेळ आणू नका

By admin | Updated: July 2, 2016 00:28 IST

जितेंद्र आव्हाड : गोंदेच्या शेतकरी मेळाव्यात मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेला कडाडून विरोध

सिन्नर : शासन एक्स्प्रेस वे कशासाठी करत आहे तेच कळत नाही. तो इंडस्ट्रीयल बेल्टचा भाग नाही. मग मार्ग करण्याचा अट्टहास का, असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी मंत्री व आमदार जितेेंद्र आव्हाड यांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचे पाप करू नका, अशा शब्दात शासनाला सुनावले. उगाच शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करून रान पेटवण्याची वेळ आणू नका, असा सज्जड दमच आमदार आव्हाड यांनी सरकारला भरला.सिन्नर तालुक्यातल्या गोंदे येथे मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार आव्हाड बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री तुकाराम दिघोळे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड, तानाजी जायभावे, विष्णुपंत म्हैसधुणे, पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र घुमरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, डॉ. विष्णू अत्रे, शांताराम ढोकणे, हरिभाऊ तांबे, दिग्विजय गर्जे, रामदास जायभावे, सरपंच उषा सोनवणे, भरत तांबे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांना विश्वास घेऊन त्यांच्याशी संपर्क साधणे गरजेचे होते. मात्र कोणतेही माहिती न दिल्याने शेतकरी घाबरले असल्याचे आव्हाड म्हणाले. जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय लढा सुरुच ठेवणार असल्याचे आव्हाड म्हणाले. जोपर्यंत या आंदोलनाचा मार्ग दिसत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना गावबंदी करा असे आव्हाड यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या लढ्यात विशेषत: महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. डी. एल कराड यांनी शेतकऱ्यांना गुळवंच व मुसळगावच्या शेतकऱ्यांचा अनुभव समोर ठेवा असे सांगितले. शेतकऱ्यांची दीड लाखाने घेतलेली जमिन एक ते दोन कोटी रुपयांना विकली जात असल्याचे ते म्हणाले. या महामार्गासंबंधात आपली जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरुन दलालांची सोय करण्याचा विचार असल्याचे आपल्याला जाणवल्याचे ते म्हणाले. जमिनीपेक्षा किंमतीवान दुसरे काही नाही. त्यामउळे एकत्रीत लढा दिल्यास सरकारला निर्णय बदलायला भाग पडेल असे ते म्हणाले. हातपाय गाळू नका. एक इंचही जमिन लबाडांच्या घशात जाता कामा नये असे आवाहन डॉ. कराड यांनी केले. यावेळी तुकाराम दिघोळे यांनी शेतकरी हाच पक्ष मानून सर्व पक्षीयांनी लढ्यात एकत्र यावे असे आवाहन केले. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी मनोगतातून जमिनी देण्यास कडाकडून विरोध केला. (वार्ताहर)