शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पाणी टॅँकर मंजुरीचे प्रस्ताव प्रलंबीत ठेवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:27 IST

गावातील पिण्याच्या पाण्याच्या अस्तित्वात असलेल्या योजना नादुरूस्त झाल्या असतील तर त्या फेब्रुवारी पुर्वी दुरूस्त करून ग्रामस्थांना उन्हाळ्यात सदर योजनांपासून किमान पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी अशा सुचना दिल्या असून, विंधन विहीरींसाठी निधीची टंचाई जाणवत असल्यास आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गंत निधीचा त्यासाठी वापर करता येईल

ठळक मुद्देशासनाचा आदेश : आगावू सुचना देण्याचे आदेश ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली

नाशिक  : उन्हाळ्याला सुरूवात होऊ पाहत असताना आत्तापासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, टॅँकरची मागणी केली जात आहे, अशा परिस्थितीत टंचाईची वस्तुस्थिती पाहणी करून प्रांत अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आलेला टॅँकर मंजुरीचा प्रस्ताव चार दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबीत ठेवू नये अशा सुचना राज्य सरकारने सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहेत. तथापि, नाशिक जिल्ह्यातील बागलाण व येवला या दोन तालुक्यातून जानेवारी पासून टॅँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवूनही अद्यापही टॅँकर मंजुर करण्यात आलेले नाहीत.राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दोन दिवसांपुर्वी पाणी टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांबाबत नव्याने आदेश काढले आहेत. त्यात म्हटले आहे की, गावातील पिण्याच्या पाण्याच्या अस्तित्वात असलेल्या योजना नादुरूस्त झाल्या असतील तर त्या फेब्रुवारी पुर्वी दुरूस्त करून ग्रामस्थांना उन्हाळ्यात सदर योजनांपासून किमान पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी अशा सुचना दिल्या असून, विंधन विहीरींसाठी निधीची टंचाई जाणवत असल्यास आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गंत निधीचा त्यासाठी वापर करता येईल असे म्हटले आहे. विशेष करून टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असताना प्रशासन पातळीवर टॅँकर मंजुरीचे प्रस्ताव प्रलंबीत ठेवले जात असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते त्यासाठी टॅँकर मंजुरीचे प्रस्ताव तहसिलदार, प्रांत अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाने चार दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित ठेवू नये या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी तात्काळ निर्णय घ्यावेत अशा सुचना देण्यात आल्या असून, टॅँकर मंजुरी व त्याच्या खेपा याबाबत नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनेही शासनाने मार्गदर्शन केले आहे. पाणी टंचाईचा सामना करणाºया गावात टॅँकर आल्यास लोकांची पाण्यासाठी झुंबड उडते व त्यातून तणाव निर्माण होतो त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी टंचाईग्रस्त गावामध्ये टॅँकर पोहोचण्यापुर्वी दूरध्वनी, एसएमएस अथवा अन्य सोयीच्या पर्यांयाचा वापर करून नागरिकांना सुचना देण्यात यावी जेणे करून नागरिकांना सोयीचे होईल असेही म्हटले आहे.टॅँकरच्या बनावट फेºया दाखवून पैसे लाटण्याचे प्रकार टाळण्यासाठी टॅँकरवर जीपीएस प्रणालीचा वापर करण्याचे बंधनकारक करण्यात आले असून, ज्या टॅँकरच्या जीपीएस प्रणालीची नोंद होईल त्यांनाच देयक अदा करण्याच्या सुचनाही शासनाने दिल्या आहेत. जीपीएस प्रणाली नसेल तर फेºया मोजू नयेत असेही शासनाचे निर्देश आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक