शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:59 IST

पांगरी : वीज मंडळाकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वीज यंत्रणेचा पुन्हा बोजवारा उडाला असून, परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देपांगरी : शेतकरी तसेच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

पांगरी : वीज मंडळाकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वीज यंत्रणेचा पुन्हा बोजवारा उडाला असून, परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.जिथे जलविद्युत निर्मिती होते अशी धरणे भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते. परंतु तरीही विजेचे भारनियमन केले जात असून तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाल्याने त्यातून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी, नाले, बंधारे भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे म्हणजे गहू, मका तसेच जनावरांच्या चाऱ्याची लागवड केली आहे परंतु पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्याकरिता शेतकऱ्याला अर्धा तास लागत आहे.वीज खंडित होण्याचे प्रमाणही वाढल्याने वाफेपर्यंत पाणी पोहोचण्याच्या अगोदर वीज जाते त्यामुळे विहीर ते वाफेपर्यंत शेतकरी फेऱ्या मारून हैराण झाला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी आता दोन व्यक्तीची गरज भासू लागली आहे.वीजपुरवठा सुरू राहिला तर तो अत्यंत कमी दाबाने देण्यात येत असल्याने घरातील अनेक वीज उपकरणे सुरू होत नाहीत. त्यामुळे वीज असूनही तिचा उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापराच्या उपकरणाचे नुकसान, तसेच मोटार जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्याला शेतीसाठी रात्री वीज दिली जाते, परंतु ही दिली जाणारी वीज रात्री न देता दिवसा देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, बारकू पगार, बाबासाहेब शिंदे, विलास निरगुडे, अशोक शिंदे, दादासाहेब पांगारकर, नीलेश पगार आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.------------पांगरी व परिसरात गावामध्ये शेती तसेच घरगुती अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून, वीज वारंवार खंडित होत असूनही वीज मंडळाकडून वीज बिल मात्र अखंडितपणे वसूल होत आहे. वीज बिल व इतर सर्व आकार सक्तीने वसूल केले जात असताना वीज कमी दाबाने का दिली जात आहे असा सवाल सर्वसामान्य करू लागले आहेत.- विश्वनाथ पगार, अध्यक्ष, वि. का. सोसायटी, पांगरी.ग्रामीण भागातील शेतीला सरकारने सलग वीजपुरवठा आणि तो दिवसा केला तर शेतीला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकते. परंतु सरकारची तशी मानसिकता असायला हवी, दुर्दैवाने ती नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची पाऊणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही ग्रामीण भागातील भूमिपुत्र व शेतकरी आजही अंधारात चाचपडत आहेत.- रवी पगार, सदस्य पंचायत समिती, सिन्नर.

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत