शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हा बँकेला  २१ कोटींचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:28 IST

दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या देशपातळीवरील नोटाबंदीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला बसणाऱ्या २१ कोटी रुपयांच्या फटक्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक : दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या देशपातळीवरील नोटाबंदीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला बसणाऱ्या २१ कोटी रुपयांच्या फटक्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.  यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होऊन २१ कोटी रुपये बॅँकेने तोट्यात दाखवून नुकसान सोसावे या रिझर्व्ह बॅँकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली होती.  ज्यांच्याकडे हजार व पाचशेच्या नोटा आहेत, त्यांना त्या बदलून देण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडील हजार व पाचशेच्या नोटा मुदतीत अधिकाधिक चलनात आणून त्या बदलण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा बॅँकेच्या कर्जदारांनीही हजार व पाचशेच्या नोटा बॅँकेत जमा करून आपल्यावरील कर्जफेड केली होती. रिझर्व्ह बॅँकेने तब्बल दहा महिन्यांनंतर जिल्हा बॅँकेच्या ताब्यातील नोटा स्वीकारल्या.  नाशिक जिल्हा बॅँकेकडे अशा प्रकारे ३४१ कोटी रुपये जमा झाले होते.  दहा महिन्यांच्या व्याजापोटीची रक्कम मिळावी यासाठी जिल्हा बॅँकेने आजवर रिझर्व्ह बॅँकेला १५५ पत्रे पाठविली, मात्र त्याची साधी दखलही घेण्यात आली नसल्याचे बॅँकेचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता नोटाबंदीची घोषणा केली त्यावेळी बॅँकेचे व्यवहार बंद झाले होते. त्यादिवशी बॅँकांकडे त्या दिवसाच्या आर्थिक व्यवहाराची रक्कम तशीच पडून होती. आता रिझर्व्ह बॅँकेने नोटाबंदीच्या दिवशी झालेल्या व्यवहारातील हजार व पाचशे रुपयांच्या नोटांची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. उलट सदरची रक्कम बॅँकेच्या तोट्यात दाखवावी असा सल्लाही दिला होता. नाशिक जिल्हा बॅँकेप्रमाणे राज्यातील आठ जिल्हा बॅँकांबाबत हा प्रकार घडल्याने यासंदर्भात सर्व बॅँकांनी एकत्र येत सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी होऊन नोटाबंदीची रक्कम बॅँकेच्या तोट्यात दाखविण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.जिल्हा बॅँकेकडून निर्णयाचे स्वागतसर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे साहजिकच जिल्हा बॅँकेचा तोटा आता २१ कोटी रुपयांनी कमी होणार आहे. यासंदर्भात बुधवारी बॅँकेच्या कार्यकारी मंडळाची बैठक होेऊन त्यात या विषयावर चर्चा करण्यात आली. २१ कोटी रुपये तोट्यात दाखविण्याचा सल्ला नाबार्डने रिझर्व्ह बॅँकेच्या हवाल्याने दिला होता. आता न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आज ना उद्या ही रक्कम बॅँकेला मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या बैठकीत बॅँकेच्या मार्चअखेर वसुलीचा आढावाही घेण्यात आला. कर्जदार शेतकºयांनी वन टाइम सेटलमेंटचा आधार घेऊन कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन अध्यक्ष केदा अहेर यांनी केले आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रNote Banनोटाबंदी