शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
धक्कादायक! जालन्यात शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, कारण अद्याप अस्पष्ट
3
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
4
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
5
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
6
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
7
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
8
Bombay HC: थकबाकी दिल्याशिवाय खरेदीदाराला सोसायटीचे सदस्यत्व नाही: हायकोर्ट
9
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
10
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
11
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
12
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
13
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
14
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
15
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
16
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
17
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
18
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
19
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
20
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:59 IST

पांगरी : वीज मंडळाकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वीज यंत्रणेचा पुन्हा बोजवारा उडाला असून, परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देपांगरी : शेतकरी तसेच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

पांगरी : वीज मंडळाकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वीज यंत्रणेचा पुन्हा बोजवारा उडाला असून, परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.जिथे जलविद्युत निर्मिती होते अशी धरणे भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते. परंतु तरीही विजेचे भारनियमन केले जात असून तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाल्याने त्यातून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी, नाले, बंधारे भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे म्हणजे गहू, मका तसेच जनावरांच्या चाऱ्याची लागवड केली आहे परंतु पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्याकरिता शेतकऱ्याला अर्धा तास लागत आहे.वीज खंडित होण्याचे प्रमाणही वाढल्याने वाफेपर्यंत पाणी पोहोचण्याच्या अगोदर वीज जाते त्यामुळे विहीर ते वाफेपर्यंत शेतकरी फेऱ्या मारून हैराण झाला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी आता दोन व्यक्तीची गरज भासू लागली आहे.वीजपुरवठा सुरू राहिला तर तो अत्यंत कमी दाबाने देण्यात येत असल्याने घरातील अनेक वीज उपकरणे सुरू होत नाहीत. त्यामुळे वीज असूनही तिचा उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापराच्या उपकरणाचे नुकसान, तसेच मोटार जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्याला शेतीसाठी रात्री वीज दिली जाते, परंतु ही दिली जाणारी वीज रात्री न देता दिवसा देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, बारकू पगार, बाबासाहेब शिंदे, विलास निरगुडे, अशोक शिंदे, दादासाहेब पांगारकर, नीलेश पगार आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.------------पांगरी व परिसरात गावामध्ये शेती तसेच घरगुती अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून, वीज वारंवार खंडित होत असूनही वीज मंडळाकडून वीज बिल मात्र अखंडितपणे वसूल होत आहे. वीज बिल व इतर सर्व आकार सक्तीने वसूल केले जात असताना वीज कमी दाबाने का दिली जात आहे असा सवाल सर्वसामान्य करू लागले आहेत.- विश्वनाथ पगार, अध्यक्ष, वि. का. सोसायटी, पांगरी.ग्रामीण भागातील शेतीला सरकारने सलग वीजपुरवठा आणि तो दिवसा केला तर शेतीला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकते. परंतु सरकारची तशी मानसिकता असायला हवी, दुर्दैवाने ती नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची पाऊणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही ग्रामीण भागातील भूमिपुत्र व शेतकरी आजही अंधारात चाचपडत आहेत.- रवी पगार, सदस्य पंचायत समिती, सिन्नर.

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत