शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

नांदगावच्या तहसीलदारांकडून ज्येष्ठांची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 17:02 IST

निषेधाचा सूर : मोर्चेकऱ्यांना अडीच तास तिष्ठत ठेवल्याने संताप

ठळक मुद्देनांदगावला बदली झालेल्या व पदभार स्वीकारण्यासाठी नाखूष असलेल्या या तहसीलदारांनी ‘हवं तर माझी बदली करा’ अशी उर्मटपणाची भाषा वापरल्याने निषेधाचा सूर उमटत आहे

नांदगाव : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणा-या नांदगावमधील ज्येष्ठ नागरिकांना अवमानित होण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. ज्येष्ठांशी सन्मानाने वागावे असे स्पष्ट निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले असतांनाही ज्येष्ठ नागरिक दिनीच नांदगावच्या तहसीलदारांकडून ज्येष्ठांच्या वाट्याला आलेली ही अवहेलना चर्चेचा आणि संतापाचा विषय बनली आहे. नांदगावला बदली झालेल्या व पदभार स्वीकारण्यासाठी नाखूष असलेल्या या तहसीलदारांनी ‘हवं तर माझी बदली करा’ अशी उर्मटपणाची भाषा वापरल्याने निषेधाचा सूर उमटत आहे.ज्येष्ठांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयात मोर्चा काढणार असल्याची पूर्व कल्पना दिली होती. त्यानुसार पोलिसांची रीतसर परवानगी घेऊन ज्येष्ठांनी जुन्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयातील कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. मोर्चातील ज्येष्ठांनी तहसीलदार भारती सागरे यांना मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी येण्याची विनंती केली. परंतु, सागरे यांनी ‘तुमच्यातले चार-पाच जण कार्यालयात या, मी निवेदन स्वीकारेन’, अशी भूमिका स्वीकारली. निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार येत नसल्याचे पाहून ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ चव्हाण यांनी येवल्याचे प्रांताधिकारी यांना दूरध्वनी केला व हा ज्येष्ठांचा अवमान असल्याबाबत भावना व्यक्त केल्या. मोर्चा काढल्यानंतर, तहसीलदारांच्या प्रतीक्षेत ज्येष्ठांना उन्हात तब्बल अडीच तासांपेक्षाही अधिक काळ तिष्ठत बसावे लागले. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी मोर्चेकरी व प्रांताधिकारी यांच्या संवादातील कल्पना पोलीस निरीक्षक अनिल भंवारी यांना दिली. भंवारी यांनी या हालचालींची माहिती तहसीलदार सागरे यांना दिल्यानंतर ज्येष्ठांच्या अवमानाचे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदारांनी पोलिसांच्या उपस्थितीत अखेर निवेदन स्वीकारले.बैठा सत्याग्रहज्येष्ठांनी आज काढलेल्या मोर्चातील प्रमुख मागण्या तहसील कार्यालयात त्यांना येणा-या अडचणींच्या अनुषंगाने होत्या. ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रंगनाथ चव्हाण, सौ. कुसुमताई सावंत, वामनदादा पोतदार, सुरेश दंडगव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते संजय मोकळ, सुरजमल संत, अंबादास पैठणकर यांचेसह ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. तहसीलदारांच्या या वर्तणुकीच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २) गांधी जयंती दिनी हुतात्मा स्मारकाजवळ बैठा सत्याग्रह करण्याची भूमिका ज्येष्ठांनी घेतली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMorchaमोर्चा