शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाशिक विभागात बारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून गुणपत्रिकांचे वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:54 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजेपासून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबारावीच्या गुणपत्रिकांची प्रतिक्षा संपलीविद्यार्थांना शुक्रवारी होणार गुणपत्रिकांचे वाटप

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजेपासून करण्यात येणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत महाविद्यालयांना गुणपत्रिका वितरीत करण्यात येणार असून, त्यासाठी विभागीय शिक्षणमंडळाने ११ वाटप केंद्र निश्चित केले आहेत.बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी मूळ गुणपत्रिकांची प्रतीक्षा लागली होती. या गुणपत्रिका शनिवारीच (दि.२५) विभागीय मंडळाला प्राप्त झाल्या होत्या. त्यांचे माहाविद्यालयनिहाय वर्गीकरण व पडताळणी करून विद्यार्थ्यांना ३१ जुलै रोजीपासून गुणपत्रिका वितरत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी ३० जुलै रोजी तालुकानिहाय गुणपत्रिकांचे वितरण केले जाईल. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे  प्राचार्यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निकालपत्रक वितरित करताना शासकीय नियमांचे पालन करावे. गर्दी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी, तसेच  विशिष्ट तारखेलाच गुणपत्रक घेऊन जावे, असा आग्रह महाविद्यालयांनी करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी दिली आहे. 

निकालपत्र वाटपाचे नियोजनबारावीचे निकालपत्र महाविद्यालयांना गुरुवारी (दि.३०) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत शिक्षण मंडळाकडून वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय मंडळाने तालुकानिहाय नियोजन केले असून, दिंडोरी, सिन्नर, नाशिक ग्रामीण व नाशिक शहर, कळवण, इगतपुरी, निफाड, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांचे निकाल नाशिक विभागीय मंडळातच मिळणार आहेत, तर चांदवड, देवळा, मालेगाव ग्रामीण, सटाणा व मालेगाव  शहरातील निकालपत्रक मविप्रच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, स्वप्नपूर्तीनगर, भोकरमळा, सोयगाव, मालेगाव येथे मिळतील. नांदगाव व येवलाचे निकाल संत बार्णबा हायस्कूल मनमाड येथे वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी