शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पालखी सोहळ्यात अधिकाऱ्यांच्या प्रवेशाने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 23:06 IST

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दरवर्षाप्रमाणे यंदा त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पायी पालखी व दिंडी पंढरपूरला नियोजित वेळेत रवाना होऊ शकली नाही. परंतु आषाढी एकादशीलाच राज्यातून संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपूर येथे रवाना होणार असून, त्यात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांच्या पालखीचा समावेश आहे.

ठळक मुद्देवारकऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे : जिल्हाबंदीच्या नियमामुळे ज्येष्ठांना प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दरवर्षाप्रमाणे यंदा त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पायी पालखी व दिंडी पंढरपूरला नियोजित वेळेत रवाना होऊ शकली नाही. परंतु आषाढी एकादशीलाच राज्यातून संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपूर येथे रवाना होणार असून, त्यात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांच्या पालखीचा समावेश आहे.बसमधून जाणाºया या पालखीसमवेत केवळ वीस वारकºयांना शासनाने परवानगी दिली असून, त्यात आता पोलीस, वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचा सहभाग असल्याने तसेच ६५ वयावरील ज्येष्ठ वारकºयांना परवानगी नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानच्या पदाधिकाºयांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन यासंदर्भातील ६५ वयावरील ज्येष्ठ नागरिकांची अट शिथिल करावी, याबाबत साकडे घातले आहे. तसेच प्रशासकीय अधिकाºयांना वारीच्या बसमध्ये समावेश करण्यास वारकºयांचा विरोध आहे, संस्थानच्या पदाधिकाºयांनी भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, पालखी वाहनातून (बसमधून) जाण्यास शासनाने केवळ वीस वारकºयांना परवानगी दिली असून, त्यातून आता पोलीस, वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश केल्याने वीस वारकºयांना त्यात सहभागी होता येणार नाही, त्यातच ६५ वर्षांहून अधिक वयाच्या वारकºयांना सहभागाला प्रशासनाने हरकत घेतल्याने ज्येष्ठ विश्वस्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील वारकरी शिवशाही बसने संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी घेऊन जाणारआहेत. त्यात दोन मानकरी, दोन झेंडेकरी, दोन पुजारी, दोन पोलीस, दोन वैद्यकीयअधिकारी आणि दहा विश्वस्तांचा समावेश असेल. मात्र विश्वस्तांमध्ये तीन ते चार विश्वस्त हे ६५पेक्षा जास्त वयाचे असल्यानेत्यांना यामध्ये सहभागी होता येणार नाही, त्याबद्दल या पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. योग्य उपाययोजनातीन जिल्ह्यातून जाणाºया या वारीत जिल्हाबंदीचे नियमामुळे ज्येष्ठांना प्रतिबंध आहे. त्यामुळे ज्येष्ठांना प्रवासात परवानगीसाठी शासनस्तरावर निर्णय घ्यावा लागणार आहे. यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांना यासंबंधीचे निवेदन दिले आहे. यासंबंधी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन मिळाल्याचे विश्वस्तांनी सांगितले.योग्य खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस,रु ग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक वारीसोबत देण्यात यावे. मात्र त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन असावे. नियोजित वारकºयांच्या बसमध्ये यांचा समावेश करू नये. वारीसाठी वीस वारकरी असावेत, असे ठरल्याने दोन स्वतंत्र वाहन असल्यास सोयीचे होईल.- पुंडलिकराव थेटे, विश्वस्त,संत निवृत्तिनाथ देवस्थान

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिर