शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:59 IST

पांगरी : वीज मंडळाकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वीज यंत्रणेचा पुन्हा बोजवारा उडाला असून, परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देपांगरी : शेतकरी तसेच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

पांगरी : वीज मंडळाकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वीज यंत्रणेचा पुन्हा बोजवारा उडाला असून, परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.जिथे जलविद्युत निर्मिती होते अशी धरणे भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते. परंतु तरीही विजेचे भारनियमन केले जात असून तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाल्याने त्यातून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी, नाले, बंधारे भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे म्हणजे गहू, मका तसेच जनावरांच्या चाऱ्याची लागवड केली आहे परंतु पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्याकरिता शेतकऱ्याला अर्धा तास लागत आहे.वीज खंडित होण्याचे प्रमाणही वाढल्याने वाफेपर्यंत पाणी पोहोचण्याच्या अगोदर वीज जाते त्यामुळे विहीर ते वाफेपर्यंत शेतकरी फेऱ्या मारून हैराण झाला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी आता दोन व्यक्तीची गरज भासू लागली आहे.वीजपुरवठा सुरू राहिला तर तो अत्यंत कमी दाबाने देण्यात येत असल्याने घरातील अनेक वीज उपकरणे सुरू होत नाहीत. त्यामुळे वीज असूनही तिचा उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापराच्या उपकरणाचे नुकसान, तसेच मोटार जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्याला शेतीसाठी रात्री वीज दिली जाते, परंतु ही दिली जाणारी वीज रात्री न देता दिवसा देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, बारकू पगार, बाबासाहेब शिंदे, विलास निरगुडे, अशोक शिंदे, दादासाहेब पांगारकर, नीलेश पगार आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.------------पांगरी व परिसरात गावामध्ये शेती तसेच घरगुती अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून, वीज वारंवार खंडित होत असूनही वीज मंडळाकडून वीज बिल मात्र अखंडितपणे वसूल होत आहे. वीज बिल व इतर सर्व आकार सक्तीने वसूल केले जात असताना वीज कमी दाबाने का दिली जात आहे असा सवाल सर्वसामान्य करू लागले आहेत.- विश्वनाथ पगार, अध्यक्ष, वि. का. सोसायटी, पांगरी.ग्रामीण भागातील शेतीला सरकारने सलग वीजपुरवठा आणि तो दिवसा केला तर शेतीला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकते. परंतु सरकारची तशी मानसिकता असायला हवी, दुर्दैवाने ती नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची पाऊणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही ग्रामीण भागातील भूमिपुत्र व शेतकरी आजही अंधारात चाचपडत आहेत.- रवी पगार, सदस्य पंचायत समिती, सिन्नर.

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत