शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जिल्हा बालसंरक्षण कक्षाला दोन महिन्यांपासून कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:47 IST

बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच बालकांच्या संदर्भातील योजना राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बालसंरक्षण कक्षाला गेल्या दोन महिन्यांपासून कुलूप लागले आहे. बालहक्कासाठी कितीही सकारात्मक योजना करण्यात आल्या असल्या तरी बालसंरक्षण कक्ष सक्षम झाल्याशिवाय बालहक्काचे संरक्षण होणार कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देमुदत संपल्याचा परिणाम : बाल हक्काच्या कामकाजाला लागला ब्रेक; कर्मचाऱ्यांचीही वानवा

नाशिक : बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच बालकांच्या संदर्भातील योजना राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बालसंरक्षण कक्षाला गेल्या दोन महिन्यांपासून कुलूप लागले आहे. बालहक्कासाठी कितीही सकारात्मक योजना करण्यात आल्या असल्या तरी बालसंरक्षण कक्ष सक्षम झाल्याशिवाय बालहक्काचे संरक्षण होणार कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.बालकांचे हक्क अबाधीत राखण्याबरोबरच बालकांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या जगण्याचा अधिकार अधिक प्रबळ करण्यासाठी एकात्मिक बालसंरक्षण योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात बालसंरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शून्य सहा आणि सात ते अठरा वर्षांपर्यंतच्या वंचित आणि निराधार बालकांना जगण्याचा हक्क प्रदान करण्यासाठी बालसंरक्षण कक्षाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. महिला व बाल कल्याण समितीच्या आदेशाचे पालन करण्याबरोबरच संबंधित बालकांचे योग्य संगोपन होत आहे किंवा नाही याची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी बाल कक्षाच्या वतीने पार पाडली जाते. त्यामुळे हा कक्ष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.परंतु नाशिकमधील बालसंरक्षण कक्ष गेल्या महिनाभरापासून बंद असल्यामुळे बालसंरक्षण कामकाजा जवळपास ठप्प झाले आहे. बालकांच्या संदर्भात काम करणाºया जिल्ह्यातील ३८ संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बालकांच्या हक्काचे संरक्षण करणारी एक व्यवस्था असतानाही सदर व्यवस्थेकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कधी वेतन, तर कधी कर्मचारी संख्येच्या कारणावरून सदर कक्ष चर्चेत आला आहे. दरम्यान, या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेतली असता मुदत संपल्यामुळे महिनाभरापासून कक्ष बंद असून, येथील कर्मचारी अन्य संस्थांकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते. निरीक्षणगृहांवर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या कामाचा दर्जा तपासणे, सरकारी निधी नियोजित वेळेत प्राप्त होती किंवा नाही, मुलांच्या हितासंदर्भात योजनांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे आदी कामे जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडे देण्यात आली आहेत. बालसंगोपनासह मुलांना आर्थिक मदत पुरविण्याचे कामदेखील या कक्षाकडून केले जाते. बालमजुरी, मुलांवरील लैंगिक अत्याचार, बालविवाह थांबविण्यासाठी प्रयत्न आदी प्रश्नांवरदेखील कामकाज केले जाते.बालकायदा २००० नुसार बालसंरक्षण समितीमुळे बालमजुरी आणि बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी अधिकृतरीत्या कार्यवाही आणि भूमिका घेण्याचा अधिकार बालसंरक्षण कक्षाला आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक