शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

सिन्नर तालुक्यातील पाच रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:57 IST

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील पाच रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडे असलेले ८ मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून, त्यांना जिल्हा मार्ग म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली आहे.

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील पाच रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडे असलेले ८ मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून, त्यांना जिल्हा मार्ग म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली आहे. याकामी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांची विशेष मदत मिळाल्याचे आमदार वाजे यांनी सांगितले.नाशिक जिल्हा परिषदेकडे असलेले ६ इतर जिल्हा मार्ग व २ग्रामीण मार्ग रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून त्यांना जिल्हा मार्ग म्हणून दि. २६ सप्टेंबर २०१८ रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. या रस्त्यांवर होणारी वाहतूक, वर्दळ, गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्यांचा होणारा वापर यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हा मार्ग म्हणून वर्ग करण्याचा ठराव केला होता. आमदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यास शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. यात १) राष्ट्रीय महामार्ग ५० पासून पास्ते, लोणारवाडी , प्रमुख राज्यमार्ग , ११२ ते कुंदेवाडी , मुसळगाव , खंबाळा ,मºहळ - निºहाळे ते अहमदनगर जिल्हा हद्द - (एकूण ३१.५०० किलोमीटर लांबी), २)डुबेरे पासून पाटोळे, गोंदे, खंबाळा, भोकणी, फर्दापूर, धारणगाव, देवपूर, निमगाव (देवपूर), खडांगळी, मेंढी,सोमठाणे, सांगवी ते इतर जिल्हा मार्ग.(एकूण ४३ किलोमीटर लांबी). ३) सिन्नर, सरदवाडी , पास्ते , जामगाव , विंचूरदळवी ते राज्यमार्ग ३७ ला मिळणारा रस्ता. (एकूण १५ किलोमीटर लांबी). ४) प्रमुख राज्यमार्ग १२ ते सोनांबे, कोनांबे , धोंडबार, औंढेवाडी,आगासखिंड ते प्रमुख राज्य मार्ग १२ ला मिळणारा रस्ता. (एकूण २५.५०० किलोमीटर लांबी).५) राज्य महामार्ग ५० ते नांदूरशिंगोटे,चास, कासारवाडी ते राज्य महामार्ग ३२ ला मिळणारा रस्ता. (एकूण १६.९०० किलोमीटर लांबी).सिन्नर तालुक्यातील एकूण १३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा मिळालेला असुन यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पात, प्रमुख जिल्हा मार्गांसाठी प्राधान्याने निधीची तरतूद केली जाणार आहे. यामुळे या रस्त्यांची सुधारणा करणे व अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीत या रस्त्यांसाठी निधीची तरतूद करणे सोयीचे होईल. पूर्वी ग्रामीण व्ही.आर व ओ.डी.आर यासाठी निधीची तरतूद कमी असल्याने या रस्त्यांना निधी उपलब्ध होताना अडचणी येत होत्या. हे रस्ते नेहमी वर्दळीचे असल्याने, खरे तर १० ते १५ वर्षापूर्वीच ह्या रस्त्यांची दर्जोन्नती होणे गरजेचे होते. परंतु याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. आमदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला व जिल्ह्यात प्रामुख्याने सिन्नर तालुक्यातील जास्त रस्त्यांना दर्जोन्नती मिळालेली आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा