शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अभियंता  बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे  मनपा कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:53 IST

कामाच्या अतिताणामुळे नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांनी जीवन संपविण्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. रवि पाटील प्रकरणानंतर महापालिकेत गेल्या साडेतीन महिन्यांपासून निर्माण झालेल्या ताण-तणावाला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली जात आहे. दरम्यान, या साºया प्रकरणात कर्मचारी संघटनांची बोटचेपी भूमिकाही संशयास्पद ठरत असून, कर्मचारी उघडपणे संघटनांच्या मुखंडांबाबत नाराजीचा सूर प्रकट करू लागले आहेत.

नाशिक : कामाच्या अतिताणामुळे नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांनी जीवन संपविण्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. रवि पाटील प्रकरणानंतर महापालिकेत गेल्या साडेतीन महिन्यांपासून निर्माण झालेल्या ताण-तणावाला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली जात आहे. दरम्यान, या साºया प्रकरणात कर्मचारी संघटनांची बोटचेपी भूमिकाही संशयास्पद ठरत असून, कर्मचारी उघडपणे संघटनांच्या मुखंडांबाबत नाराजीचा सूर प्रकट करू लागले आहेत.  गेल्या शनिवारी (दि.२६) आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमासाठी जातो, असे सांगून घरातून गेलेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता झाले. त्यांच्या वाहनात सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपण नोकरीच्या ठिकाणी कामाच्या अतिताणामुळे जीवन संपवत असल्याचे स्पष्ट केल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. पाटील बेपत्ता होऊन तीन दिवस उलटले तरी अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पाटील कुटुंबीय चिंतित असतानाच या प्रकरणामुळे महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यातही कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून महापालिकेत अधिकारी व कर्मचारी यांना सुट्या माहीत नसल्याचे सांगितले जात आहे. रात्री ९ ते १० वाजेपर्यंत कामकाज करावे लागत असल्याच्याही तक्रारी ऐकायला मिळत आहेत. महापालिकेने एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप विकसित केले असले तरी त्यावर तक्रारींची वाढती संख्या आणि त्यांचा निपटरा करण्यासाठी मिळणारी मुदत यात तफावत असल्याने अनेकांना ताणतणावाने घेरल्याची चर्चा आहे. बºयाचशा तक्रारी या व्यक्तिगत भांडण-वादातून मांडल्या जात आहेत. त्यामुळे संबंधित तक्रारींची शहानिशा करण्यापासून ते त्यावर करावयाच्या कारवाईचा तपशील सादर करताना अधिकारी व कर्मचारी वर्गात दमछाक होताना दिसून येत आहे. महापालिकेत अगोदरच कर्मचारी संख्या कमी आहे. त्यात अनेकांकडे प्रभारी व अतिरिक्त कामाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ताणतणावाच्या अशा स्थितीत अनेकांवर निलंबनाची, वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईची टांगती तलवार आहे. महापालिकेत रवि पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये, अशी प्रार्थना आता केली जाऊ लागली आहे. दरम्यान, महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटना, सीटू व मनसेप्रणीत संघटना, वाहनचालकांची संघटना कार्यरत आहेत. मात्र, संबंधित संघटनांकडून सदर प्रकरणाबाबत बोटचेपी भूमिका घेतली जात असल्याने कर्मचारी वर्गात संघटनांच्या पदाधिकाºयांविरुद्ध नाराजीचा सूर उमटत आहे.सोशल मीडियातून संवेदनासहायक अभियंता रवींद्र पाटील यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेनंतर आता मनपातील कर्मचारी वर्गातून सोशल मीडियातून आपल्या संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. सहायक अभियंता रवि पाटील हिटलरशाहीचा बळी?, ‘मनपा की मौत का कुवा’, ‘छोड तू रवि..तू वापस आ...!’ अशा शीर्षकाखाली सोशल मीडियातून महापालिकेतील कारभाराचे दर्शन घडविले जाऊ लागले आहे. तीन दिवस उलटूनही रवींद्र पाटील यांचा ठावठिकाणा न लागल्याने महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गात अस्वस्थता आहे. शांत स्वभावाच्या रविकडून टोकाचे पाऊल उचलले गेल्याबद्दल अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका