शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिल्हा पुरवठा विभागाने कठोर पावले उचलली

By admin | Updated: November 9, 2014 01:45 IST

जिल्हा पुरवठा विभागाने कठोर पावले उचलली

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालीत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या धान्याचे योग्य वाटप व त्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने कठोर पावले उचलली असून, शासनाकडून मंजूर धान्याचा कोटा न उचलणाऱ्या रेशन दुकानदारांना दंड ठोठावण्याबरोबरच दुकानांवर धान्याचे दरपत्रक लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या अन्नसुरक्षा कायद्यान्वये पात्र ठरविण्यात आलेल्या लाभेच्छुकांना शासनाकडून दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो गहू या दराने रेशनमधून धान्य उपलब्ध करून दिले जात असून, त्याचबरोबर अन्नपूर्णा, अंत्योदय या योजनेच्या लाभेच्छुकांनाही अल्प दरात धान्य दिले जाते. परंतु गेल्या काही महिन्यांचा अनुभव लक्षात घेता, बहुतांशी रेशन दुकानदार शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य शिल्लक नसल्याचे कारणे देत पिटाळून लावत असल्याच्या तक्रारी आहेत. मुळात शासनाकडून शिधापत्रिकेच्या प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा केला जात असताना, रेशन दुकानदारांकडून धान्य न देण्याची बाब काळाबाजाराचा संशय व्यक्त करीत असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी या संदर्भात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्याचा पहिला टप्पा म्हणजे जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना त्यांच्या दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात दुकानाला जोडलेल्या शिधापत्रिकेची संख्या, दुकानातून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचे दरपत्रक लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. जेणे करून शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच शिधापत्रिकाधारकाला त्याच भावात धान्य मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एवढेच नव्हे तर या दरांमध्ये होणारे चढ-उतार लक्षात घेता, दर महिन्याला पुरवठा विभागाकडून धान्याचे दर जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यासही सुरुवात झाली आहे.शिधापत्रिकाधारकांना महिन्याच्या प्रारंभीच धान्य मिळण्याच्या दृष्टीनेही पावले उचलण्यात आली असून, त्यासाठी शासनाकडून दर महिन्यासाठी आगावू धान्याचा कोटा मंजूर होत असल्याचे पाहून एक महिना आगावू अन्नधान्य महामंडळातून शासकीय गुदामात धान्य आणून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व महिन्याच्या दहा तारखेपर्यंत रेशन दुकानदारांनी आपला कोटा नेण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे. एरवी दुकानदारांकडून महिन्याच्या अखेरीस धान्य उचलले जाऊन, ते वाटपासाठी ठेवले जात, परंतु त्यावेळी शिधापत्रिकाधारकाकडे महिना अखेरमुळे पैसे नसल्याने त्यांना त्याचा लाभ उचलणे शक्य होत नव्हते, परिणामी शिधापत्रिकाधारकाच्या नावे असलेल्या धान्याचा काळाबाजार होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात. त्याला चाप लावण्यासाठी आता दर महिन्याच्या दहा तारखेच्या आतच रेशन दुकानदारांनी धान्य उचलणे आवश्यक करण्यात आले असून, तसे न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)