शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:59 IST

पांगरी : वीज मंडळाकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वीज यंत्रणेचा पुन्हा बोजवारा उडाला असून, परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देपांगरी : शेतकरी तसेच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

पांगरी : वीज मंडळाकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वीज यंत्रणेचा पुन्हा बोजवारा उडाला असून, परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.जिथे जलविद्युत निर्मिती होते अशी धरणे भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते. परंतु तरीही विजेचे भारनियमन केले जात असून तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाल्याने त्यातून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी, नाले, बंधारे भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे म्हणजे गहू, मका तसेच जनावरांच्या चाऱ्याची लागवड केली आहे परंतु पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्याकरिता शेतकऱ्याला अर्धा तास लागत आहे.वीज खंडित होण्याचे प्रमाणही वाढल्याने वाफेपर्यंत पाणी पोहोचण्याच्या अगोदर वीज जाते त्यामुळे विहीर ते वाफेपर्यंत शेतकरी फेऱ्या मारून हैराण झाला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी आता दोन व्यक्तीची गरज भासू लागली आहे.वीजपुरवठा सुरू राहिला तर तो अत्यंत कमी दाबाने देण्यात येत असल्याने घरातील अनेक वीज उपकरणे सुरू होत नाहीत. त्यामुळे वीज असूनही तिचा उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापराच्या उपकरणाचे नुकसान, तसेच मोटार जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्याला शेतीसाठी रात्री वीज दिली जाते, परंतु ही दिली जाणारी वीज रात्री न देता दिवसा देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, बारकू पगार, बाबासाहेब शिंदे, विलास निरगुडे, अशोक शिंदे, दादासाहेब पांगारकर, नीलेश पगार आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.------------पांगरी व परिसरात गावामध्ये शेती तसेच घरगुती अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून, वीज वारंवार खंडित होत असूनही वीज मंडळाकडून वीज बिल मात्र अखंडितपणे वसूल होत आहे. वीज बिल व इतर सर्व आकार सक्तीने वसूल केले जात असताना वीज कमी दाबाने का दिली जात आहे असा सवाल सर्वसामान्य करू लागले आहेत.- विश्वनाथ पगार, अध्यक्ष, वि. का. सोसायटी, पांगरी.ग्रामीण भागातील शेतीला सरकारने सलग वीजपुरवठा आणि तो दिवसा केला तर शेतीला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकते. परंतु सरकारची तशी मानसिकता असायला हवी, दुर्दैवाने ती नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची पाऊणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही ग्रामीण भागातील भूमिपुत्र व शेतकरी आजही अंधारात चाचपडत आहेत.- रवी पगार, सदस्य पंचायत समिती, सिन्नर.

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत