शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ कोटी रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:03 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यावर कधी करपा रोगाने तर कधी अवकाळी पावसाने हैराण करून सोडले होते. आलेल्या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावरून नेला, काहींचा मातीमोल झाला. अशा परिस्थितीत विविध संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या करिता सर्व स्तरातून मागणी होत होती.

ठळक मुद्देइगतपुरी : तालुक्यातील प्रशाकीय स्तरावरून १६ कोटींची मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यावर कधी करपा रोगाने तर कधी अवकाळी पावसाने हैराण करून सोडले होते. आलेल्या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावरून नेला, काहींचा मातीमोल झाला. अशा परिस्थितीत विविध संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या करिता सर्व स्तरातून मागणी होत होती.प्रशासकीय यंत्रणेकडून काही शेतकऱ्यांना टप्या टप्याने नुकसान भरपाई वितरित होत असल्याने आणि उर्वरित शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने व विविध संकटानी १२६ गावांना नुकसानाचा सामना करावा लागला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र हे १६२०८ हेक्टर असे आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करून तीन महसूली कार्यालया मार्फत १६ कोटी २० लाख ८१ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासकीय पातळीवर करण्यात आली होती. त्यापैकी ७ कोटी च्या वर रक्कम तहसीलदार कार्यालयामार्फत वाटप करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.याआधीचे एक पीक हातातुन गेले असल्याने पुढील पिकासाठी मशागतीसाठी पैसा नसल्याने शेतकरी राजा हवालदील झाला आहे. बळीराजाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. शेतीच्या मशागतीला लागणारा खर्च आणावा कुठून असे संकट शेतकऱ्यासमोर समोर उभे ठाकले आहे, त्यामुळे लवकरात लवकर उर्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे.इगतपुरी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रशासकीय पातळीवर नुकसान भरपाईची मागणी होत असून उर्वरीत नुकसानग्रस्थाना लवकरच भरपाई मिळणार आहे.कार्यालयाने काटेकोरपणे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची यादी शासनाकडे सादर केली असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे ३ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन केले आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या संयुक्त भेटीद्वारे शेतकऱ्यांच्या समक्ष नुकसानीचे पंचनामे केले आहेत. लवकरच भरपाई संपूर्ण शेतकऱ्यांना मिळेल याकरिता प्रयत्नशील आहोत.- शितलकुमार तवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती